शहरं
Join us  
Trending Stories
1
"रोहितसोबत फलंदाजी करणं सोपं गेलं, कारण..."; विराट कोहलीने सांगून टाकली 'मन की बात'
2
राज्यसभा निवडणुकीत भाजपा आमच्याकडे डील करायला आली होती, पण...; फारूख अब्दुल्लांचा गौप्यस्फोट
3
पोत्यातून निघाल्या नोटाच नोटा! भीक मागणाऱ्या महिलेकडे सापडला 'खजिना'; आतापर्यंत किती मोजल्या?
4
Viral Video: जुना, तुटलेल्या टीव्हीचा बनवला हेल्मेट; तरुणाचा जुगाड पाहून नेटकरी शॉक!
5
ICC Womens World Cup 2025 : ठरलं! नवी मुंबईत भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात रंगणार सेमीफायनल
6
काहींची व्यक्तिगत पातळीवर टीका; पण जैन बांधवांनी माझं एकदाही नाव घेतलं नाही - मुरलीधर मोहोळ
7
दोन शून्य, नंतर 'मॅचविनिंग' अर्धशतक! विजयावर विराट कोहली म्हणाला- "इतकी वर्ष खेळूनसुद्धा.."
8
ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटर्सची भररस्त्यात छेड काढणारा अकील खान ६ तासांत पोलिसांच्या ताब्यात
9
एकनाथ शिंदेंची अचानक 'दिल्ली'वारी, PM नरेंद्र मोदींची घेतली भेट; महायुतीतील मतभेदावर म्हणाले...
10
Satish Shah Death: 'साराभाई वर्सेस साराभाई' फेम अभिनेते सतीश शाह यांचं निधन, ७४ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
11
सतीश शाह यांच्या निधनानंतर आर माधवनची भावुक पोस्ट, 'या' विनोदी मालिकेत केलं होतं एकत्र काम
12
बलूच नेत्यानं केली पाक लष्करप्रमुख असीम मुनीरची पोलखोल; जगासमोर उघड झाला पाकिस्तानचा 'डबल गेम'
13
Virat Kohli: वनडे + टी-२० मध्ये सर्वाधिक धावा; कोहलीच्या डोक्यावर ताज, सचिन तेंडुलकरला टाकलं मागे
14
मुंबईत शिंदेसेना फक्त ६५ ते ७० जागाच लढवणार?; भाजपानं कंबर कसली, 'अबकी बार १५० पार'चा नारा
15
AUS W vs SA W : वर्ल्ड कपमध्ये पहिल्यांदाच असं घडलं; Alana King नं ७ विकेट्स घेत रचला इतिहास
16
कोण आहे सतीश शाह यांची पत्नी? दोघांना नव्हते मूल; जोडीदाराच्या निधनाने बसला धक्का
17
सामनावीर अन् मालिकावीर! रोहित शर्मा दुहेरी सन्मानावर म्हणाला- "मालिका हरलो असलो तरीही..."
18
Virat Kohli: 'रन मशीन' विराटची गगनभरारी! संगकाराला पछाडलं, आता फक्त सचिन तेंडुलकर पुढे
19
IND vs AUS: रोहितच्या सेंच्युरीसह किंग कोहलीची फिफ्टी; ऑस्ट्रेलिया विरुद्ध अखेरच्या वनडेत अविस्मरणीय शो!
20
मंगळ गोचर २०२५: २७ ऑक्टोबर रोजी मंगळ गोचर; पुढचे दोन महिने 'या' ५ राशींसाठी असणार खास!

पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा शोध सुरूच; नाक्यांवर लागले पोस्टर,माहिती देणाऱ्यास मिळणार २० लाखांचं बक्षीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2025 11:34 IST

जम्मू काश्मीर, शोपियानमध्ये ठिकठिकाणी दहशतवाद्यांचे पोस्टर्स लावले जात आहेत. या दहशतवाद्यांना लवकरात लवकर शोधण्यासाठी वेगवेगळी माहिती जमा केली जात आहे.

