शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
6
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
7
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
8
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
9
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
10
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
11
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
12
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
13
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
14
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
15
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
16
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
17
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
18
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
19
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

Corona : सरकारच्या तयारीची सर्वोच्च न्यायालयाकडू प्रशंसा; म्हणाले, विरोधकही करतायेत कौतुक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2020 18:02 IST

सरन्यायाधीश एस. ए. बोबडे यांच्या खंडपीठाने एका प्रकरणाची सुनावणी करताना म्हटले आहे, की कोरोना व्हायरसचा सामना करण्यासाठी सरकार आवश्यक ती सर्व प्रकारची पावले उचलत असल्याचे संपूर्ण देशाने मान्य केले आहे. सरकार अत्यंत चांगल्या प्रकारे काम करत आहे. 

ठळक मुद्देसरकारने कोरोनाचा सामना करण्यासाठी योग्य पावले उचलली - सर्वोच्च न्यायाल सर्वोच्च न्यायालयात दाखल एका याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने हे मत मांडले सरकारने योग्य प्रकारे काम केले, हे विरोधकांनीही मान्य केले आहे - सर्वोच्च न्यायालय

नवी दिल्ली - कोरोना व्हायरसचा सामना करण्यासाठी सरकारने ज्या पद्धतीने पावले उचली आहेत, त्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने सरकारचे कौतुक केले आहे. सरकार आवश्यक ती सर्वप्राकारची पावले उचलत आहे आणि विरोधकही सरकारच्या कामाची प्रशंसा करत आहेत, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.

सरन्यायाधीश एस. ए. बोबडे यांच्या खंडपीठाने एका प्रकरणाची सुनावणी करताना म्हटले आहे, की कोरोना व्हायरसचा सामना करण्यासाठी सरकार आवश्यक ती सर्व प्रकारची पावले उचलत असल्याचे संपूर्ण देशाने मान्य केले आहे. सरकार अत्यंत चांगल्या प्रकारे काम करत आहे. 

सर्वोच्च न्यायालयात दाखल एका याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने हे मत मांडले आहे. कोरोना व्हायरसचा सामना करण्यासाठी सरकारला आणखीही काही आवश्यक पावले उचलण्यास सांगण्यात यावे, अशी मागणी या याचिकेत करण्यात आली होती. या याचिकेत 'कोविड 19'च्या टेस्ट करणाऱ्या लॅबची संख्याही वाढविण्याची मागणी करण्यात आली होती. सुनवणीनंतर न्यायालयाने लॅब टेस्टिंग सेंटरची संख्या वाढविण्यासंदर्भातील याचिका सरकारकडे रेफर केली आहे. 

आम्ही संतुष्ट सर्वोच्च न्यायालय -

सरन्यायाधिशांच्या अध्यक्षतेखालील या पीठाने म्हटले आहे, की 'कोरोनाचा सामना करण्यासाठी सरकारने जी पावले उचलली आहेत त्यावर आम्ही संतुष्ट आहोत. उद्भवलेल्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी अत्यंत वेगाने पावले उचलली गेली. सरकारने योग्य प्रकारे काम केले, हे विरोधकांनीही मान्य केले आहे. हे राजकारण नव्हे तथ्य आहे.' न्यायमूर्ती एल. एन राव आणि सूर्यकांत देखील या पीठाचे सदस्य होते.

यावेळी, आवश्यक सुनावणीसाठी कोणते वकील सर्वोच्च न्यायालयाच्या परिसरात जातील, याची जबाबदारी सर्वोच्च न्यायालयाच्या बार असोसिएशनच्या अध्यक्षांवर असेल.

देशातील कोरोना बाधितांची संख्या 415 वर -

देशात आतापर्यंत जवळपास 415 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 8 जणांचा या व्हायरसमुळे मृत्यू झाला आहे. जगभरात कोरोनाची लागण झालेल्यांचा आकडा आता 3 लाख 45 हजारांवर पोहोचला आहे. तर 14 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसdelhiदिल्लीSupreme Courtसर्वोच्च न्यायालयNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाIndiaभारत