शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
4
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
5
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
6
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
7
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
8
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
9
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
10
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
11
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
12
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
13
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
14
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
15
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
16
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
17
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
18
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
19
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
20
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
Daily Top 2Weekly Top 5

गांधी हत्येत सावरकरांनी गोडसेला बंदूक पुरवण्यासाठी मदत केली होती - तुषार गांधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2022 14:33 IST

हत्येच्या २ दिवसांपूर्वी ही बंदूक प्राप्त झाली. त्यानंतर ही बंदूक घेऊन ते दिल्लीत आले आणि ३० जानेवारीला बापूंची हत्या केली असं तुषार गांधींनी म्हटलं.

वडोदरा - काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेत स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत केलेल्या विधानावरून रणकंदन पेटले. राहुल गांधींच्या विधानाचा निषेध करण्यासाठी भाजपा, मनसे आणि शिंदे गट रस्त्यावर उतरले होते. तर राहुल गांधींच्या विधानाचं समर्थन करत महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांनी आता सावरकरांवर गंभीर आरोप केले आहे. गांधी हत्येत सावरकरांनी नथुराम गोडसेला बंदूक पुरवण्यास मदत केली होती असा दावा तुषार गांधींनी केला आहे. 

तुषार गांधींनी एका वृत्त माध्यमाला मुलाखत देताना म्हटलं की, ज्या बंदुकीने महात्मा गांधी यांची हत्या झाली. ती पुरवण्यास सावरकरांनी मदत केली होती. कपूर कमिशनचा अहवाल वाचावा. ज्यात त्यांनी सर्व तपास, पुरावे याचा अभ्यास करून ते रेकॉर्डवर आणले होते. या रिपोर्टमध्ये स्पष्ट उल्लेख आहे. २६-२७ जानेवारी १९४८ ला सावरकर हे नथुराम गोडसे आणि नारायण आपटे भेटले होते. तोपर्यंत त्यांच्याकडे बंदूक नव्हती असं त्यांनी सांगितले. 

तसेच हत्येच्या २ दिवसांपूर्वी ही बंदूक प्राप्त झाली. त्यानंतर ही बंदूक घेऊन ते दिल्लीत आले आणि ३० जानेवारीला बापूंची हत्या केली. बंदूक घेणारे आणि बंदूक चालवणारे हे दोघेही सावरकरांचे अनुयायी होते असं तुषार गांधींनी म्हटलं. त्याचसोबत माझ्या विधानावरून कुणाला कोर्टात जायचं असेल तर जरूर जावं. त्यांना कोर्टात जाण्याचा जितका अधिकार आहे तितका मला माझ्याकडे जी काही माहिती आहे ती समोर आणण्याचा अधिकार आहे असं सांगत तुषार गांधी यांनी सावरकरांचे नातू सात्यकी सावरकर यांना प्रत्युत्तर दिले आहे. 

काय म्हणाले सात्यकी सावरकर?तुषार गांधी जे काही बोलतायेत ते अत्यंत खोटे आहे. चुकीचा आरोप आहे. वास्तविक पाहता न्यायालय अथवा पोलीस यांना माहिती असती तर तात्यारावांवर खटल्यातच आरोप झाले असते. तात्या सावरकर हे नथुरामला मदत करणार आहेत, तर त्यांच्यावर कटात सहभागी झाले म्हणून त्यांच्यावर आरोप झाले असते. परंतु न्यायालयाने सावरकरांना निर्दोष मुक्त केले होते. तुषार गांधी जे बोलतायेत ते न्यायालयाचा अवमान आहे हे त्यांनी लक्षात ठेवावं. मी याबाबत न्यायालयात जायचा विचार करतोय. एकदा काय ते न्याय व्हायला हवा. एकाला चाप बसला की बाकीचे शांत होतील. मी न्यायालयात धाव घेणार असं सांगत सावरकरांचे नातू सात्यकी सावरकर यांनी तुषार गांधींवर पलटवार केला आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Mahatma Gandhiमहात्मा गांधीNathuram Godseनथुराम गोडसेVinayak Damodar Savarkarविनायक दामोदर सावरकर