जम्मू आणि काश्मीरमधील पहलगामच्या बैसरण घाटीत फिरायला आलेल्या पर्यटकांवर गोळीबार करून त्यांची हत्या करणाऱ्या दहशतवाद्यांना शोधण्याचा सर्वोतोपरि प्रयत्न सुरक्षा यंत्रणा करत आहेत. पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील गुन्हेगार अजूनही फरार आहेत. २२ एप्रिल रोजी झालेल्या हल्ल्यातील गुन्हेगारांचे फोटो सुरक्षा यंत्रणेकडून प्रसिद्ध करण्यात आले होते. त्यांना शोधून देणाऱ्या किंवा त्यांची माहिती देणाऱ्यास २० लाखांचं बक्षीस देखील जाहीर करण्यात आलं आहे. मात्र, अद्याप त्यांना पकडण्यात यश आलेलं नाही. आता या वॉन्टेड दहशतवाद्यांचे पोस्टर जम्मू-काश्मीरमध्ये ठिकठिकाणी लावले जात आहेत.

पहलगाममध्ये फिरायला आलेल्या पर्यटकांवर त्यांचा धर्म विचारून, मग गोळी मारून त्यांची हत्या करण्यात आली. या दहशतवादी हल्ल्यात तब्बल २६ जणांचा मृत्यू झाला. या हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली होती. या हल्ल्यानंतर पोलिसांनी या दहशतवाद्यांचा शोध सुरू केला आहे. सगळ्यात आधी त्यांचे स्केच प्रसिद्ध करण्यात आले होते. आता त्यांचे फोटो देखील प्रसिद्ध करण्यात आले आहेत. 

ठिकठिकाणी लावले जाताहेत पोस्टर्स 

आता जम्मू काश्मीर, शोपियानमध्ये ठिकठिकाणी दहशतवाद्यांचे पोस्टर्स लावले जात आहेत. या दहशतवाद्यांना लवकरात लवकर शोधण्यासाठी वेगवेगळी माहिती जमा केली जात आहे. पहलगाम हल्ल्यात लष्कर-ए-तोयबाचे दहशतवादी सामील होते. यामध्ये पाकिस्तानातील हाशिम मुसा उर्फ ​​सुलेमान आणि अली भाई उर्फ ​​तल्हा भाई यांचा समावेश आहे. तर, आदिल ठोकर हा अनंतनाग येथील स्थानिक आहे.

पहलगाममधील 'मिनी स्वित्झर्लंड' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या पर्यटन स्थळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला होता. मृतांमध्ये बहुतेक पर्यटक पुरुष होते. त्यानंतर अनंतनाग पोलिसांनी त्यांच्या एक्स हँडलवर एक पोस्ट शेअर करत म्हटले होते की, "या भ्याड कृत्यात सहभागी असलेल्या दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्या व्यक्तीला २० लाख रुपयांचे बक्षीस दिले जाईल. तसेच, माहिती देणाऱ्याची ओळख गुप्त ठेवली जाईल."

ऑपरेशन सिंदूर करून दिले प्रत्युत्तर

बक्षीस जाहीर होण्याच्या काही काळापूर्वी, सुरक्षा एजन्सींनी पहलगाम दहशतवादी हल्ल्यात सहभागी असल्याचा संशय असलेल्या ३ लोकांचे रेखाचित्र जारी केले होते. भारत सरकारने या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी 'ऑपरेशन सिंदूर' सुरू केले आणि पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर (पीओके) मधील अनेक ठिकाणांवर निशाणा साधून दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले. 

टॅग्स :Pahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाTerror Attackदहशतवादी हल्लाJammu Kashmirजम्मू-काश्मीरIndia vs Pakistanभारत विरुद्ध पाकिस्तानOperation Sindoorऑपरेशन सिंदूर