शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
2
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
3
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
4
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
5
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
6
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
7
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
8
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
9
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम
10
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
11
‘ते म्हणतील चंद्रावर सर्वप्रथम मारुती गेला होता’, इंडिया आघाडीतील नेत्या कनिमोळींचं विधान  
12
'संजय राऊतांसारखा बिनडोक राजकारणी महाराष्ट्रात होणे नाही', राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची टीका
13
Smriti Mandhana Run Out : चुकली अन् फसली! शतकी भागीदारीनंतर स्मृती-प्रतिका हिट जोडी फुटली!
14
ITR भरण्यासाठी फक्त एक दिवस उरला; पण, 'या' कारणांमुळे करदाते टेन्शनमध्ये; मुदतवाढीसाठी सोशल मीडियावर ट्रेंड
15
शिक्षिकेचा जडला महिला मुख्याध्यापकावर जीव, प्रेम मिळवण्यासाठी AI टूल्स वापरून रचला भयानक खेळ
16
IND vs PAK: भारत- पाकिस्तान यांच्यातील ५ टी-२० सामन्यांचा रेकॉर्ड, कुणाचं पारडं जड?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
18
बाहेर ‘झटपट कॉम्प्युटर शिका’ची पाटी, आत वेगळाच खेळ, सापडल्या ९ तरुणी, ४ पुरुष आणि...
19
परी म्हणू की सुंदरा... Gemini Prompt ने 'असा' करा ९० च्या दशकातील 'रेट्रो साडी लूक'
20
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...

Assembly Election Result 2022: घोटाळ्यांनी बरबटलेले लोक भ्रष्टाचारविरोधी कारवाई करणाऱ्या संस्थांना बदनाम करतायत, मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2022 21:28 IST

Assembly Election Result 2022 : मोदी म्हणाले, देशाच्या पैशांवर डल्लामारून आपली तिजोरी भरण्याची प्रवृत्ती काही लोकांमध्ये तयार झाली आहे. देशातील जनतेना आम्हाला संधी दिली. देशाला आमच्याकडून अपेक्षा आहेत. मोदी सरकारच भ्रष्टाचार कमी करू शकते, अशी आशा जनतेला आहे. 

नवी दिल्ली - देशातील काही लोक भ्रष्टाचाराविरोधातील कारवाया रोखण्याचा प्रयत्न करत आहेत. आपण पाहत आहात, की ज्या संस्था भ्रष्टाचाराविरोधात कारवाई करत आहेत, हे लोक आणि त्यांचे इकोसिस्टिम, त्या संस्थांनाच बदनाम करण्यासाठी मैदानात येत आहेत. घोटाळ्याने बरबटलेले हे लोक एकत्रित येऊन, आपल्या इकोसिस्टिमच्या मदतीने या संस्थांवर दबाव टाकत आहे, हे देशाचे दुर्दैव आहे, अशा शब्दात पंतप्रधान मोदी यांनी आज विरोधकांवर हल्ला चढवला. ते दिल्ली येथील भजपच्या मुख्यालयातून बोलत होते. 

आज देशातील उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, मणिपूर आणि गोवा या पाच राज्यांत झालेल्या विधानसभा निवडणुकीचे निकाल (Assembly Election Result 2022) जाहीर झाले. यांपैकी पंजाब वगळता चार राज्यांत भाजपला घवघवीत यश मिळाले. विशेष म्हणजे या चारही राज्यांत जनतेने भाजपला पुन्हा संधी दिली. भाजपच्या या चारही राज्यांतील बंपर विजयानंतर आज भाजपाच्या दिल्ली येथील मुख्यालयात जल्लोष करण्यात आला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कार्यकर्त्यांना आणि देशातील जनतेला संबोधित केले.

यावेळी, मला सांगा, भष्टाचाऱ्यांवर कारवाई व्हायला हवी की नको? असा सवाल करत मोदी म्हणाले, देशाच्या पैशांवर डल्लामारून आपली तिजोरी भरण्याची प्रवृत्ती काही लोकांमध्ये तयार झाली आहे. देशातील जनतेना आम्हाला संधी दिली. देशाला आमच्याकडून अपेक्षा आहेत. मोदी सरकारच भ्रष्टाचार कमी करू शकते, अशी आशा जनतेला आहे. 

हे लोक, तपास संस्थांवर दबाव टाकण्यासाठी आपल्या इको सिस्टिमच्या माध्यमाने नव-नव्या पद्धती शोधून काढतात. यांना न्यायपालिकांवरही विश्वास नाही. आधी हजारो कोटींचा घोटाळा करायचा, तपासही होऊ द्यायचा नाही आणि होत असेलच तर संबंधित संस्थांवर दबाव टाकायचा, अशी या लोकांची पवृत्ती झाली आहे. एवढेच नाही, तर हे लोक एखाद्यावर कारवाई झाली, की त्याला एखाद्या जातीशी अथवा संप्रदायाशी जोडतात. मी लोकांना आवाहन करतो की, अशा भ्रष्टाचाऱ्यांना आपल्या जातीपासून, संप्रदायापासून वेगळ करा. यामुळे समाजाचे कल्याण होईल, असेही मोदी म्हणाले.

उत्तर प्रदेशात आमच्या विजयाचे कारण हेही आहे, की येथील लोकांनी असे राजकारण सहन केले आहे. येथील लोकांच्या प्रेमाने मलाही उत्तर प्रदेशचे बनविले आहे. मी माझ्या अनुभवावरून सांगतो की, जातींना, संप्रदायांला बदनाम करणाऱ्यांपासून दूर रहायचे आणि राज्याच्या विकासालाच प्राधान्य द्यायचे, हे या लोकांनी निश्चित केले आहे, असेह मोदी यावेळी म्हणाले. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाdelhiदिल्लीElectionनिवडणूकUttar Pradeshउत्तर प्रदेशUttar Pradesh Assembly Election 2022उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२