शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
3
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
4
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
5
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
6
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
7
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
8
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
9
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
10
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
11
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
12
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
13
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
14
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
15
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
16
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
17
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
18
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
19
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
20
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...

‘एससीओ’त मोदी-इम्रान यांची बैठक होणार नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2019 02:51 IST

भारताने केले स्पष्ट; पाकिस्तानशी चर्चेस नकार

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी व पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांची शांघाय को-ऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या (एससीओ) परिषदेदरम्यान बैठक होणार नसल्याचे भारताच्या परराष्ट्र खात्याने स्पष्ट केले आहे. किरगिझस्तानच्या बिश्केक या राजधानीत १३ ते १४ जून महिन्यात होणाऱ्या परिषदेला हे दोन्ही नेते उपस्थित राहणार आहेत.

परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते रवीशकुमार यांनी पत्रकारांना सांगितले की, दोन्ही नेत्यांची कोणतीही बैठक ठरलेली नाही. यंदा १४ फेब्रुवारी रोजी काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यामध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या आत्मघाती हल्ल्यात ४० सीआरपीएफ जवान शहीद झाले होते. त्याला चोख प्रत्युत्तर म्हणून भारतीय हवाई दलाच्या विमानांनी पाकिस्तानमधील बालाकोटवर २६ फेब्रुवारी रोजी हल्ला करून तेथील दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले.

या घटनेनंतर पाकिस्तानच्या लढाऊ विमानांनी २७ फेब्रुवारी भारताच्या हद्दीत घुसखोरी करून बॉम्बहल्ले करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. त्यावेळी भारतीय हवाई दलाचे वैमानिक अभिनंदन वर्धमान यांनी पाकिस्तानचे एक एप-१६ विमान पाडले. भारत व आंतरराष्ट्रीय दडपणामुळे अभिनंदन वर्धमान यांची पाकिस्तानने सुटका केली होती. दोन्ही देशांतील संबंध सुधारण्याकरिता भारताशी चर्चा करण्याची इच्छा इम्रान खान यांनी व्यक्त केली होती. मात्र ती भारताने फेटाळून लावली होती.

‘उरी’नंतर पाकबाबत अधिक कडक धोरणउरी येथील भारतीय लष्कराच्या छावणीवर १८ सप्टेंबर २०१६ रोजी पाकिस्तानातील दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात १७ जवान शहीद व काही जण जखमी झाले होते. त्यानंतर भारताने पाकिस्तानशी कोणत्याही स्तरावर चर्चा करायची नाही, असा निर्णय घेतला होता. पाकिस्तानला दिलेला मोस्ट फेवर्ड नेशनचा दर्जा भारताने पुलवामा हल्ल्यानंतर काढून घेतला होता.

पाकिस्तानातील आयात वस्तूंवर २०० टक्के शुल्क वाढविले. सिंधू, चिनाब आणि झेलम या भारतातून पाकिस्तानकडे वाहत जाणाºया नद्यांचा प्रवाह यमुनेकडे वळविण्याचा निर्णय भारताने घेतला आहे. पाकिस्तानची पाणीकोंडी करण्याचे ठरविल्याने दोन्ही देशांतील तणाव आणखी वाढला आहे.

टॅग्स :Imran Khanइम्रान खानNarendra Modiनरेंद्र मोदीIndiaभारतPakistanपाकिस्तान