शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

'प्रेझेन्ट सर' नाही, 'जय हिंद' म्हणा; देशप्रेमाच्या शिकवणीसाठी शाळांची अजब तऱ्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2019 13:44 IST

हल्ली जिकडे तिकडे देशभक्तीचे वारे वाहू लागले आहेत. भावी पिढीत जन्मभूमी, कर्मभूमीचे संस्कार आणि देशभक्तीचे बाळकडू सुरुवातीपासूनच रुजावेत म्हणून निरनिराळ्या पद्धतीनं उपक्रम राबवले जात आहेत.

ठळक मुद्देजय हिंद अथवा जय भारत म्हणावे, सर्व शाळांसाठी आदेश जारीशिक्षण मंत्र्यांचा आढावा बैठकीत निर्णयइयत्ता पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांना करावं लागणार आदेशाचं पालन

अहमदाबाद -  हल्ली जिकडे तिकडे देशभक्तीचे वारे वाहू लागले आहेत. भावी पिढीत जन्मभूमी, कर्मभूमीचे संस्कार आणि देशभक्तीचे बाळकडू सुरुवातीपासूनच रुजावेत म्हणून निरनिराळ्या पद्धतीनं उपक्रम राबवले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर देशभक्तीचा प्रचार आणि प्रसार व्हावा, यासाठी गुजरातमधीलशाळांमध्ये विद्यार्थ्यांना हजेरी लावताना येस सर/मॅडम किंवा प्रेझेंट सर/मॅडम म्हणण्याऐवजी आता 'जय हिंद' अथवा 'जय भारत' बोलावे लागणार आहे. देशभक्तीचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी शिक्षण विभागाकडून जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेमध्ये ही बाब नमूद करण्यात आली आहे. 

प्राथमिक शिक्षण संचालनालय आणि गुजरात माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (GSHSEB) यासंदर्भात अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या अधिसूचनेत सांगण्यात आले आहे की, इयत्ता पहिली ते इयत्ता बारावीतील विद्यार्थ्यांना 'जय हिंद' अथवा 'जय भारत' बोलून हजेरी लावावी लागणार आहे. सरकारी शाळा, अनुदानित तसंच विनाअनुदानित शाळांना या अधिसूचनेचं पालन करण्याचे आदेश देण्यात आले आहे. 1 जानेवारी 2019पासून या अधिसूचनेच पालन करण्याचेही निर्देश देण्यात आले आहे.  

 

(शाळा झाल्या डिजिटल, विद्यार्थी झाले तंत्रस्नेही; शिक्षण विभागाची माहिती)

मुला-मुलींमध्ये लहानपणापासूनच देशभक्ती रुजावी, या उद्देशानं संबंधित निर्णय घेण्यात आल्याचे अधिसूचनेत स्पष्ट करण्यात आले आहे. यासंदर्भात सोमवारी (31 डिसेंबर) झालेल्या आढावा बैठकीत राज्य शिक्षण मंत्री भूपेंद्र सिंह चुदासमा यांनी हा निर्णय घेतला.

(नको शाळा, नको पाटी : होम स्कूलिंगची पहाट)जिल्हा शिक्षण अधिकाऱ्यांनाही अधिसूचनेची प्रत पाठवण्यात आल्या आहेत, सोबत 1 जानेवारीपासून या आदेशाचं पालन करण्यात यावे, अशी सूचनाही देण्यात आली आहे.

विद्यार्थ्यांना मारहाणदरम्यान, काही दिवसांपूर्वी शाळेच्या मुख्याध्यापकांनी कथित स्वरुपात विद्यार्थ्यांना मारहाण केल्याचे वृत्त समोर आले होते. इस्लामिक पद्धतीने अभिवादन न करता गुड मॉर्निंग म्हटल्यानं मुख्याध्यापकांकडून विद्यार्थ्यांना मारहाण करण्यात आली, अशी माहिती समोर आली होती. हे प्रकरण उत्तर प्रदेशातील शाहजहापूर येथील आहे. मुख्याध्यापक चांद मियाँ यांना जेव्हा आम्ही विद्यार्थी गुड मॉर्निंग म्हणत असू, तेव्हा ते आम्हाला  'अस्सलाम वालेकुम' म्हणण्याची सक्ती करायचे, अशी तक्रार विद्यार्थ्यांनी तपास अधिकाऱ्यांकडे केली होती. या प्रकरणाच्या तपासणीदरम्यान मुख्याध्यापक दोषी आढळल्यानं त्यांच्याविरोधात निलंबनाची कारवाई करण्यात आली. 

टॅग्स :GujaratगुजरातSchoolशाळाEducationशिक्षण