शहरं
Join us  
Trending Stories
1
SA Won WTC Final 2025 : एडन मार्करमचे धमाकेदार शतक!! द. आफ्रिकेने रचला इतिहास; कांगारुंना हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी
2
Maharashtra Rain Alert: कोकणाला रेड अलर्ट! मुंबई-ठाण्यासह 'या' जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा
3
अमेरिका, रशिया, ब्रिटन अणि फ्रान्स...; इस्रायल-इराण युद्धात कोणता देश कुणाच्या बाजूने? समोर आली लिस्ट
4
Ahmedabad Plane Crash : कॅन्सरने आईला हिरावून नेलं, अपघातामुळे वडिलांचं छत्र हरपलं; १८ दिवसांत २ चिमुकल्या अनाथ
5
आम्ही असीम मुनीरला बोलावलेलेच नाही; अमेरिकेचा खुलासा, पाकिस्तान तोंडावर आपटला
6
काव्या मारन विवाहबंधनात अडकणार? हा प्रसिद्ध संगीतकार करतोय डेट, रजनीकांत बोलणी करायला... 
7
Video: वेदनने कळवळला, धावताना लंगडला... पण तरीही टेम्बा बवुमा ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना नडला, ठोकलं झुंजार अर्धशतक
8
Ashadhi Wari 2025: आषाढी वारीसाठी निघणाऱ्या प्रत्येक दिंडीला सरकारकडून आर्थिक अनुदान जाहीर
9
अहमदाबाद विमान अपघात की अन्य काही?; उच्चस्तरीय समितीला तपासासाठी सरकारने दिली डेडलाईन
10
Ahmedabad Plane Crash : शेतकरी वडिलांनी कर्ज काढून लेकाला शिकवलं पण अपघातामुळे डॉक्टर होण्याआधीच सारं संपलं
11
हा कसला संयोग! २७ वर्षापूर्वी भीषण अपघातात '11 A' सीटमुळेच वाचला होता आणखी एकाचा जीव
12
"आम्ही बॅग आणि साड्यांमध्ये लोकांचे अवयव ठेवले"; अपघातानंतर मदत करणाऱ्याने सांगितली आपबिती
13
Coastal Road Tunnel Accident Video: रस्त्यावरून घसरली, कठड्यावर धडकली; कोस्टल रोड बोगद्यात भीषण अपघात
14
Ahmedabad Plane Crash : ते सरप्राईज ठरलं शेवटचं! विमान अपघातात मुलाचा आणि सुनेचा मृत्यू, वडिलांना आता एकच आशा
15
देशातील सर्वात मोठ्या सरकारी बँकेनं ग्राहकांना दिलं गिफ्ट, कमी केले कर्जाचे व्याजदर; पटापट पाहा लेटेस्ट दर
16
संकष्ट चतुर्थी 2025: असं करा गणपती पूजन; जाणून घ्या, शुभ मुहूर्त, पूजा विधी, मान्यता आणि चंद्रोदयाची वेळ
17
EXCLUSIVE: 'कोस्टल वॉकवे' मुंबईकरांच्या विरंगुळ्याचं नवं हक्काचं ठिकाण, आयुक्त भूषण गगराणींसोबत खास सफर
18
Bacchu Kadu Hunger Strike: अन्नत्याग आंदोलन स्थगित! बच्चू कडूंना महायुती सरकारने दिली तीन आश्वासने
19
इराण इस्रायल तणावामुळे भारताला किती नुकसान, कच्चं तेल आणि शेअर बाजारावर काय परिणाम होणार?
20
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशी आणि बॉयफ्रेंड राज कुशवाहचा २ वर्षांपूर्वीचा फोटो, चेहऱ्यावर दिसतोय आनंद

पुरावा नसताना आरोपी म्हणून समन्स काढणे ही गंभीर बाब; सर्वोच्च न्यायालयाचे स्पष्ट मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2021 08:09 IST

सर्वोच्च न्यायालयाने फौजदारी गुन्ह्यात पुरावा नसताना आरोपीविरुद्ध समन्स काढणे गंभीर असल्याचे मत व्यक्त केले आहे.

ठळक मुद्देप्रत्येक आरोपीच्या सक्रिय सहभागाबद्दल स्वतंत्र पुरावे आवश्यकआवश्यक पुरावे नसताना आरोपींना समन्स काढणे गंभीर बाबसुप्रीम कोर्टाने स्पष्ट केले मत

डॉ. खुशालचंद बाहेती

नवी दिल्ली : एखाद्या व्यक्तीला आरोपी म्हणून समन्स काढण्यापूर्वी न्यायालयाने त्यांचे विरुद्ध प्रथमदर्शनी खटला उभा राहू शकतो याचे समाधान करून घेतले पाहिजे व तसे नोंदवले पाहिजे. सर्वोच्च न्यायालयाने फौजदारी गुन्ह्यात पुरावा नसताना आरोपीविरुद्ध समन्स काढणे गंभीर असल्याचे मत व्यक्त केले आहे.

मंगळोर-बाजपे जुना विमानतळ रस्त्यावर रवींद्रनाथ बाजपे यांच्या जमिनीखालून पाईपलाईन टाकण्यासाठी मंगळोर स्पेशल इकाॅनॉमिक झोन लिमिटेड कंपनी हैद्राबादतर्फे शेतातील झाडे तोडली. संरक्षक भिंतीचे नुकसान केले व विचारपूस करता धमकी दिली म्हणून त्यांनी न्यायालयात खाजगी तक्रार दाखल केली. यांत कंपनीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक, काम करणारे गुत्तेदार इत्यादी मिळून १३ आरोपींविरुद्ध ४२७ (नुकसान), ४४७(अनधिकृत प्रवेश), ५०६ (धमकी) आयपीसी गुन्हयाची तक्रार होती. न्यायालयाने त्यांचा जबाब शपथेवर नोंदवला व आरोपींविरुद्ध समन्स जारी केले. 

याविरुद्ध कंपनीच्या संचालकांनी सत्र न्यायालयात अपील केले. सत्र न्यायालयाने प्रत्यक्ष काम करणारे गुत्तेदार व देखरेख करणारे वगळता इतरांवरील समन्स रद्द केले. हा निर्णय उच्च न्यायालयानेही योग्य ठरवला. याविरुद्ध रवींद्रनाभा यांनी सर्वोच्च न्यायालयात अपील केले. हे अपील फेटाळताना सर्वोच्च न्यायालयाने कंपनीचे संचालक घटनेच्या वेळी हैद्राबादमध्ये होते. त्यांच्या प्रत्यक्ष सहभागाचे पुरावे नसताना काढलेले समन्स चुकीचे आहेत म्हणत अपील फेटाळले. प्रत्यक्ष काम करणाऱ्यांविरुद्ध खटला चालू ठेवण्यास परवानगी दिली. समन्ससाठी फक्त तक्रारदाराचा शपथेवरील जबाब, न्यायालयाने नोंदवलेला जबाब व त्याने सादर केलेली कागदपत्रे पुरेशी आहेत हा युक्तिवाद सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला.

- आरोपींना समन्स काढण्यासाठी तक्रारीतील आरोप व शपथेवर नोंदवलेला जबाब पुरेसा नाही.

- प्रत्येक आरोपीच्या सक्रिय सहभागाबद्दल स्वतंत्र पुरावे आवश्यक.

- सर्वच फौजदारी प्रकरणांत अप्रत्यक्ष जबाबदारी निश्चित होत नाही. विशिष्ट तरतूद असणाऱ्या कायद्यात ती होऊ शकते.

- आवश्यक पुरावे नसताना आरोपींना समन्स काढणे गंभीर बाब.

- फौजदारी प्रक्रिया इतक्या सहजपणे गतिमान करता येणार नाही. (न्या. एम. आर. शाह आणि ए. एस. बोपण्णा) 

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयPoliceपोलिस