शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

सैराट ! मुलीने आंतरजातीय विवाह केल्याने तरुणाच्या आई-वडिलांची गोळ्या घालून हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2017 13:34 IST

मुलीने आंतरजातीय विवाह केल्याने तरुणाच्या आई-वडिलांची गोळ्या घालून हत्या केल्याची धक्कादायक घटना बिहारमध्ये घडली आहे. कैमूर जिल्ह्यातील मुबारकपूर गावात हे ऑनर किलिंग झालं आहे.

ठळक मुद्देमुलीने आंतरजातीय विवाह केल्याच्या रागातून तरुणाच्या आई-वडिलांची गोळ्या घालून हत्याहल्ल्यात दांपत्याच्या दोन मुलीही जखमी झाल्या आहेतपोलिसांनी चौघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये तिघांची नावे असून, चौघे अज्ञात सामील आहेत

पाटणा, दि. 9 - मुलीने आंतरजातीय विवाह केल्याच्या रागातून तरुणाच्या आई-वडिलांची गोळ्या घालून हत्या केल्याची धक्कादायक घटना बिहारमध्ये घडली आहे. कैमूर जिल्ह्यातील मुबारकपूर गावात हे ऑनर किलिंग झालं आहे.  मुलीने खालच्या जातीतील मुलाच्या प्रेमात पडून त्याच्याशी लग्न केल्याच्या रागातून ही हत्या करण्यात आल्याचं समोर आलं आहे. या हल्ल्यात दांपत्याच्या दोन मुलीही जखमी झाल्या आहेत. पाटणापासून 216 किमी अंतरावर असणा-या मुबारकपूर गावात मन हेलावून टाकणारी ही घटना घडली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कमल चौधरी (50) आपली पत्नी शांती देवी (45) आणि मुलींसोबत गच्चीवर झोपले होते. हल्लेखोरांनी ही संधी साधत हल्ला केला आणि कमल चौधरी आणि शांती देवी यांची गोळ्या घालून हत्या केली. हल्यात कमल चौधरी यांच्या दोन्ही मुली किरण देवी (20) आणि सुश्मिता कुमारी (15 ) गंभीर जखमी झाल्या असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. वाराणसीमधील इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस-बनारस हिंदू युनिव्हर्सिटीमध्ये त्यांना भरती करण्यात आलं आहे. 

हे ऑनर किलिंग प्रकरण असल्याचं स्पष्ट होत आहे अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. जखमी झालेल्या किरण देवीने पोलिसांना  दिलेल्या माहितीनुसार, तिचा भाऊ धर्मेंद्र चौधरी याचे तीन महिन्यापुर्वी दुस-या जातीतील मुलीसोबत प्रेमसंबंध जुळले होते. त्या दोघांनी लग्न केलं होतं. त्यानंतर ते दिल्लीला जाऊन राहत होते. 

पोलिसांनी गावक-यांची चौकशी केल्यानंतर त्यांनी सांगितलं की, 'मुलगी राजपूर घराण्यातील आहे. धर्मेंद्र खालच्या जातीतला असल्याने त्यांना त्यांचं लग्न मान्य नव्हतं. मुलीचे नातेवाईक आपण याचा बदला घेऊ अशी धमकीही नेहमी देत असत'. मुलीच्या भावाची गुन्हेगारी पार्श्वभुमी असल्याचंही गावक-यांनी सांगितलं आहे. 

पोलिसांनी चौघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये तिघांची नावे असून, चौघे अज्ञात सामील आहेत अशी माहिती कैमूर पोलीस अधिक्षक हरप्रीत कौर यांनी दिली आहे. 'पोलिसांची तीन पथकं हल्लेखोरांचा शोध घेत आहेत. खासकरुन उत्तर प्रदेश सीमारेषेवरील परिसरात त्यांचा शोध घेतला जात आहे. आम्ही उत्तर प्रदेश पोलिसांचीही मदत मागितली आहे', असं पोलीस अधिक्षक हरप्रीत कौर यांनी सांगितलं आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. 

 

टॅग्स :MurderखूनCrimeगुन्हाPoliceपोलिस