शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
8
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
9
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
10
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
11
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
12
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
13
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
14
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
15
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
16
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
17
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

पुरावा नसताना आरोपी म्हणून समन्स काढणे ही गंभीर बाब; सर्वोच्च न्यायालयाचे स्पष्ट मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2021 08:09 IST

सर्वोच्च न्यायालयाने फौजदारी गुन्ह्यात पुरावा नसताना आरोपीविरुद्ध समन्स काढणे गंभीर असल्याचे मत व्यक्त केले आहे.

ठळक मुद्देप्रत्येक आरोपीच्या सक्रिय सहभागाबद्दल स्वतंत्र पुरावे आवश्यकआवश्यक पुरावे नसताना आरोपींना समन्स काढणे गंभीर बाबसुप्रीम कोर्टाने स्पष्ट केले मत

डॉ. खुशालचंद बाहेती

नवी दिल्ली : एखाद्या व्यक्तीला आरोपी म्हणून समन्स काढण्यापूर्वी न्यायालयाने त्यांचे विरुद्ध प्रथमदर्शनी खटला उभा राहू शकतो याचे समाधान करून घेतले पाहिजे व तसे नोंदवले पाहिजे. सर्वोच्च न्यायालयाने फौजदारी गुन्ह्यात पुरावा नसताना आरोपीविरुद्ध समन्स काढणे गंभीर असल्याचे मत व्यक्त केले आहे.

मंगळोर-बाजपे जुना विमानतळ रस्त्यावर रवींद्रनाथ बाजपे यांच्या जमिनीखालून पाईपलाईन टाकण्यासाठी मंगळोर स्पेशल इकाॅनॉमिक झोन लिमिटेड कंपनी हैद्राबादतर्फे शेतातील झाडे तोडली. संरक्षक भिंतीचे नुकसान केले व विचारपूस करता धमकी दिली म्हणून त्यांनी न्यायालयात खाजगी तक्रार दाखल केली. यांत कंपनीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक, काम करणारे गुत्तेदार इत्यादी मिळून १३ आरोपींविरुद्ध ४२७ (नुकसान), ४४७(अनधिकृत प्रवेश), ५०६ (धमकी) आयपीसी गुन्हयाची तक्रार होती. न्यायालयाने त्यांचा जबाब शपथेवर नोंदवला व आरोपींविरुद्ध समन्स जारी केले. 

याविरुद्ध कंपनीच्या संचालकांनी सत्र न्यायालयात अपील केले. सत्र न्यायालयाने प्रत्यक्ष काम करणारे गुत्तेदार व देखरेख करणारे वगळता इतरांवरील समन्स रद्द केले. हा निर्णय उच्च न्यायालयानेही योग्य ठरवला. याविरुद्ध रवींद्रनाभा यांनी सर्वोच्च न्यायालयात अपील केले. हे अपील फेटाळताना सर्वोच्च न्यायालयाने कंपनीचे संचालक घटनेच्या वेळी हैद्राबादमध्ये होते. त्यांच्या प्रत्यक्ष सहभागाचे पुरावे नसताना काढलेले समन्स चुकीचे आहेत म्हणत अपील फेटाळले. प्रत्यक्ष काम करणाऱ्यांविरुद्ध खटला चालू ठेवण्यास परवानगी दिली. समन्ससाठी फक्त तक्रारदाराचा शपथेवरील जबाब, न्यायालयाने नोंदवलेला जबाब व त्याने सादर केलेली कागदपत्रे पुरेशी आहेत हा युक्तिवाद सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला.

- आरोपींना समन्स काढण्यासाठी तक्रारीतील आरोप व शपथेवर नोंदवलेला जबाब पुरेसा नाही.

- प्रत्येक आरोपीच्या सक्रिय सहभागाबद्दल स्वतंत्र पुरावे आवश्यक.

- सर्वच फौजदारी प्रकरणांत अप्रत्यक्ष जबाबदारी निश्चित होत नाही. विशिष्ट तरतूद असणाऱ्या कायद्यात ती होऊ शकते.

- आवश्यक पुरावे नसताना आरोपींना समन्स काढणे गंभीर बाब.

- फौजदारी प्रक्रिया इतक्या सहजपणे गतिमान करता येणार नाही. (न्या. एम. आर. शाह आणि ए. एस. बोपण्णा) 

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयPoliceपोलिस