शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
4
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
5
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
6
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
7
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
8
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
9
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
10
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
11
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
12
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
13
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
14
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
15
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
16
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
17
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
18
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
19
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

"मुलींच्या लग्नाचं वय 16-17 करावं कारण उशीर झाला तर त्या अश्लील व्हिडीओ पाहतील", सपा नेत्याचं वादग्रस्त विधान 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2021 08:27 IST

MP ST Hasan : समाजवादी पक्षाचे खासदार एसटी हसन यांनी "मला वाटतं की, जर मुलगी समजदार असेल तर तिचं लग्न 16 व्या वर्षी केलं तरी त्यात काही गैर नाही" असं म्हटलं आहे.

नवी दिल्ली - मुलीचं लग्नासाठीचं किमान वय वाढवण्याशी संबंधित एका विधेयकाला केंद्रीय कॅबिनेटनं मंजुरी दिली आहे. लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी याबद्दलचे संकेत दिले होते. मुलींचं लग्नाचं किमान वय सध्या 18 वर्ष आहे. ते वाढवून 21 करण्याचा सरकारचा विचार आहे. त्यासाठीची तयारी सरकारनं सुरुवात केली आहे. याबद्दलचं विधेयक याच अधिवेशनात मांडलं जाण्याची शक्यता आहे. सध्या संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू आहे. याच दरम्यान समाजवादी पक्षाच्या खासदाराने यावर एक वादग्रस्त विधान केलं आहे. "मुली 16 व्या वर्षी आई बनू शकतात, तेच त्यांचं लग्नाचं वय असावं" असं म्हटलं आहे. 

समाजवादी पक्षाचे खासदार एसटी हसन (MP ST Hasan) यांनी "मला वाटतं की, जर मुलगी समजदार असेल तर तिचं लग्न 16 व्या वर्षी केलं तरी त्यात काही गैर नाही" असं म्हटलं आहे. तसेच "जर मुलगी 18 व्या वर्षी मतदान करू शकते, तर ती लग्न का करू शकत नाही?" असा सवालही त्यांनी उपस्थित केला. "मुलींच्या लग्नाचे वय 18 वरून 16-17 करण्यात यावे. लग्नाला उशीर झाला तर त्या मुली अश्लील व्हिडीओ (पोर्नोग्राफी) पाहत बसतील, घाणेरडे चित्रपट पाहतील आणि हे सगळं व्यर्थ आहे. त्यामुळे मुली वयात आल्यावर त्यांचं लग्न करायला हवं" असं देखील एसटी हसन यांनी म्हटलं आहे. 

"लग्न लवकर झालं तर त्या मुलीला लवकर मुलं होऊ शकतात"

सपा खासदार एसटी हसन यांनी "जर लग्न लवकर झालं तर त्या मुलीला लवकर मुलं होऊ शकतात, कारण प्रजननक्षमतेचे (फर्टिलिटी) वय 15 ते 30 वर्षे आहे. अशा स्थितीत लग्नाचे वय वाढवू नये" असं म्हटलं आहे. समाजवादी पक्षाचे खासदार शफीक उर रहमान वर्क यांनी या प्रस्तावाबाबत आक्षेपार्ह विधान केलं आणि लग्नाचे वय वाढवल्याने मुली आणखी बिघडतील, असं त्यांनी म्हटलं होतं. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. लग्नाचं किमान वय वाढवण्यासाठी बाल विवाह कायद्यात सुधारणा केली जाईल. या कायद्यात सध्या मुलींचं लग्नासाठी किमान वय 18 वर्षे आहे. कायद्यात बदल करण्यासाठी सुधारणा विधेयकाला बुधवारी झालेल्या कॅबिनेटमध्ये मंजुरी देण्यात आली आहे. पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली ही बैठक संपन्न झाली. 

मुलींच्या लग्नासाठीच्या किमान वयाबद्दल निर्णय घेण्यासाठी गेल्या वर्षी एका टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली होती. त्या टास्क फोर्सनं लग्नासाठीचं किमान वय 18 वर्षावरून 21 वर्षे करण्याचा सल्ला दिला होता. माजी खासदार जया जेटलींच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वातंत्र्य दिनी देशाला लाल किल्ल्यावरून संबोधित केलं. त्यावेळी मोदींनी भाषणात लग्नासाठीचं किमान वय वाढवण्याबद्दल संकेत दिले होते. सध्याची परिस्थिती पाहता लग्नाचं वय वाढवण्यासंदर्भात विचार व्हायला हवा, असं मोदी म्हणाले होते. 

टॅग्स :marriageलग्नSamajwadi Partyसमाजवादी पार्टीWomenमहिला