शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
2
'ऑपरेशन सिंदूरदरम्यान काँग्रेस पाकिस्तानी सैन्याच्या बाजूने होती', पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
3
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...
4
पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास देशातून तीव्र विरोध, टीम इंडिया दबावात, ड्रेसिंग रूममधून आली अशी बातमी
5
हरमनप्रीत कौरनं रचला इतिहास; आता 'या' दिग्गज खेळाडूंसोबत घेतलं जाईल नाव!
6
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
7
BMW ने कार आणि बाईक्सच्या किमतीत केली मोठी कपात; तब्बल ₹१३.६ लाखांची होणार बचत...
8
सोन्याची विक्रमी झेप! आठवड्यात ३,३०० रुपयांनी महागले; चांदीचाही नवा उच्चांक, आजचा दर काय?
9
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
10
Sushila Karki: 'आम्ही सत्तेचा आस्वाद घेण्यासाठी आलेलो नाही, ६ महिन्यांतच...' पंतप्रधान सुशीला कार्की 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये!
11
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
12
तुमचे LPG गॅस सिलेंडरचे अनुदान बंद झाले? घरबसल्या मोबाईलवरुन करता येईल सुरू
13
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
14
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
15
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
16
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
17
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
18
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
19
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
20
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?

चाइल्ड लाइनमुळे शाळांचे वास्तव उघड, सुप्रीम कोर्ट गंभीर; निर्देशांचे कठोर पालन करण्याची ताकीद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2017 01:24 IST

शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत केंद्र सरकारने दिलेल्या निर्देशांचे शाळांमधे कसोशीने पालन होते की नाही, याकडे सर्व राज्यांनी कटाक्षाने लक्ष द्यावे

सुरेश भटेवरा नवी दिल्ली : शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत केंद्र सरकारने दिलेल्या निर्देशांचे शाळांमधे कसोशीने पालन होते की नाही, याकडे सर्व राज्यांनी कटाक्षाने लक्ष द्यावे, अशी सक्त ताकीद भारताचे सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या खंडपीठाने राज्यांच्या मुख्य सचिवांना दिली आहे.दिल्लीजवळ गुरूगावच्या रायन इंटरनॅशनल शाळेत सात वर्षांच्या प्रद्युम्नची निर्घृण हत्या झाल्यानंतर शालेय परिसरात विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत कठोर उपायांच्या अंमलबजावणीचा आग्रह धरणाºया अनेक याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाल्या आहेत. प्रत्येक राज्य सरकारने सदर याचिकांबाबत आपले मत व भूमिका सादर करण्याचे आदेश खंडपीठाने दिले आहेत.‘चाइल्ड लाइन’ या शालेय विद्यार्थ्यांसाठी काम करणाºया स्वयंसेवी संस्थेच्या ताज्या सर्वेक्षणाचे निष्कर्ष सर्वांच्याच डोळयात अंजन घालणारे आहेत. सर्वेक्षणाचे ठळक निष्कर्ष पुढीलप्रमाणे आहेत. देशातील फक्त १0 टक्के शाळांमधे मुलामुलींच्या सुरक्षतेविषयी निश्चित धोरण आहे आणि लैंगिक शोषणापासून लहान मुलांच्या संरक्षणासाठी अवघ्या १ टक्का शाळांमधे काही उपाययोजना अस्तित्वात आहेत. देशात केवळ २८ टक्के शाळा अशा आहेत की जिथे विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहांची सोय आहे.लॉबीपुढे सरकारे हतबल-भारतीय शाळांचे दारुण वास्तव चाइल्ड लाइनच्या सर्वेक्षणातून समोर आले आहे. खासगी शाळांची एक प्रभावशाली लॉबी आहे. बहुतेक राज्य सरकारांनी या लॉबीपुढे गुडघे टेकले आहेत. कारण, यापैकी बहुतांश शाळांचे व्यवस्थापन हे प्रभावशाली व्यक्तींच्या हाती आहे. मुलांच्या संरक्षणाविषयीचे अनेक नियम या शाळांमधे धाब्यावर बसवले जातात. .

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय