शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
3
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
4
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
5
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
6
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
7
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
8
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
9
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
10
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
11
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
12
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
13
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
14
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
15
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
16
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
17
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
18
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
19
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
20
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!

या राज्यात 31 डिसेंबरपर्यंत शाळा बंदच, सरकारचा आदेश जारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2020 21:06 IST

देशात सर्वाधिक कोरोना रुग्णसंख्या असलेल्या महाराष्ट्रात शाळा सुरू करण्यासंदर्भात हालचाली सुरू आहेत. राज्यातील कोरोनाची परिस्थिती पाहूनच 23 नोव्हेंबर 2020 पासून राज्यातील शाळा चालू करण्याबाबत एसओपी तयार करण्यात आली

ठळक मुद्देदेशात सर्वाधिक कोरोना रुग्णसंख्या असलेल्या महाराष्ट्रात शाळा सुरू करण्यासंदर्भात हालचाली सुरू आहेत. राज्यातील कोरोनाची परिस्थिती पाहूनच 23 नोव्हेंबर 2020 पासून राज्यातील शाळा चालू करण्याबाबत एसओपी तयार करण्यात आली

मुंबई - देशात अनलॉक तर महाराष्ट्र शासनाने मिशन बिगेन अगेन म्हणत सर्वच क्षेत्रात पुनश्च हरिओमला सुरूवात केली आहे. वाहतुकीची साधने, प्रवास व्यवस्था, नाट्य, सिनेमागृह, बाजारपेठ सुरळीतपणे सुरू केल्या आहेत. याच पार्श्‍वभूमीवर माध्यमिक शाळेतील नववी ते बारावीचे वर्ग सुरू करण्याचा मानस शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी व्यक्त केला आहे. तर, दुसरीकडे ओडिशा सरकारने 31 डिसेंबरपर्यंत शाळा बंदच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. ओडिशा राज्य सरकारने तसा आदेशच काढला आहे.

देशात सर्वाधिक कोरोना रुग्णसंख्या असलेल्या महाराष्ट्रात शाळा सुरू करण्यासंदर्भात हालचाली सुरू आहेत. राज्यातील कोरोनाची परिस्थिती पाहूनच 23 नोव्हेंबर 2020 पासून राज्यातील शाळा चालू करण्याबाबत एसओपी तयार करण्यात आली असून त्याबाबत माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांच्या अंतिम मंजुरीनंतर शाळा सुरू करण्यात येतील, असे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी म्हटले. तर, दुसरीकडे ओडिशा राज्य सरकारने 31 डिसेंबरपर्यंत शाळा बंदच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. केवळ,  परीक्षा, प्रशासकीय कामकाज आणि मुल्यांकनासाठीच शाळा उघडण्यात येतील, असेही परिपत्रकात म्हटले आहे. त्यामुळे, ओडिशात यंदाच्या वर्षी विद्यार्थ्यांसाठी शाळा बंद राहणार असून कोरोना परिस्थिती पाहून पुढील वर्षीच शाळा सुरू करण्यात येणार आहेत. 

प्रतिबंधित क्षेत्रात नसलेल्या शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना शाळेत बोलविण्याची शक्यता आहे. कारण, ऑनलाईन क्लासेस आणि इतर कामकाजासाठी कर्मचाऱ्यांना गरजेनुसार शाळेत बोलावले जाऊ शकते. 

दरम्यान, महाराष्ट्रात कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून केंद्र व राज्य सरकारने निर्गमित केलेल्या सुचनांचे पालन करूनच शाळा सुरू करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. या संदर्भात पालकांची परवानगी घेऊनच आरोग्य विषयक उपाययोजना करूनच शाळेतील कामकाज करण्यात येईल. शालान्त माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या म्हणजे दहावी व बारावीच्या परीक्षा वेळापत्रका संदर्भात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित लक्षात घेऊन परीक्षा मंडळातर्फे परीक्षा जाहीर करण्यात येतील. विद्यार्थ्यांच्या बरोबरच शिक्षकांच्या आरोग्याच्या दृष्टीने योग्य ती काळजी घेऊन शाळा अध्ययन - अध्यापन प्रक्रिया व परीक्षा पार पाडण्यासाठी सरकार सक्षमपणे विचार करेल असे शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी नमुद केले.  

टॅग्स :Schoolशाळाcorona virusकोरोना वायरस बातम्याEducationशिक्षणOdishaओदिशा