शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये शिंदेसेनेची महायुतीकडं पाठ, स्वबळावर लढणार, गणित कुठं बिघडलं?
2
Municipal Election: भाजपचा मोठा निर्णय; मंत्री, खासदार आणि आमदारांच्या नातेवाईकांना महापालिकेचं तिकीट नाही!
3
Mumbai: भांडुपमध्ये भीषण अपघात! रिव्हर्स घेताना 'बेस्ट' बसची प्रवाशांना धडक; अनेकजण जखमी
4
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
5
तीन कोटींचा विमा आणि सरकारी नोकरीसाठी मुलाने रचला भयंकर कट, वडिलांना सर्पदंश करवला, त्यानंतर...
6
संभाजीनगरात 'हायव्होल्टेज' ड्रामा; जंजाळांच्या डोळ्यात अश्रू, शिरसाटांच्या घराबाहेर कार्यकर्ते जमा
7
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
8
BMC Elections: किशोरी पेडणेकर यांना अखेर एबी फॉर्म मिळाला; उमेदवारी मिळताच ठाकरेंची रणरागिनी गरजली!
9
जेवणावळीत ऐनवेळी भात संपला, संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी मिळेल त्यावर ताव मारला, व्हिडीओ व्हायरल  
10
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
11
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
12
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
13
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
14
Kishori Pednekar: अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
15
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
16
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
17
न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय मालिकेपूर्वी विराटने घेतला मोठा निर्णय, आता...
18
BMC Election 2026: मुंबई मनपासाठी काँग्रेसकडून ८७ उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध, ‘या’ चेहऱ्यांना संधी  
19
क्रिकेट खेळताना वाद, लग्नाच्या रिसेप्शनमध्ये चाकू हल्ला; कुणालचा रेल्वे स्टेशन जवळच्या झुडूपात सापडला मृतदेह
20
"अन्याय कितीही मोठा असला तरी..." मुंबईत भाजपाच्या माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत
Daily Top 2Weekly Top 5

Sanjay Raut News ...म्हणजे अजित डोवालही या कटात सहभागी असू शकतात; खासदार संजय राऊतांचा गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2024 11:38 IST

Sanjay Raut News वेशांतर करून मुंबई, दिल्ली प्रवास करणाऱ्या या तिघांनी देशाची सुरक्षा धोक्यात आणली, या कटात अजित डोवालही सहभागी असू शकतात असं सांगत संजय राऊतांनी एकनाथ शिंदे, अजित पवार, देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला. 

नवी दिल्ली - आमच्यासारख्या खासदार, मंत्र्यांनाही सीआरपीएफनं विमानतळावर थांबवलं आहे मग या ३ लोकांना ज्यांनी अनेकदा मुल्ला मौलवींची वेशांतर करून जात होते. खोटे पॅनकार्ड, खोटे आधारकार्ड बनवले गेले. या लोकांना सुरक्षित बाहेर पडता यावे यासाठी दिल्लीतल्या गृहमंत्रालयाकडून सूचना दिल्याच असाव्यात. या देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल हेदेखील या कटात सहभागी असू शकतात, ते काय करत होते?, मुंबई, दिल्ली विमानतळावरील सुरक्षा धोक्यात आली आहे मग या जेम्स बोन्डच्या दंतकथा आम्ही ऐकतो ते काय करत होते असा सवाल उपस्थित करत संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.

दिल्लीत संजय राऊतांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी राऊत म्हणाले की, महाराष्ट्रात बारामतीचे नवे विष्णूदास आहेत, कारण विष्णूचे १३ वे अवतार दिल्लीत आहेत. त्यांची नाट्यकला समोर आली आहे. पडद्यामागची पटकथाही हळूहळू बाहेर येईल. महाराष्ट्रातील जनतेने याचा आनंद घेतला पाहिजे. एकनाथ शिंदे यांनी मौलवीचा वेश धारण करून दिल्लीत प्रवेश केला होता. अनेक वेशांतरे केले होते. एकनाथ शिंदे, अजित पवार, देवेंद्र फडणवीस हे वेशांतर करून फिरतायेत हे सगळे हरूण अल रशीदची पोरं आहेत. हरुण अल रशीद अशी वेशांतर करून फिरायचा असा टोला त्यांनी सत्ताधाऱ्यांना लगावला.

तसेच राष्ट्रीय सुरक्षा कशी धोक्यात येऊ शकते याचं उत्तम उदाहरण एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवारांनी देशाला दाखवून दिलंय. राज्यात मंत्रिमंडळ नसून नाट्यमंडळ आहे. रंगभूमीला फार मोठी परंपरा आहे. मात्र हा जो काही प्रकार सुरू आहे तो देशाला, महाराष्ट्राला घातक आहे. तुम्ही खोटी नावे, खोटी कागदपत्रे, वेशांतर करून मुंबई, दिल्लीसारख्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रवास करता, सीआरपीएफची जबाबदारी अमित शाहांच्या हातात आहे. याचा अर्थ शाहांनी या लोकांना सोडावं असं सांगितले होते. दाऊद, नीरव मोदी, विजय माल्ल्या, मेहल चौकसी, टायगर मेमन यांना आजपर्यंत असं सोडलंय का? हा चिंतेचा विषय आहे असं सांगत संजय राऊतांनी गृहमंत्री अमित शाहांवर प्रश्नचिन्ह उभे केले.

दरम्यान, मातोश्रीबाहेर मराठा आंदोलकांनी आंदोलन केलं हे भाजपाचं कटकारस्थान आहे. त्याला फडणवीस टच असं म्हणतात. जोपर्यंत महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस आहेत तोपर्यंत मराठी माणसाला सुख, शांतता लाभणार नाही. त्यामुळे महाराष्ट्र सुखात, शांततेत नांदवायचा असेल तर राज्यात सत्तांतर घडवावं लागेल असं सांगत ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल केला.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसSanjay Rautसंजय राऊतAjit Pawarअजित पवारEknath Shindeएकनाथ शिंदेAmit Shahअमित शाह