शहरं
Join us  
Trending Stories
1
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
2
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
3
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
4
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
5
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
6
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
7
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
8
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल
9
MPSC Exam 2025: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर
10
IND vs PAK : भारत-पाक लढाई अन् 'गन' सेलिब्रेशनचा वाद! पाकिस्तानी फलंदाजानं घेतलं धोनी-कोहलीचं नाव
11
'मोदी-पुतीन यांच्यात चर्चा नाही, नाटो प्रमुख खोटं बोलताहेत'; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं, "बोलताना जरा..."
12
सोयाबीन शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी ५० हजार मदत द्या; विजय वडेट्टीवारांचे कृषिमंत्र्यांना पत्र
13
"मंत्र्यांच्या दौऱ्यामुळे सरकारचे पंचनाम्याऐवजी राजशिष्टाचाराकडे लक्ष"; शरद पवारांनी शासनाला दिला सल्ला
14
VIDEO: पाकिस्तानच्या मंत्र्यांची 'आंतरराष्ट्रीय' फजिती, AI वर भाषण देताना अनेक उच्चार चुकले
15
“ओबीसी आरक्षण टिकवण्यासाठी आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा करणार आहोत, विजय मिळवणार”: छगन भुजबळ
16
PM मोदींशी १ तास नेमकी काय चर्चा झाली? CM फडणवीसांनी दिली सगळी माहिती; म्हणाले, “कर्जमाफी...”
17
“CM फडणवीसांनी शेतकऱ्यांसाठी दिल्लीतून भरीव पॅकेज घेऊनच यावे, अन्यथा तेथेच थांबावे”: सपकाळ
18
PPF, SSY आणि SCSS च्या व्याजदरांमध्ये वाढ होणार? कोट्यवधी अल्पबचतधारकांना उत्सुकता
19
फक्त 1999 रुपये EMI...! बाइक सोडून थेट कारच खरेदी करतायत लोक, Maruti नं 5 दिवसांत विकल्या 80000 कार
20
Sonam Wangchuk: थेट सोनम वांगचूक यांना अटक, लडाख हिंसाचार प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई

Sanjay Raut News ...म्हणजे अजित डोवालही या कटात सहभागी असू शकतात; खासदार संजय राऊतांचा गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2024 11:38 IST

Sanjay Raut News वेशांतर करून मुंबई, दिल्ली प्रवास करणाऱ्या या तिघांनी देशाची सुरक्षा धोक्यात आणली, या कटात अजित डोवालही सहभागी असू शकतात असं सांगत संजय राऊतांनी एकनाथ शिंदे, अजित पवार, देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला. 

नवी दिल्ली - आमच्यासारख्या खासदार, मंत्र्यांनाही सीआरपीएफनं विमानतळावर थांबवलं आहे मग या ३ लोकांना ज्यांनी अनेकदा मुल्ला मौलवींची वेशांतर करून जात होते. खोटे पॅनकार्ड, खोटे आधारकार्ड बनवले गेले. या लोकांना सुरक्षित बाहेर पडता यावे यासाठी दिल्लीतल्या गृहमंत्रालयाकडून सूचना दिल्याच असाव्यात. या देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल हेदेखील या कटात सहभागी असू शकतात, ते काय करत होते?, मुंबई, दिल्ली विमानतळावरील सुरक्षा धोक्यात आली आहे मग या जेम्स बोन्डच्या दंतकथा आम्ही ऐकतो ते काय करत होते असा सवाल उपस्थित करत संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.

दिल्लीत संजय राऊतांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी राऊत म्हणाले की, महाराष्ट्रात बारामतीचे नवे विष्णूदास आहेत, कारण विष्णूचे १३ वे अवतार दिल्लीत आहेत. त्यांची नाट्यकला समोर आली आहे. पडद्यामागची पटकथाही हळूहळू बाहेर येईल. महाराष्ट्रातील जनतेने याचा आनंद घेतला पाहिजे. एकनाथ शिंदे यांनी मौलवीचा वेश धारण करून दिल्लीत प्रवेश केला होता. अनेक वेशांतरे केले होते. एकनाथ शिंदे, अजित पवार, देवेंद्र फडणवीस हे वेशांतर करून फिरतायेत हे सगळे हरूण अल रशीदची पोरं आहेत. हरुण अल रशीद अशी वेशांतर करून फिरायचा असा टोला त्यांनी सत्ताधाऱ्यांना लगावला.

तसेच राष्ट्रीय सुरक्षा कशी धोक्यात येऊ शकते याचं उत्तम उदाहरण एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवारांनी देशाला दाखवून दिलंय. राज्यात मंत्रिमंडळ नसून नाट्यमंडळ आहे. रंगभूमीला फार मोठी परंपरा आहे. मात्र हा जो काही प्रकार सुरू आहे तो देशाला, महाराष्ट्राला घातक आहे. तुम्ही खोटी नावे, खोटी कागदपत्रे, वेशांतर करून मुंबई, दिल्लीसारख्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रवास करता, सीआरपीएफची जबाबदारी अमित शाहांच्या हातात आहे. याचा अर्थ शाहांनी या लोकांना सोडावं असं सांगितले होते. दाऊद, नीरव मोदी, विजय माल्ल्या, मेहल चौकसी, टायगर मेमन यांना आजपर्यंत असं सोडलंय का? हा चिंतेचा विषय आहे असं सांगत संजय राऊतांनी गृहमंत्री अमित शाहांवर प्रश्नचिन्ह उभे केले.

दरम्यान, मातोश्रीबाहेर मराठा आंदोलकांनी आंदोलन केलं हे भाजपाचं कटकारस्थान आहे. त्याला फडणवीस टच असं म्हणतात. जोपर्यंत महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस आहेत तोपर्यंत मराठी माणसाला सुख, शांतता लाभणार नाही. त्यामुळे महाराष्ट्र सुखात, शांततेत नांदवायचा असेल तर राज्यात सत्तांतर घडवावं लागेल असं सांगत ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल केला.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसSanjay Rautसंजय राऊतAjit Pawarअजित पवारEknath Shindeएकनाथ शिंदेAmit Shahअमित शाह