शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
5
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
6
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
7
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
8
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
9
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
10
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
11
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
12
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
13
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
14
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
15
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
16
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
17
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
18
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
19
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे
20
डिंपल यादव यांच्याबद्दल वादग्रस्त विधान; मौलाना साजिद रशीदींना न्यूज चॅनेलच्या स्टुडिओमध्ये मारहाण

“इलेक्टोरल बॉण्डमुळे मोदी सरकारचा बॅण्ड वाजला, भाजपा भ्रष्टाचाराचे गोडाऊन झाले”: अखिलेश यादव

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2024 11:34 IST

Akhilesh Yadav News: भाजपाच्या नैतिकतेचा बुडबुडा फुटला आहे. भाजपाची प्रत्येक गोष्ट खोटी आहे, अशी टीका अखिलेश यादव यांनी केली.

Akhilesh Yadav News: इलेक्टोरल बॉण्डमुळे मोदी सरकारचा बॅण्ड वाजला आहे. भाजपा सर्व प्रकारच्या भ्रष्टाचाराचे गोडाऊन बनले आहे. केवळ भ्रष्टाचारी लोकांना पक्षात घेत नाहीत, तर भ्रष्टाचारी लोकांनी जो पैसा कमावला आहे, तोही घेत आहेत. डबल इंजिन सरकारचा दावा करणारे आता होर्डिंग्सवर फक्त एकाचाच फोटो लावत आहेत, या शब्दांत समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी भाजपा आणि केंद्रातील मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले.

काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांच्यासोबत घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत बोलताना अखिलेश यादव यांनी टीकास्त्र सोडले. भाजपाची प्रत्येक गोष्ट खोटी आहे. त्यांनी दिलेली आश्वासने खोटी आहेत. भाजपाने सांगितले होते की, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होईल, तरुणांना रोजगार मिळेल. विकासाची अनेक स्वप्ने दाखवण्यात आली. मात्र, नैतिकतेचा बुडबुडा फुटला आहे. भाजपाने दिलेली आश्वासने फोल ठरली आहेत, असे अखिलेश यादव यांनी म्हटले आहे. 

 जातिनिहाय जनगणना हाही एक महत्त्वाचा मुद्दा आहे

इंडिया आघाडी ही निवडणुकीतील नवीन आशा आहे. राहुल गांधी यांनी सांगितल्याप्रमाणे, त्यांच्या जाहीरनाम्यात अनेक गोष्टी आहेत, ज्याद्वारे गरिबी हटवता येऊ शकेल. ज्या दिवशी देशातील शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांना योग्य भाव मिळू लागेल, त्या दिवशी शेतकरी सुखी होतील. इंडिया आघाडीतील घटक पक्ष सांगत आहेत की, आम्ही एमएसपीची गॅरंटी देऊ. ज्या दिवशी भारत सरकार शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवेल, त्या दिवसापासून देशातील गरिबी दूर व्हायला सुरुवात होईल. जातिनिहाय जनगणना हाही एक महत्त्वाचा मुद्दा आहे. सामाजिक न्यायाशिवाय समाजाला पुढे घेऊन जाऊ शकत नाही, असे अखिलेश यादव यांनी सांगितले. 

दरम्यान, ही निवडणूक विचारधारेची आहे. भाजपा संविधान संपवणार आहे. संविधान वाचवण्याची ही निवडणूक असून इंडिया आघाडी आणि काँग्रेस पक्ष लोकशाही वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. पंतप्रधान मोदी भ्रष्टाचाराचे चॅम्पियन आहेत. या निवडणुकीत भाजपाला केवळ १५० जागा मिळतील असा दावा काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केला आहे. तसचे १५-२० दिवसांपूर्वी मला वाटत होते की, भाजपा १८० जागा जिंकेल. परंतु आता १५० जागा भाजपाला मिळतील असे वाटते. आम्हाला प्रत्येक राज्यातून इंडिया आघाडी मजबूत होते, असा रिपोर्ट मिळत आहे, असे राहुल गांधी म्हणाले.  

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Uttar Pradesh Lok Sabha Election 2024उत्तर प्रदेश लोकसभा निवडणूक निकाल २०२४Akhilesh Yadavअखिलेश यादवSamajwadi Partyसमाजवादी पार्टीINDIA Opposition Allianceइंडिया आघाडी