शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Police Bharti 2025: १५ हजार पोलीस भरतीस मंजुरी; मंत्रिमंडळाच्या बैठकीत ४ महत्त्वाचे निर्णय, वाचा
2
"तिसरं मूल झाल्यास गाय अन् ५०००० रुपयांचं बक्षीस"; घोषणा करणाऱ्या खासदाराचं पंतप्रधान मोदींनी केलं कौतुक!
3
"तुमचं वक्तव्य लाजिरवाणं, आम्ही हमासचे दहशतवादी मारले", प्रियंका गांधींच्या 'त्या' दाव्यामुळे इस्राइल संतप्त   
4
Video: एकाच महिलेचं ६ वेळा मतदार यादीत नाव, EPIC क्रमांक वेगळे...; महाराष्ट्रातील प्रकार व्हायरल
5
ना करुण नायर, ना श्रेयस अय्यर, ना साई सुदर्शन... ३ नंबर बॅटिंगसाठी गांगुलीची कुणाला पसंती?
6
एका झटक्यात ₹४००० नं घसरला शेअरचा भाव; शेअर विकण्यासाठी गुंतवणुकदारांच्या रांगा, पाहा कोणता आहे स्टॉक?
7
कोण आहेत १२४ वर्षीय मिंता देवी? ज्यांच्या नावाचं टी-शर्ट घालून विरोधकांचा संसदेत राडा!
8
पंजाब पोलिसांची मोठी कारवाई; बब्बर खालसा संघटनेशी संबंधित ५ दहशतवाद्यांना अटक
9
आसिम मुनीर यांना सारखं अमेरिकेत बोलावून भारतच नव्हे, तर 'या' तीन देशांनाही इशारा देतायत डोनाल्ड ट्रम्प!
10
'परम सुंदरी'च्या रोमँटिक केमिस्ट्रीवर भाळले प्रेक्षक, सिनेमात कॉमेडीचाही तडका; ट्रेलर रिलीज
11
१४, १५ की १६ ऑगस्ट? नेमकी कधी आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी? पाहा, शुभ मुहूर्त, महत्त्व, मान्यता
12
पोरी हुश्शार! भारतीय महिला फुटबॉल टीमने रचला इतिहास, २० वर्षांनी आशियाई कपसाठी क्वालिफाय
13
या ऑटो कंपनीने सर्वांवर कडी केली...! १० वर्षांची एक्स्टेंडेड वॉरंटी स्कीम आणली, आधीच तीन वर्षे...
14
“काँग्रेसने जनहिताची भरपूर कामे केली, सोशल मीडियावर सक्रीय व्हा”; कार्यकर्त्यांना कानमंत्र
15
ना भीती, ना ढोंग, ना पश्चाताप.., Gen Z आणि मिलेनियल्सबाबत काय म्हणाले अमन गुप्ता?
16
तेजश्री प्रधानचं वय माहितीये का? सुंदर दिसण्यासाठी करते फक्त 'ही' एकच गोष्ट
17
"चल हट, येथून निघून जा...", भाजपा नेत्याच्या मुलाची गुंडगिरी, पोलीस कॉन्स्टेबलशी गैरवर्तन
18
'छावा', 'द काश्मीर फाईल्स' सारखे सिनेमे बनवणार नाही, जॉन अब्राहम असं का म्हणाला?
19
२०० रूपये फी न दिल्यानं डॉक्टर संतापला; रुग्णावर कैचीने हल्ला करत केले गंभीर जखमी
20
टी-२० क्रिकेटमध्ये आता विराटआधी वॉर्नरचं नाव घेतलं जाईल; द हंड्रेड स्पर्धेत गाठला मोलाचा टप्पा!

...तर निवडणूक आयोगाला हृदयविकाराचा झटका आला असता का?; 'मतचोरी'वरून संजय राऊतांचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2025 12:53 IST

Sanjay Raut News: राहुल गांधींनी डेटावर संशोधन केले आहे. या लढाईत आम्ही त्यांच्या सोबत आहोत. हे आंदोलन जयप्रकाश नारायण यांच्या आंदोलनापेक्षा मोठे होणार असल्याचे संजय राऊतांनी म्हटले आहे.

Sanjay Raut News: दिल्लीच्या रस्त्यावर संसदेतील ३०० पेक्षा जास्त खासदारांनी लोकशाहीच्या रक्षणासाठी आंदोलन, संघर्ष केला. सध्याच्या निवडणूक आयोगाने टी.एन.शेषन यांचा अभ्यास करायला हवा, त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत कशा प्रकारे काम केले? त्यांनी आदर्श आचारसंहितेच पालन कसे करायला लावले? याचा अभ्यास केला पाहिजे. गेल्या १० वर्षांपासून पाहतोय, निवडणूक आयोग हा भाजपाची एक शाखा झालेला आहे. राहुल गांधी यांनी जी लढाई सुरू केली आहे, त्यात आम्ही त्यांच्या सोबत आहोत. हे आंदोलन जयप्रकाश नारायण यांच्या आंदोलनापेक्षा मोठे होणार, असा दावा संजय राऊत यांनी केला.

पत्रकारांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाच्या डेटावर संशोधन केले आहे. निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावरच सगळा गैरप्रकार आहे. तुम्ही संसदेला लोकशाहीचे सर्वोच्च मंदिर मानता, पण त्याच मंदिरात चोऱ्या-माऱ्या करून सत्तेवर आलेले लोक आमच्या अवतीभवती आहेत. त्या चोरांचे हस्तक म्हणून या देशाचं निवडणूक आयोग काम करते. ३०० खासदार जेव्हा रस्त्यावर उतरून निवडणूक आयोगाच्या दिशेने जात होते, तेव्हा त्यांना दिल्ली पोलिसांकडून अडवण्यात आले, धक्काबुक्की करण्यात आली, बॅरिकेड्स टाकण्यात आले. आम्ही अतिरेकी, दहशतवादी आहोत का?, असा सवाल संजय राऊतांनी करत टीका केली.

निवडणूक आयोगाला हृदयविकाराचा झटका आला असता का?

३०० खासदार निवडणूक आयोगसमोर जाऊन उभे राहिले असते आणि त्यांनी आपली भूमिका किंवा निवदेन मांडले असते तर निवडणूक आयोगाला हृदयविकाराचा झटका आला असता का? निवडणूक आयोग नेमके कोणाला घाबरत आहे? लोकशाहीचे रखवालदार म्हणून आम्ही निवडणूक आयोगाकडे पाहतो, त्यांनी निष्पक्ष निवडणुका घेतल्या पाहिजेत असे आम्ही मानतो. पण हा निवडणूक आयोग रखवालदार नसून तो चोर आहे. रखवालदार चोराच्या भूमिकेत शिरला आहे आणि चोरांच्या मदतीने विरोधी पक्षांना खतम करण्याचा प्रयत्न सुरू आहे, या शब्दांत संजय राऊत यांनी हल्लाबोल केला. 

दरम्यान, नरेंद्र मोदी, अमित शहा हे काही अजरामर नाहीत, त्यांनाही कधीतरी या सत्तेवरून आणि जगातून जायचे आहेच, हे लक्षात घ्यावे. निवडणूक आयोगाच्या खुर्चीवर बसलेल्यांनी हे समजून घेतले पाहिजे. लोकशाही टिकली तर हा देश टिकेल. त्यांनी आम्हाला रस्त्यावर अटक केली, आम्हाला पोलीस स्टेशनमध्ये डिटेन करण्यात आले, अटकेची कागदपत्रे करायला उशीर झाला, त्यामुळे  आम्ही संसदेत पोहोचू शकलो नाही. त्याच काळात त्यांनी सगळी बिले मंजूर करून घेतली. हे सरकार किती कारस्थान करत आहे. मोदी, शहा, फडणवीस हे सरळमार्गाने नव्हे तर लांड्यालबाड्या करून सत्तेवर आले आहेत, अशी टीका संजय राऊतांनी केली. 

 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतShiv SenaशिवसेनाElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग