शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

“बालबुद्धीच्या नेत्याने PM मोदींना घाम फोडला, भाजपाला बहुमत गमवावे लागले”: संजय राऊत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2024 15:40 IST

Sanjay Raut News: ४०० पार म्हणताना जेमतेम २०० पार गेले. राहुल गांधींमुळे हे झाले आणि तेच आता समोर विरोधी पक्षनेते म्हणून बसले, हे बहुतेक सहन होत नसावे, अशी टीका संजय राऊतांनी केली.

Sanjay Raut News: लोकसभा निवडणुकीनंतर संसदेचे अधिवेशन सुरू आहे. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील दोन दिवसीय चर्चेत विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी सहभाग घेऊन एनडीए सरकारवर जोरदार टीका केली होती. पंतप्रधान मोदी यांनी याला उत्तर देताना एनडीएचा तिसरा कार्यकाळ, विकसित भारताचा संकल्प, संरक्षण यांसारख्या विषयावर भाष्य करताना काँग्रेसवर जोरदार पलटवार केला. राहुल गांधी यांच्यावर केलेल्या टीकेवरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदी आणि भाजपावर निशाणा साधला.

आपल्या सरकारचे १० वर्षांचे काम पाहून जनतेने सरकारला सलग तिसऱ्यांदा कौल दिला आहे. काँग्रेस लोकसभा निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील 'एनडीए'चा पराभव केल्याचे जनतेवर बिंबवण्याचा प्रयत्न करीत आहे. आपण केलेल्या चुका उघड न करता सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका बालबुद्धी व्यक्तीचा विलाप सभागृहाने पाहिला. काँग्रेस देशात आर्थिक अराजकता निर्माण करण्याच्या दिशेने काम करत आहे. काँग्रेसने सलग तीन वेळा १०० जागांचा टप्पा न ओलांडण्याची ही पहिलीच वेळ आहे. परंतु पराभव स्वीकारण्याऐवजी त्यांना गर्व चढला आहे. काँग्रेसने आपला पराभव मान्य करून आत्मपरीक्षण केले असते तर बरे झाले असते; पण ते 'शीर्षासन' करण्यात व्यस्त आहेत, या शब्दांत पंतप्रधान मोदींनी खोचक शब्दांत टोलेबाजी केली. पत्रकारांशी बोलताना संजय राऊत यांनी सडकून टीका केली.

बालबुद्धीच्या नेत्याने मोदींना घाम फोडला

बालबुद्धीच्या नेत्याने पहिल्याच भाषणात तुमचा बुरखा फाडला. याची अस्वस्थता सत्ताधारी पक्षात आहे. विरोधी पक्षनेत्याच्या पाठीशी २३४ खासदारांचे बळ असताना त्यांना संसदेत अशाप्रकारे अपमानित करू शकत नाहीत. यावरून तुमची संस्कृती दिसून येते. नरेंद्र मोदी यांनी बहुमत गमावले आहे. ४०० पार म्हणता म्हणता ते जेमतेम २०० पार गेले. याला राहुल गांधी जबाबदार आहेत. तेच राहुल गांधी पंतप्रधानांसमोर विरोधी पक्षनेते म्हणून बसले आहेत. त्यांना बहुतेक हे सहन होत नसावे. याच बालबुद्धीच्या नेत्याने तुम्हाला घाम फोडला. याच बालबुद्धीच्या नेत्यामुळे तुम्हाला बहुमत गमवावे लागले, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, विरोधी पक्षनेत्याच्या पदाला घटनात्मक आधार आहे. त्या पदवरील व्यक्तिला पंतप्रधान बालबुद्धी म्हणत असतील तर तो व्यक्तिचा अपमान नसून संविधानाचा अपमान आहे. म्हणून संविधान धोक्यात आहे, असे आम्ही म्हणतो. मोदी संविधान, घटना मानायला तयार नाहीत. लोकसभेमध्ये भाजपाने काही जागा कशा चोरल्या, हे सांगत असताना माझा माईक बंद करण्यात आला. भाजपाकडून सारखे आणीबाणीचा विषय काढण्यात येत आहे, अशी टीका संजय राऊतांनी केली. 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतRahul Gandhiराहुल गांधीParliamentसंसदlok sabhaलोकसभाRajya Sabhaराज्यसभाNational Democratic Allianceराष्ट्रीय लोकशाही आघाडी