शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
2
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
3
आजचे राशीभविष्य, २९ सप्टेंबर २०२५: महत्वाच्या कामासाठी खर्च झाला तरी सुद्धा आर्थिक लाभ होतील
4
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
5
पंधरा दिवसांत ६०% जास्त पाऊस! मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील चित्रच बदलले; आजही ६ जिल्ह्यांतऑरेंज अलर्ट
6
महिलांची सक्तीनं नसबंदी; ६० वर्षांनी माफी! ग्रीनलँडमध्ये ४५०० महिलांसोबत काय घडलेलं?
7
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
8
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
9
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर
10
थंडगार वाळवंटात ही आग कुणी लावली? केंद्र सरकारशी बोलणी सुरू असतानाही हिंसाचार का?
11
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
12
मुत्सद्देगिरी हेच औषध! ट्रम्प यांच्या 'टॅरिफ बॉम्ब'ने भारतीय फार्मा कंपन्यांचे काय होणार?
13
केवळ ३.९ टक्के महिलाच रोज करतात व्यायाम : सामाजिक मानसिकता बदलल्याशिवाय महिलांचा फिटनेस अशक्य
14
१७ विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण, ‘बाबा’ अखेर अटकेत; आग्रा येथून घेतले ताब्यात 
15
‘साधी तक्रार पुरेशी नाही; ती पत्नीछळाचा गुन्हा ठरत नाही’; सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले?
16
क्रिकेटपटू, अभिनेते येणार आणखी अडचणीत;  ऑनलाइन बेटिंगप्रकरणी मालमत्तेवर येणार टाच
17
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
18
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
19
कोस्टल रोडवर पुन्हा अपघात; कारच्या धडकेत दोघे जखमी
20
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं

नव्या शैक्षणिक वर्षात अभ्यासक्रमाला कात्री?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2020 07:38 IST

शाळा उशिरा सुरू होण्याचा परिणाम

नवी दिल्ली : कोरोना महामारीचे संकट अद्याप टळलेले नसल्याने शाळा सुरू होण्यास दोन महिन्यांचाही विलंब होऊ शकतो, हे लक्षात घेऊन नव्या शैक्षणिक वर्षात अभ्यासक्रमाला व शाळांमध्ये घेतल्या जाणाऱ्या एकूण शैक्षणिक तासिकांना कात्री लावली जाण्याची शक्यता आहे. केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री डॉ. रमेश पोखरियाल ‘निशंक’ यांनी मंगळवारी असे संकेत देताना सांगितले की, देशातील कोरोनाची सध्याची परिस्थिती व पालक आणि शिक्षकांकडून केली जात असलेली विनंती लक्षात घेऊन वरीलप्रमाणे पाऊल उचलण्यावर आमचा विचार सुरूआहे. कदाचित १५ आॅगस्टनंतर शाळा सुरू केल्या जाऊ शकतील, या आधीच्या विचारावरही फेरविचार सुरू आहे. शाळा पुन्हा केव्हा सुरू करायच्या, याचा निर्णय आॅगस्टमधील परिस्थिती पाहूनच करावा लागेल, असे दिसते. दरम्यान, सीबीएसईच्या १० वी १२ वीचे निकाल १५ आॅगस्टपर्यंत काही दिवसांच्या अंतराने जाहीर केले जाण्याची शक्यता आहे, असेही मंत्री म्हणाले.तामिळनाडूत १० वीची परीक्षा रद्द, सर्व विद्यार्थी पासचेन्नई : तामिळनाडूत यंदाची इयत्ता १० वीची बोर्डाची परीक्षा न घेता सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याचे मानून त्यांना वरच्या वर्गात प्रवेश दिला जाईल, असे मुख्यमंत्री एडापद्दी पलानीस्वामी यांनी मंगळवारी जाहीर केले. तेलंगणा सरकारनेही सोमवारी असाच निर्णय घेतला होता. कोरोनाचा ‘लॉकडाऊन’ सुरू झाल्याने नेहमी मार्च-एप्रिलमध्ये होणारी इयत्ता १० ची बोर्डाची परीक्षा होऊ शकली नव्हती. आता ‘लॉकडाऊन’ची कठोरता खूपच कमी झाल्याने ही परीक्षा येत्या १५ जूनपासून घेण्याचे राज्य शिक्षण मंडळाने जाहीर केले होते. या परीक्षेस नऊ लाखांहून अधिक विद्यार्थी बसणार होते; परंतु कोरोनाचा धोका अद्याप पूर्णपणे टळलेला नसताना परीक्षा घेऊन विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात घालण्यावर उच्च न्यायालयाने टीका केली होती व फेरविचार करण्यास सांगितले होते.

टॅग्स :Educationशिक्षणonlineऑनलाइन