शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
2
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
3
देशविरोधी शक्तींसोबत मिळून भारतात षडयंत्र रचलं जातंय; भाजपाचा राहुल गांधींवर गंभीर आरोप
4
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
5
पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर, जिचं नाव कायम चर्चेत; किती संपत्तीची आहे मालकीण?
6
१०० हून अधिक देशांमध्ये २०,००० स्टोअर्स, जागतिक विक्रीत २ टक्के वाढ; तरी का काढलंय विकायला?
7
अमेरिकेतील महापौर भारतातील महापौरापेक्षा किती पावरफुल असतो? जगभर इतकी चर्चा का होते?
8
"मी तेजश्रीच्या लग्नासाठी उत्सुक...", सुबोध भावे असं म्हणताच अभिनेत्री काय म्हणाली?
9
“उद्धव ठाकरेंचा निवडणुकीसाठी दौरा, CM असताना शेतकऱ्यांना काय दिले?”; शिंदे गटाचा पलटवार
10
Bigg Boss 19: 'बिग बॉस हिंदी'कडून मराठमोळ्या प्रणित मोरेवर अन्याय? शोसाठी मिळालं सगळ्यांपेक्षा कमी मानधन
11
Moto G67 Power: ७०००mAh बॅटरी आणि चार कॅमेरे; मोटो जी६७ पॉवर भारतात लॉन्च!
12
भारत, चीन, तुर्कस्तान... तीन देशांनी घेतला असा निर्णय की रशियाला होतंय नुकसान, ट्रम्प यांच्यामुळे नाईलाज
13
"अभी नहीं तो कभी नहीं!" अभिषेक शर्माला किंग कोहलीच्या ऑल टाइम रेकॉर्डची बरोबरी करण्याची शेवटची संधी
14
परदेशी सहल बजेटमध्ये! 'या' ५ देशांमध्ये भारतीय रुपया आहे मजबूत; कमी खर्चात करा परदेशवारी
15
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
16
बिहारमध्ये एनडीएला मोठा धक्का! मतदानाच्या तोंडावर भाजप आमदाराने राजदमध्ये प्रवेश केला; नाराज का झाला...
17
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
18
चिंताजनक! शेजारच्या देशात जीवघेण्या आजाराचं थैमान; २९२ जणांचा मृत्यू, भारतासाठी धोक्याची घंटा
19
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
20
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'

Corona : सरकारच्या तयारीची सर्वोच्च न्यायालयाकडू प्रशंसा; म्हणाले, विरोधकही करतायेत कौतुक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2020 18:02 IST

सरन्यायाधीश एस. ए. बोबडे यांच्या खंडपीठाने एका प्रकरणाची सुनावणी करताना म्हटले आहे, की कोरोना व्हायरसचा सामना करण्यासाठी सरकार आवश्यक ती सर्व प्रकारची पावले उचलत असल्याचे संपूर्ण देशाने मान्य केले आहे. सरकार अत्यंत चांगल्या प्रकारे काम करत आहे. 

ठळक मुद्देसरकारने कोरोनाचा सामना करण्यासाठी योग्य पावले उचलली - सर्वोच्च न्यायाल सर्वोच्च न्यायालयात दाखल एका याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने हे मत मांडले सरकारने योग्य प्रकारे काम केले, हे विरोधकांनीही मान्य केले आहे - सर्वोच्च न्यायालय

नवी दिल्ली - कोरोना व्हायरसचा सामना करण्यासाठी सरकारने ज्या पद्धतीने पावले उचली आहेत, त्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने सरकारचे कौतुक केले आहे. सरकार आवश्यक ती सर्वप्राकारची पावले उचलत आहे आणि विरोधकही सरकारच्या कामाची प्रशंसा करत आहेत, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.

सरन्यायाधीश एस. ए. बोबडे यांच्या खंडपीठाने एका प्रकरणाची सुनावणी करताना म्हटले आहे, की कोरोना व्हायरसचा सामना करण्यासाठी सरकार आवश्यक ती सर्व प्रकारची पावले उचलत असल्याचे संपूर्ण देशाने मान्य केले आहे. सरकार अत्यंत चांगल्या प्रकारे काम करत आहे. 

सर्वोच्च न्यायालयात दाखल एका याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने हे मत मांडले आहे. कोरोना व्हायरसचा सामना करण्यासाठी सरकारला आणखीही काही आवश्यक पावले उचलण्यास सांगण्यात यावे, अशी मागणी या याचिकेत करण्यात आली होती. या याचिकेत 'कोविड 19'च्या टेस्ट करणाऱ्या लॅबची संख्याही वाढविण्याची मागणी करण्यात आली होती. सुनवणीनंतर न्यायालयाने लॅब टेस्टिंग सेंटरची संख्या वाढविण्यासंदर्भातील याचिका सरकारकडे रेफर केली आहे. 

आम्ही संतुष्ट सर्वोच्च न्यायालय -

सरन्यायाधिशांच्या अध्यक्षतेखालील या पीठाने म्हटले आहे, की 'कोरोनाचा सामना करण्यासाठी सरकारने जी पावले उचलली आहेत त्यावर आम्ही संतुष्ट आहोत. उद्भवलेल्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी अत्यंत वेगाने पावले उचलली गेली. सरकारने योग्य प्रकारे काम केले, हे विरोधकांनीही मान्य केले आहे. हे राजकारण नव्हे तथ्य आहे.' न्यायमूर्ती एल. एन राव आणि सूर्यकांत देखील या पीठाचे सदस्य होते.

यावेळी, आवश्यक सुनावणीसाठी कोणते वकील सर्वोच्च न्यायालयाच्या परिसरात जातील, याची जबाबदारी सर्वोच्च न्यायालयाच्या बार असोसिएशनच्या अध्यक्षांवर असेल.

देशातील कोरोना बाधितांची संख्या 415 वर -

देशात आतापर्यंत जवळपास 415 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 8 जणांचा या व्हायरसमुळे मृत्यू झाला आहे. जगभरात कोरोनाची लागण झालेल्यांचा आकडा आता 3 लाख 45 हजारांवर पोहोचला आहे. तर 14 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसdelhiदिल्लीSupreme Courtसर्वोच्च न्यायालयNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाIndiaभारत