शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
2
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
3
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
4
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
5
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
6
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
7
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
8
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
9
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
10
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
11
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
12
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
13
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
14
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
15
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
16
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
17
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
18
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
19
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
20
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली

खुर्ची वाचविण्यासाठी जम्मू काश्मीरच्या राज्यपालांची चमचेगिरी- संजय निरुपम

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2019 10:44 IST

आपल्या देशात जितके राज्यपाल असतात ते सरकारचे चमचे असतात. सत्यपाल मलिक पण एक चमचे आहेत. राजीव गांधी यांना बोफार्स घोटाळ्याच्या आरोपातून कोर्टाकडून निर्दोष सिद्ध करण्यात आलं होतं

श्रीनगर - जम्मू काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी राजीव गांधींबाबत केलेल्या विधानावरुन काँग्रेसकडूनही जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. आपल्या देशात जितके राज्यपाल असतात ते सरकारचे चमचे असतात. सत्यपाल मलिक पण एक चमचे आहेत. राजीव गांधी यांना बोफार्स घोटाळ्याच्या आरोपातून कोर्टाकडून निर्दोष सिद्ध करण्यात आलं होतं असा टोला काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांनी सत्यपाल मलिक यांना लगावला आहे. 

राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी राजीव गांधी यांच्यावर टीका करताना म्हणाले होते की, सुरुवातीच्या काळात राजीव गांधी भ्रष्ट नव्हते मात्र काही लोकांच्या प्रभावात येऊन ते भ्रष्टाचारी झाले आणि बोफार्स घोटाळा केला. मलिक यांचा कथित ऑडिओ क्लीप सोशल मिडीयावर व्हायरल होत होता त्यामध्ये राजीव गांधी भ्रष्ट नाहीत असं बोललं जातं होतं. मात्र या ऑडिओ क्लीपवर राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी स्पष्टीकरण देताना हे वक्तव्य केलं होतं. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील रामलीला मैदानावरून आयोजित सभेत दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्यावर गंभीर आरोप केले होते. राजीव गांधी यांनी आयएनएस विराटचा वापर वैयक्तीक टॅक्सप्रमाणे केला होता, असा आरोप केला होता. त्यावरून राजकारण चांगलेच तापले असून राजीव गांधी यांचे त्यावेळचे मित्र अभिनेते अमिताभ बच्चन यांनी सत्य समोर आणावे असं आवाहन काँग्रेसकडून करण्यात आलं होतं. 

तर राहुल गांधी यांनीही . 'तुम्हाला माझ्याबद्दल बोलायचं आहे. राजीव गांधींबद्दल बोलायचं आहे. अगदी बिनधास्त बोला. पण राफेल प्रकरणात काय झालं, काय नाही झालं हेदेखील जनतेला सांगा,' असं आव्हान राहुल गांधींनी मोदींना दिलं होतं.  गेल्या काही दिवसांपासून पंतप्रधान मोदी वारंवार राजीव गांधींवर टीका करत आहेत

दरम्यान राजीव गांधी यांच्यावरुन होणाऱ्या राजकारणावर राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनीही भाष्य केलं होतं. गांधी घराण्याने देशाला दोन पंतप्रधान दिले. पंतप्रधानपदावर असताना इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांची हत्या झाली. देशासाठी एवढा मोठा त्याग केलेल्या गांधी घराण्याविषयी बोलताना आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काळजी घ्यावी, त्यांचं लक्षण काही चांगलं नाही अशा शब्दांत राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी नरेंद्र मोदी यांना ठणकावले होते. 

 

टॅग्स :Sanjay Nirupamसंजय निरुपमRajiv Gandhiराजीव गांधीcongressकाँग्रेसJammu Kashmirजम्मू-काश्मीर