शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, जाणून घ्या A टू Z माहिती
2
Pune Accident : पुण्यात डीजेच्या गाडीने सहा जणांना चिरडले, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू; सह जण जखमी
3
"धोनीने मला 'सरडा' बनायला भाग पाडलं..."; दिनेश कार्तिकने सांगितलं टीम इंडियाचं मोठं गुपित
4
'ठाकरे गटाच्या पाच आणि शरद पवार यांच्या पक्षाच्या काही खासदारांनी क्रॉस व्होटिंग केले'; नव्या दाव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
5
लोन घेणाऱ्यांसाठी दिलासा! 'या' सरकारी बँकेनं कर्जाचे दर केले स्वस्त, EMI चा भार होणार कमी
6
Sushila Karki: सुशीला कार्की आहेत तरी कोण? नेपाळच्या पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर!
7
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमात घडलेल्या घटनेने अमेरिकेत खळबळ
8
आरजेडीच्या नेत्याची हॉटेलमध्ये घुसून हत्या, विधानसभा निवडणूक लढवण्याची करत होता तयारी
9
केवळ ₹५ लाखांपासून ते ₹२.६४ कोटींचा प्रवास! आपल्या मुलांना द्या हे फायनान्शिअल फ्रीडमचं गिफ्ट; कम्पाऊंडींगची जादू पाहा
10
समीकरणे बदलली अन् अशी वाढत गेली ठाकरे बंधूंची जवळीक; युती होण्याच्या चर्चेने कार्यकर्त्यांत उत्सुकता
11
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
12
नेपाळमधील तुरुंगात झालेल्या संघर्षात पाच जणांचा मृत्यू, देशभरातील सुमारे ७००० कैदी फरार
13
अकरावी प्रवेशासाठी विशेष अंतिम फेरी आजपासून, १३ तारखेपर्यंत विद्यार्थ्यांना करता येणार अर्ज
14
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
15
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
16
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
17
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
18
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
19
‘डीवाय पाटील’ बीकेसीत उभारणार शैक्षणिक संकुल; दहा भूखंड भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय
20
‘कोहिनूर’ची ‘बहीण’ ११७ वर्षांनी दिसणार! या बहिणीचं नाव आहे ‘दरिया-ए-नूर’ 

"सावरकर गोमांस खायचे, त्यांनी कधीही..."; कर्नाटकच्या आरोग्य मंत्र्यांचं वादग्रस्त विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2024 12:03 IST

एका पुस्तक कार्यक्रमात कर्नाटकच्या आरोग्य मंत्र्यांनी सावरकर आणि जिन्ना यांच्या विचारधारेवर भाष्य केले आहे. 

नवी दिल्ली - महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर स्वातंत्र्यवीर विनायक सावरकरांबद्दल कर्नाटकमधील आरोग्य मंत्र्यांचं वादग्रस्त विधान समोर आले आहे. वीर सावरकर हे ब्राह्मण होते, परंतु गोमांस खायचे, त्यांनी कधीही गोहत्येचा विरोध केला नाही असं आरोग्य मंत्री दिनेश गुंडुराव यांनी म्हटलं आहे. काँग्रेस नेत्याच्या या विधानावरून देशात नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. एका पुस्तक प्रकाशनावेळी ते बोलत होते. 

मंत्री दिनेश गुंडूराव म्हणाले की, सावरकरांबद्दल लोक असेही बोलतात ते ब्राह्मण होते, मात्र उघडपणे मांस खायचे आणि त्याचा प्रचारही करत होते. महात्मा गांधी हे हिंदू संस्कृती परंपरेवर विश्वास ठेवणारे होते, ते कट्टर शाकाहारी होते ते सर्व दृष्टीने लोकशाहीवादी व्यक्ती होते. मोहम्मद अली जिन्नाच्या तुलनेत सावरकर अधिक कट्टरतावादी होते. सावरकरांची विचारधारा वेगळी होती त्यांनी कधी गोहत्येचा विरोध केला नाही असं त्यांनी म्हटलं.

तसेच सावरकरांची विचारधारा भारतीय संस्कृतीपेक्षा वेगळी होती. आरएसएस,  हिंदू महासभा आणि अन्य कट्टरपंथी समाजात द्वेष पसरवण्याचं काम करत आहेत. लोकांना हे समजून घेण्यासाठी सामाजिक आणि राजकीयदृष्टीने जागरूक राहण्याची आवश्यकता आहे. जिन्ना कट्टर मुस्लीम असूनही डुकराचे मांस खात होते. ते कट्टरपंथी नव्हते त्यांना सरकारमध्ये उच्च पद हवं होते, त्यासाठी वेगळ्या देशाची मागणी जिन्नांनी केली असंही दिनेश गुंडुराव यांनी सांगितले.

दरम्यान, गोडसेसारख्या व्यक्तीने महात्मा गांधींची हत्या केली, तो कट्टरपंथी होता कारण आपण जे करतोय ते योग्य असं त्याला वाटत होते हा कट्टरतावाद आहे. समजा, कुणी गोरक्षक जातो, कुणाला मारतो तेव्हा तो चुकतोय असं त्याला वाटत नाही. हा सावरकरांचा कट्टरतावाद धोकादायक आहे. गांधी एक धार्मिक व्यक्ती होते. सावरकरांच्या तुलनेत गांधी लोकशाहीवादी होते असंही दिनेश गुंडूराव यांनी विधान केले. 

भाजपाचा पलटवार 

कर्नाटकातील मंत्री दिनेश गुंडूराव यांच्या विधानावर भाजपाने पलटवार केला आहे. भाजपा नेते अनुराग ठाकूर म्हणाले की, काँग्रेस फेक नरेटिव्हची फॅक्टरी आहे. भारत वीर सावरकरांचा अपमान कधीही सहन करणार नाही. देशासाठी स्वत:चं जीवन समर्पित करणाऱ्या सावरकरांपासून काँग्रेसने कधी धडा घेतला नाही. देश तोडणाऱ्या काँग्रेस पक्षाने राहुल गांधींच्या नेतृत्वात तुकडे तुकडे विचारधारेला प्रोत्साहन दिले आहे. ज्यांनी परदेशात भारताची बदनामी केली असं ठाकूर यांनी म्हटलं. 

टॅग्स :congressकाँग्रेसVinayak Damodar Savarkarविनायक दामोदर सावरकरBJPभाजपा