शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
5
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
6
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
7
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
8
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
9
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
10
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
11
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
12
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
13
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
14
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
15
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
16
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
17
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
18
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
19
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे
20
डिंपल यादव यांच्याबद्दल वादग्रस्त विधान; मौलाना साजिद रशीदींना न्यूज चॅनेलच्या स्टुडिओमध्ये मारहाण

खुर्ची वाचविण्यासाठी जम्मू काश्मीरच्या राज्यपालांची चमचेगिरी- संजय निरुपम

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2019 10:44 IST

आपल्या देशात जितके राज्यपाल असतात ते सरकारचे चमचे असतात. सत्यपाल मलिक पण एक चमचे आहेत. राजीव गांधी यांना बोफार्स घोटाळ्याच्या आरोपातून कोर्टाकडून निर्दोष सिद्ध करण्यात आलं होतं

श्रीनगर - जम्मू काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी राजीव गांधींबाबत केलेल्या विधानावरुन काँग्रेसकडूनही जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. आपल्या देशात जितके राज्यपाल असतात ते सरकारचे चमचे असतात. सत्यपाल मलिक पण एक चमचे आहेत. राजीव गांधी यांना बोफार्स घोटाळ्याच्या आरोपातून कोर्टाकडून निर्दोष सिद्ध करण्यात आलं होतं असा टोला काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांनी सत्यपाल मलिक यांना लगावला आहे. 

राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी राजीव गांधी यांच्यावर टीका करताना म्हणाले होते की, सुरुवातीच्या काळात राजीव गांधी भ्रष्ट नव्हते मात्र काही लोकांच्या प्रभावात येऊन ते भ्रष्टाचारी झाले आणि बोफार्स घोटाळा केला. मलिक यांचा कथित ऑडिओ क्लीप सोशल मिडीयावर व्हायरल होत होता त्यामध्ये राजीव गांधी भ्रष्ट नाहीत असं बोललं जातं होतं. मात्र या ऑडिओ क्लीपवर राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी स्पष्टीकरण देताना हे वक्तव्य केलं होतं. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील रामलीला मैदानावरून आयोजित सभेत दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्यावर गंभीर आरोप केले होते. राजीव गांधी यांनी आयएनएस विराटचा वापर वैयक्तीक टॅक्सप्रमाणे केला होता, असा आरोप केला होता. त्यावरून राजकारण चांगलेच तापले असून राजीव गांधी यांचे त्यावेळचे मित्र अभिनेते अमिताभ बच्चन यांनी सत्य समोर आणावे असं आवाहन काँग्रेसकडून करण्यात आलं होतं. 

तर राहुल गांधी यांनीही . 'तुम्हाला माझ्याबद्दल बोलायचं आहे. राजीव गांधींबद्दल बोलायचं आहे. अगदी बिनधास्त बोला. पण राफेल प्रकरणात काय झालं, काय नाही झालं हेदेखील जनतेला सांगा,' असं आव्हान राहुल गांधींनी मोदींना दिलं होतं.  गेल्या काही दिवसांपासून पंतप्रधान मोदी वारंवार राजीव गांधींवर टीका करत आहेत

दरम्यान राजीव गांधी यांच्यावरुन होणाऱ्या राजकारणावर राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनीही भाष्य केलं होतं. गांधी घराण्याने देशाला दोन पंतप्रधान दिले. पंतप्रधानपदावर असताना इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांची हत्या झाली. देशासाठी एवढा मोठा त्याग केलेल्या गांधी घराण्याविषयी बोलताना आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काळजी घ्यावी, त्यांचं लक्षण काही चांगलं नाही अशा शब्दांत राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी नरेंद्र मोदी यांना ठणकावले होते. 

 

टॅग्स :Sanjay Nirupamसंजय निरुपमRajiv Gandhiराजीव गांधीcongressकाँग्रेसJammu Kashmirजम्मू-काश्मीर