शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: नगरपरिषदेत चुरशीची लढाई: ठाकरेंच्या शिवसेनेने खाते उघडले, काँग्रेसही आघाडीवर; पहा लेटेस्ट अपडेट
2
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
3
Nagar Parishad Election Result: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
4
घर खरेदीचे स्वप्न होणार साकार! 'ही' बँक देतेय स्वस्त होम लोन; ५० लाखांच्या कर्जासाठी किती हवी सॅलरी?
5
नात्याला काळीमा! विमा पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
6
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
7
Nora Fatehi : "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती?
8
घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली...
9
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
10
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
11
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
12
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
13
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
14
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
15
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
16
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
17
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
18
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
19
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
20
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी सरकार धोक्यात?; सुप्रीम कोर्टानं पाठवली केंद्र अन् राज्य सरकारला नोटीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2021 17:23 IST

Mamata Banerjee government in trouble: पश्चिम बंगालमधील हिंसाचाराच्या घटनांची एसआयटी स्थापन करून चौकशी करावी अशी मागणीही याचिकेत करण्यात आली.

ठळक मुद्देसुप्रीम कोर्टाने आज केंद्र सरकार, पश्चिम बंगाल आणि निवडणूक आयोगाला नोटीस जारी केले आहे. राज्यात निवडणुकीच्या पार्श्वभूमी झालेल्या हिंसाचारातील पीडित आणि त्यांच्या कुटुंबीयांना नुकसान भरपाईही देण्याची मागणी कलम ३५५, कलम ३५६ याचा वापर करण्याचा केंद्र सरकारला आदेश द्यावेत, याचिकाकर्त्यांची मागणी

नवी दिल्ली – पश्चिम बंगाल निवडणुकीच्या निकालानंतर झालेल्या हिंसाचारात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला. या घटनेनंतर पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवटीची मागणी करणाऱ्या याचिकेवर सुनावणीसाठी सुप्रीम कोर्ट तयार झाल्यानं ममता बॅनर्जी सरकारला मोठा धक्का बसला आहे. याचिकेत पश्चिम बंगालमध्ये सामान्य परिस्थिती निर्माण करण्यासाठी प्रशासकीय अधिकारी, सुरक्षा दलाची मदत घेण्याची विनंती करण्यात आली होती.

पश्चिम बंगालमधील हिंसाचाराच्या घटनांची एसआयटी स्थापन करून चौकशी करावी अशी मागणीही याचिकेत करण्यात आली. यावर सुप्रीम कोर्टाने आज केंद्र सरकार, पश्चिम बंगाल आणि निवडणूक आयोगाला नोटीस जारी केले आहे. न्या. विनित सरन आणि न्या. दिनेश माहेश्वरी यांनी यावर सुनावणी घेतली. राज्यात निवडणुकीच्या पार्श्वभूमी झालेल्या हिंसाचारातील पीडित आणि त्यांच्या कुटुंबीयांना नुकसान भरपाईही देण्याची मागणी करण्यात आली आहे.

सुप्रीम कोर्टाच्या खंडपीठाने सांगितले की, आम्ही या याचिकेतील प्रतिवादी केंद्र सरकार, पश्चिम बंगाल सरकार आणि निवडणूक आयोग तिघांनाही नोटीस जारी करत आहे. या खंडपीठाने प्रतिवादी तृणमूल काँग्रेच्या अध्यक्षा आणि विद्यमान मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना नोटीस जारी केले नाही. याचिकाकर्ते विष्णू शंकर जैन यांनी दाखल केलेल्या याचिकेत पश्चिम बंगालच्या हजारो नागरिकांना भाजपाचं समर्थन केल्यामुळे टीएमसीच्या कार्यकर्त्यांकडून धमक्या देण्यात आल्या असा आरोप केला आहे.

याचिकेत म्हटलंय की, याचिकाकर्ता पश्चिम बंगालमधील त्या हजारो नागरिकांच्या हितासाठी पुढाकार घेत आहेत. ज्यामध्ये हिंदूंचा समावेश आहे. भाजपाचं समर्थन केल्यामुळे मुस्लीम नागरिकांकडून त्यांना निशाणा बनवण्यात येत आहे. भारताच्या अखंडतेला धक्का पोहचेल अशी स्थिती राज्यात २ मे नंतर झाली आहे. त्यामुळे कलम ३५५, कलम ३५६ याचा वापर करण्याचा केंद्र सरकारला आदेश द्यावेत. राज्यात टीएमसी कार्यकर्त्यांकडून अराजकता माजवली जात आहे. हिंदूंच्या घरांना आग लावणे, दरोडा टाकणे असं कृत्य करण्यात येत आहेत कारण या लोकांनी भाजपाचं समर्थन केले होते. हिंसाचारात १५ भाजपा कार्यकर्त्यांची आणि समर्थकांचा जीव गेला असून अनेकजण गंभीर झाल्याचं म्हटलं आहे.  

 पश्चिम बंगाल सरकारवर आरोप

याचिकेत आरोप लावण्यात आला आहे की, विधानसभा निवडणुकीच्या काळात टीएमसीने मुस्लिमांना भावनिक, एकजुट राहण्याचं आवाहन करत चांगल्या भविष्यासाठी पक्षाला मतदान करण्याचं आवाहन केले होते. धर्माच्या आधारावर या निवडणुका लढल्या गेल्या. सुप्रीम कोर्ट पश्चिम बंगालमध्ये झालेल्या हिंसाचाराच्या घटनांशी निगडीत अनेक याचिकांवर सुनावणी करत आहे.  

टॅग्स :west bengalपश्चिम बंगालMamata Banerjeeममता बॅनर्जीBJPभाजपाSupreme Courtसर्वोच्च न्यायालयElectionनिवडणूक