शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

नव्या शैक्षणिक वर्षात अभ्यासक्रमाला कात्री?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2020 07:38 IST

शाळा उशिरा सुरू होण्याचा परिणाम

नवी दिल्ली : कोरोना महामारीचे संकट अद्याप टळलेले नसल्याने शाळा सुरू होण्यास दोन महिन्यांचाही विलंब होऊ शकतो, हे लक्षात घेऊन नव्या शैक्षणिक वर्षात अभ्यासक्रमाला व शाळांमध्ये घेतल्या जाणाऱ्या एकूण शैक्षणिक तासिकांना कात्री लावली जाण्याची शक्यता आहे. केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री डॉ. रमेश पोखरियाल ‘निशंक’ यांनी मंगळवारी असे संकेत देताना सांगितले की, देशातील कोरोनाची सध्याची परिस्थिती व पालक आणि शिक्षकांकडून केली जात असलेली विनंती लक्षात घेऊन वरीलप्रमाणे पाऊल उचलण्यावर आमचा विचार सुरूआहे. कदाचित १५ आॅगस्टनंतर शाळा सुरू केल्या जाऊ शकतील, या आधीच्या विचारावरही फेरविचार सुरू आहे. शाळा पुन्हा केव्हा सुरू करायच्या, याचा निर्णय आॅगस्टमधील परिस्थिती पाहूनच करावा लागेल, असे दिसते. दरम्यान, सीबीएसईच्या १० वी १२ वीचे निकाल १५ आॅगस्टपर्यंत काही दिवसांच्या अंतराने जाहीर केले जाण्याची शक्यता आहे, असेही मंत्री म्हणाले.तामिळनाडूत १० वीची परीक्षा रद्द, सर्व विद्यार्थी पासचेन्नई : तामिळनाडूत यंदाची इयत्ता १० वीची बोर्डाची परीक्षा न घेता सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याचे मानून त्यांना वरच्या वर्गात प्रवेश दिला जाईल, असे मुख्यमंत्री एडापद्दी पलानीस्वामी यांनी मंगळवारी जाहीर केले. तेलंगणा सरकारनेही सोमवारी असाच निर्णय घेतला होता. कोरोनाचा ‘लॉकडाऊन’ सुरू झाल्याने नेहमी मार्च-एप्रिलमध्ये होणारी इयत्ता १० ची बोर्डाची परीक्षा होऊ शकली नव्हती. आता ‘लॉकडाऊन’ची कठोरता खूपच कमी झाल्याने ही परीक्षा येत्या १५ जूनपासून घेण्याचे राज्य शिक्षण मंडळाने जाहीर केले होते. या परीक्षेस नऊ लाखांहून अधिक विद्यार्थी बसणार होते; परंतु कोरोनाचा धोका अद्याप पूर्णपणे टळलेला नसताना परीक्षा घेऊन विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात घालण्यावर उच्च न्यायालयाने टीका केली होती व फेरविचार करण्यास सांगितले होते.

टॅग्स :Educationशिक्षणonlineऑनलाइन