शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

“बालबुद्धीच्या नेत्याने PM मोदींना घाम फोडला, भाजपाला बहुमत गमवावे लागले”: संजय राऊत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2024 15:40 IST

Sanjay Raut News: ४०० पार म्हणताना जेमतेम २०० पार गेले. राहुल गांधींमुळे हे झाले आणि तेच आता समोर विरोधी पक्षनेते म्हणून बसले, हे बहुतेक सहन होत नसावे, अशी टीका संजय राऊतांनी केली.

Sanjay Raut News: लोकसभा निवडणुकीनंतर संसदेचे अधिवेशन सुरू आहे. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील दोन दिवसीय चर्चेत विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी सहभाग घेऊन एनडीए सरकारवर जोरदार टीका केली होती. पंतप्रधान मोदी यांनी याला उत्तर देताना एनडीएचा तिसरा कार्यकाळ, विकसित भारताचा संकल्प, संरक्षण यांसारख्या विषयावर भाष्य करताना काँग्रेसवर जोरदार पलटवार केला. राहुल गांधी यांच्यावर केलेल्या टीकेवरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदी आणि भाजपावर निशाणा साधला.

आपल्या सरकारचे १० वर्षांचे काम पाहून जनतेने सरकारला सलग तिसऱ्यांदा कौल दिला आहे. काँग्रेस लोकसभा निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील 'एनडीए'चा पराभव केल्याचे जनतेवर बिंबवण्याचा प्रयत्न करीत आहे. आपण केलेल्या चुका उघड न करता सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका बालबुद्धी व्यक्तीचा विलाप सभागृहाने पाहिला. काँग्रेस देशात आर्थिक अराजकता निर्माण करण्याच्या दिशेने काम करत आहे. काँग्रेसने सलग तीन वेळा १०० जागांचा टप्पा न ओलांडण्याची ही पहिलीच वेळ आहे. परंतु पराभव स्वीकारण्याऐवजी त्यांना गर्व चढला आहे. काँग्रेसने आपला पराभव मान्य करून आत्मपरीक्षण केले असते तर बरे झाले असते; पण ते 'शीर्षासन' करण्यात व्यस्त आहेत, या शब्दांत पंतप्रधान मोदींनी खोचक शब्दांत टोलेबाजी केली. पत्रकारांशी बोलताना संजय राऊत यांनी सडकून टीका केली.

बालबुद्धीच्या नेत्याने मोदींना घाम फोडला

बालबुद्धीच्या नेत्याने पहिल्याच भाषणात तुमचा बुरखा फाडला. याची अस्वस्थता सत्ताधारी पक्षात आहे. विरोधी पक्षनेत्याच्या पाठीशी २३४ खासदारांचे बळ असताना त्यांना संसदेत अशाप्रकारे अपमानित करू शकत नाहीत. यावरून तुमची संस्कृती दिसून येते. नरेंद्र मोदी यांनी बहुमत गमावले आहे. ४०० पार म्हणता म्हणता ते जेमतेम २०० पार गेले. याला राहुल गांधी जबाबदार आहेत. तेच राहुल गांधी पंतप्रधानांसमोर विरोधी पक्षनेते म्हणून बसले आहेत. त्यांना बहुतेक हे सहन होत नसावे. याच बालबुद्धीच्या नेत्याने तुम्हाला घाम फोडला. याच बालबुद्धीच्या नेत्यामुळे तुम्हाला बहुमत गमवावे लागले, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, विरोधी पक्षनेत्याच्या पदाला घटनात्मक आधार आहे. त्या पदवरील व्यक्तिला पंतप्रधान बालबुद्धी म्हणत असतील तर तो व्यक्तिचा अपमान नसून संविधानाचा अपमान आहे. म्हणून संविधान धोक्यात आहे, असे आम्ही म्हणतो. मोदी संविधान, घटना मानायला तयार नाहीत. लोकसभेमध्ये भाजपाने काही जागा कशा चोरल्या, हे सांगत असताना माझा माईक बंद करण्यात आला. भाजपाकडून सारखे आणीबाणीचा विषय काढण्यात येत आहे, अशी टीका संजय राऊतांनी केली. 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतRahul Gandhiराहुल गांधीParliamentसंसदlok sabhaलोकसभाRajya Sabhaराज्यसभाNational Democratic Allianceराष्ट्रीय लोकशाही आघाडी