शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

“बालबुद्धीच्या नेत्याने PM मोदींना घाम फोडला, भाजपाला बहुमत गमवावे लागले”: संजय राऊत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2024 15:40 IST

Sanjay Raut News: ४०० पार म्हणताना जेमतेम २०० पार गेले. राहुल गांधींमुळे हे झाले आणि तेच आता समोर विरोधी पक्षनेते म्हणून बसले, हे बहुतेक सहन होत नसावे, अशी टीका संजय राऊतांनी केली.

Sanjay Raut News: लोकसभा निवडणुकीनंतर संसदेचे अधिवेशन सुरू आहे. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील दोन दिवसीय चर्चेत विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी सहभाग घेऊन एनडीए सरकारवर जोरदार टीका केली होती. पंतप्रधान मोदी यांनी याला उत्तर देताना एनडीएचा तिसरा कार्यकाळ, विकसित भारताचा संकल्प, संरक्षण यांसारख्या विषयावर भाष्य करताना काँग्रेसवर जोरदार पलटवार केला. राहुल गांधी यांच्यावर केलेल्या टीकेवरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदी आणि भाजपावर निशाणा साधला.

आपल्या सरकारचे १० वर्षांचे काम पाहून जनतेने सरकारला सलग तिसऱ्यांदा कौल दिला आहे. काँग्रेस लोकसभा निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील 'एनडीए'चा पराभव केल्याचे जनतेवर बिंबवण्याचा प्रयत्न करीत आहे. आपण केलेल्या चुका उघड न करता सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका बालबुद्धी व्यक्तीचा विलाप सभागृहाने पाहिला. काँग्रेस देशात आर्थिक अराजकता निर्माण करण्याच्या दिशेने काम करत आहे. काँग्रेसने सलग तीन वेळा १०० जागांचा टप्पा न ओलांडण्याची ही पहिलीच वेळ आहे. परंतु पराभव स्वीकारण्याऐवजी त्यांना गर्व चढला आहे. काँग्रेसने आपला पराभव मान्य करून आत्मपरीक्षण केले असते तर बरे झाले असते; पण ते 'शीर्षासन' करण्यात व्यस्त आहेत, या शब्दांत पंतप्रधान मोदींनी खोचक शब्दांत टोलेबाजी केली. पत्रकारांशी बोलताना संजय राऊत यांनी सडकून टीका केली.

बालबुद्धीच्या नेत्याने मोदींना घाम फोडला

बालबुद्धीच्या नेत्याने पहिल्याच भाषणात तुमचा बुरखा फाडला. याची अस्वस्थता सत्ताधारी पक्षात आहे. विरोधी पक्षनेत्याच्या पाठीशी २३४ खासदारांचे बळ असताना त्यांना संसदेत अशाप्रकारे अपमानित करू शकत नाहीत. यावरून तुमची संस्कृती दिसून येते. नरेंद्र मोदी यांनी बहुमत गमावले आहे. ४०० पार म्हणता म्हणता ते जेमतेम २०० पार गेले. याला राहुल गांधी जबाबदार आहेत. तेच राहुल गांधी पंतप्रधानांसमोर विरोधी पक्षनेते म्हणून बसले आहेत. त्यांना बहुतेक हे सहन होत नसावे. याच बालबुद्धीच्या नेत्याने तुम्हाला घाम फोडला. याच बालबुद्धीच्या नेत्यामुळे तुम्हाला बहुमत गमवावे लागले, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, विरोधी पक्षनेत्याच्या पदाला घटनात्मक आधार आहे. त्या पदवरील व्यक्तिला पंतप्रधान बालबुद्धी म्हणत असतील तर तो व्यक्तिचा अपमान नसून संविधानाचा अपमान आहे. म्हणून संविधान धोक्यात आहे, असे आम्ही म्हणतो. मोदी संविधान, घटना मानायला तयार नाहीत. लोकसभेमध्ये भाजपाने काही जागा कशा चोरल्या, हे सांगत असताना माझा माईक बंद करण्यात आला. भाजपाकडून सारखे आणीबाणीचा विषय काढण्यात येत आहे, अशी टीका संजय राऊतांनी केली. 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतRahul Gandhiराहुल गांधीParliamentसंसदlok sabhaलोकसभाRajya Sabhaराज्यसभाNational Democratic Allianceराष्ट्रीय लोकशाही आघाडी