शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
2
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
3
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
4
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
5
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
6
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
7
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
8
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
9
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
10
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
11
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
12
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
13
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
14
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
15
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
16
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
17
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
18
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
19
UP: बेकायदेशीर औषधाविरुद्ध योगी सरकारची कडक कारवाई; ४ दिवसांत १६ गुन्हे दाखल, २५ दुकानांवर बंदी!
20
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!

चीनच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी उपग्रहाची मदत, भारत-चीन सीमेवर आणखी 50 चौक्या उभारण्याचा प्रस्ताव

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2017 14:19 IST

भारत-चीन सीमेवर आणखी 50 चौक्या उभारण्याच्या प्रस्तावावर मंत्रालय विचार करत आहे असे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी मंगळवारी सांगितले.

ठळक मुद्देलडाखमध्ये बॉर्डर पोस्टचे एक मॉडेल बनवण्यात आले असून, हे मॉडेल यशस्वी झाले तर, सर्वत्र त्याच मॉडेलची अंमलबजावणी केली जाईल.

नवी दिल्ली - भारत-चीन सीमेवर आणखी 50 चौक्या उभारण्याच्या प्रस्तावावर मंत्रालय विचार करत आहे असे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी मंगळवारी सांगितले. अरुणाचल प्रदेश, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या राज्यांमधल्या भारताच्या सीमा चीनला लागून आहेत. या तीन राज्यातील 25 रस्त्यांची कामे जलदगतीने सुरु असल्याची माहिती  राजनाथ सिंह यांनी दिली. चीनला लागून असणा-या सीमेवर तैनात असणा-या आटीबीपीच्या जवान आणि अधिका-यांना प्रशिक्षणा दरम्यान मंदारीन भाषा शिकवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे सीमेवर तैनात असताना त्यांना भाषेच्या अडचणीचा सामना करावा लागणार नाही अशी माहिती असे राजनाथ सिंह यांनी दिली. लडाखमध्ये बॉर्डर पोस्टचे एक मॉडेल बनवण्यात आले असून, हे मॉडेल यशस्वी झाले तर, सर्वत्र त्याच मॉडेलची अंमलबजावणी केली जाईल असे राजनाथ सिंह म्हणाले. केंद्रीय गृहमंत्रालयाने आयटीबीपीला जी-सॅट उपग्रहाचा वापर करण्याचे अधिकार दिले आहेत. जी-सॅट भारताचा कम्युनिकेशन आणि टेहळणी उपग्रह आहे. या उपग्रहाच्या माध्यमातून भारतीय सीमांवर लक्ष ठेवले जाते. आयटीबीपी जी-सॅटकडून मिळणा-या माहितीचे मुख्य केंद्र असेल असे राजनाथ सिंह यांनी सांगितले. 

बीएसएफकडे बांगलादेश आणि पाकिस्तानला लागून असणा-या सीमेची जबाबदारी आहे. एसएसबी भारत-नेपाळ सीमेचे संरक्षण करते तर चीनला लागून असणा-या सीमेच्या संरक्षणाची जबाबदारी आयटीबीपीकडे आहे. वेगवेगळया सीमांवर तैनात असलेल्या फोर्सेसाना उपग्रहांच्या माध्यमातून आता थेट माहिती मिळणार असल्याने विविध दुर्गम भागांवर लक्ष ठेवणे सोपे होईल तसेच शत्रूच्या प्रत्येक हालचाली टिपून वेळीच कारवाई करता येईल. 

चीनच्या सीमावर्ती भागात १00 नवे रस्ते बांधणारचीनने डोकलाम भागात रस्ता बांधण्याची तयारी पुन्हा सुरू करताच, भारत- चीन सीमेवरील सर्व महत्त्वाच्या खिंडींजवळ जवळपास १00 नवे रस्ते बांधण्याची रणनीती भारत सरकारकडे तयार आहे. सीमावर्ती भागात पहिल्या टप्प्यात महत्त्वाचे २५ रस्ते, तर दुस-या व तिस-या टप्यात प्रत्येकी ५0 नवे रस्ते तयार होणार असल्याची माहिती संरक्षण मंत्रालयाच्या सूत्रांकडून देण्यात आली. 

टॅग्स :Indian Armyभारतीय जवान