शहरं
Join us  
Trending Stories
1
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन
2
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
3
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
4
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
5
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
6
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
7
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
8
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले
9
"मल्लिकार्जून खरगेंनी इतिहासातून धडा घ्यावा", आरएसएसचे दत्तात्रय होसबळे काँग्रेसच्या अध्यक्षांवर भडकले
10
चीनचा एक निर्णय अन् जागतिक बाजारात सोन्याच्या दराचं गणित बदलणार; भारतावर काय परिणाम होणार?
11
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
12
‘आपण काय मेसेज करत आहात? हे व्हॉट्सअ‍ॅपला ठाऊक...’, इलॉन मस्‍क यांचा गंभीर आरोप, केली मोठी घोषणा
13
"दिल्लीचे नामांतर 'इंद्रप्रस्थ' करा"; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भाजप खासदाराचे पत्र, पांडवांचा उल्लेख
14
११ कोटींची लॉटरी जिंकली, पण माणूस कुठे गेला? कोट्याधीश विजेत्याला शोधण्यासाठी कंपनीच घेतेय कष्ट
15
Tulasi Vivah Mangalashtak: तुलसी विवाहात 'ही' मंगलाष्टके आवर्जून म्हणा; मिळेल कन्यादानाचे पुण्य!
16
"वडिलांच्या निधनानंतर ६ महिन्यात संभाजी महाराज लेझीम खेळतील का?", 'छावा'मधल्या 'त्या' दृश्यावर स्पष्टच बोलले दिग्पाल लांजेकर
17
बिहारमध्ये कुणाचं सरकार, भाजपाला किती जागा मिळणार?; समोर आला ताजा सर्व्हे, वाचा
18
Viral Video: ट्रेनमधून प्रवास करताना कधीच 'अशी' चूक करू नका; जीवघेणी घटना कॅमेऱ्यात कैद!
19
Tulsi Vivah 2025 Wishes: तुळशी विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Images, Whatsapp Status शेअर करून आमंत्रित करा आपल्या नातेवाईकांना
20
MVA MNS Morcha Live: ‘सत्याचा मोर्चा’च्या निमित्ताने संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण झाली: शरद पवार

गांधी हत्येत सावरकरांनी गोडसेला बंदूक पुरवण्यासाठी मदत केली होती - तुषार गांधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2022 14:33 IST

हत्येच्या २ दिवसांपूर्वी ही बंदूक प्राप्त झाली. त्यानंतर ही बंदूक घेऊन ते दिल्लीत आले आणि ३० जानेवारीला बापूंची हत्या केली असं तुषार गांधींनी म्हटलं.

वडोदरा - काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेत स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत केलेल्या विधानावरून रणकंदन पेटले. राहुल गांधींच्या विधानाचा निषेध करण्यासाठी भाजपा, मनसे आणि शिंदे गट रस्त्यावर उतरले होते. तर राहुल गांधींच्या विधानाचं समर्थन करत महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांनी आता सावरकरांवर गंभीर आरोप केले आहे. गांधी हत्येत सावरकरांनी नथुराम गोडसेला बंदूक पुरवण्यास मदत केली होती असा दावा तुषार गांधींनी केला आहे. 

तुषार गांधींनी एका वृत्त माध्यमाला मुलाखत देताना म्हटलं की, ज्या बंदुकीने महात्मा गांधी यांची हत्या झाली. ती पुरवण्यास सावरकरांनी मदत केली होती. कपूर कमिशनचा अहवाल वाचावा. ज्यात त्यांनी सर्व तपास, पुरावे याचा अभ्यास करून ते रेकॉर्डवर आणले होते. या रिपोर्टमध्ये स्पष्ट उल्लेख आहे. २६-२७ जानेवारी १९४८ ला सावरकर हे नथुराम गोडसे आणि नारायण आपटे भेटले होते. तोपर्यंत त्यांच्याकडे बंदूक नव्हती असं त्यांनी सांगितले. 

तसेच हत्येच्या २ दिवसांपूर्वी ही बंदूक प्राप्त झाली. त्यानंतर ही बंदूक घेऊन ते दिल्लीत आले आणि ३० जानेवारीला बापूंची हत्या केली. बंदूक घेणारे आणि बंदूक चालवणारे हे दोघेही सावरकरांचे अनुयायी होते असं तुषार गांधींनी म्हटलं. त्याचसोबत माझ्या विधानावरून कुणाला कोर्टात जायचं असेल तर जरूर जावं. त्यांना कोर्टात जाण्याचा जितका अधिकार आहे तितका मला माझ्याकडे जी काही माहिती आहे ती समोर आणण्याचा अधिकार आहे असं सांगत तुषार गांधी यांनी सावरकरांचे नातू सात्यकी सावरकर यांना प्रत्युत्तर दिले आहे. 

काय म्हणाले सात्यकी सावरकर?तुषार गांधी जे काही बोलतायेत ते अत्यंत खोटे आहे. चुकीचा आरोप आहे. वास्तविक पाहता न्यायालय अथवा पोलीस यांना माहिती असती तर तात्यारावांवर खटल्यातच आरोप झाले असते. तात्या सावरकर हे नथुरामला मदत करणार आहेत, तर त्यांच्यावर कटात सहभागी झाले म्हणून त्यांच्यावर आरोप झाले असते. परंतु न्यायालयाने सावरकरांना निर्दोष मुक्त केले होते. तुषार गांधी जे बोलतायेत ते न्यायालयाचा अवमान आहे हे त्यांनी लक्षात ठेवावं. मी याबाबत न्यायालयात जायचा विचार करतोय. एकदा काय ते न्याय व्हायला हवा. एकाला चाप बसला की बाकीचे शांत होतील. मी न्यायालयात धाव घेणार असं सांगत सावरकरांचे नातू सात्यकी सावरकर यांनी तुषार गांधींवर पलटवार केला आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Mahatma Gandhiमहात्मा गांधीNathuram Godseनथुराम गोडसेVinayak Damodar Savarkarविनायक दामोदर सावरकर