शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

पदवी अंतिम वर्ष परीक्षांच्या याचिकेची सुनावणी १८ ऑगस्टला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2020 06:52 IST

विद्यापीठ अनुदान आयोग स्वत:च्या भूमिकेवर ठाम

नवी दिल्ली : कोरोनाची साथ असूनही पदवीसाठी अंतिम वर्षाच्या परीक्षा विद्यापीठांनी घ्यायलाच हव्यात या ठाम भूमिकेत विद्यापीठ अनुदान आयोगाने कोणताही बदल केला नसून, त्याला विरोध करणाऱ्या याचिकेची सर्वोच्च न्यायालयातील पुढील सुनावणी आता १८ ऑगस्टला होणार आहे.कोरोनाच्या रुग्णांची संख्या देशात वाढत असताना पदवी अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्यास विद्यार्थ्यांनी विरोध केला आहे. विद्यार्थ्यांचे आरोग्याला धोका पोहोचेल, असा कोणताही निर्णय घेण्यात येऊ नये ही केलेली विनंती विद्यापीठ अनुदान आयोगाने मान्य न केल्याने मग विद्यार्थ्यांनी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली.या प्रकरणी दिल्ली व महाराष्ट्र सरकारने सादर केलेल्या प्रतिज्ञापत्राला उत्तर देताना विद्यापीठ अनुदान आयोगाने १३ ऑगस्ट रोजी न्यायालयाला सांगितले की, पदवीच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय विद्यार्थ्यांच्या हिताचा नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांचे भविष्यात शैक्षणिक नुकसानही होऊ शकते. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित लक्षात घेऊनच पदवीच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्यास परवानगी देण्यात आली आहे असे केंद्रीय गृह मंत्रालयाने न्यायालयाला सांगितले. कोरोनाच्या साथीमुळे पदवीच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा आम्ही घेणार नाही असे प्रतिज्ञापत्र दिल्ली व महाराष्ट्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात सादर केले होते. युवा सेना या संघटनेच्या वतीने ज्येष्ठ विधीज्ञ श्याम दिवाण यांनी न्यायालयाला सांगितले की, पदवीच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा घ्याव्यात हा निर्णय केंद्र सरकारला बंधनकारक करता येणार नाही.हा तर आयुष्य व आरोग्याचा प्रश्नकायदा शाखेच्या एका विद्यार्थ्याने विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्णयाविरोधात ही याचिका दाखल केली आहे.या विद्यार्थ्याच्या वतीने बाजू मांडताना ज्येष्ठ विधीज्ञ अभिषेक मनू सिंघवी यांनी सर्वोच्च न्यायालयाला सांगितले की, हा केवळ परीक्षांचा नाही तर आयुष्य व आरोग्याचाही प्रश्न आहे.महाराष्ट्र, पंजाब, पश्चिम बंगाल, राजस्थान, ओदिशा आदी राज्यांनी पदवीच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा न घेण्याचे ठरविले आहे याकडे त्यांनी न्यायालयाचे लक्ष वेधले.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय