शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
2
Air India Plane Crash Video: लंडनच्या दिशेने झेपावले अन् काही क्षणातच कोसळले; असा झाला अपघात
3
Ahmedabad Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातानंतर मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी दिले 'हे' महत्त्वाचे निर्देश! म्हणाले... 
4
Air India Plane Crash: गुजरातमध्ये विमान कोसळलं, जीविनहानीची शक्यता; देशातील ५ मोठे विमान अपघात कोणते?
5
Plane Crash: अहमदाबादमध्ये प्रवासी विमानाच्या अपघातानंतर एअर इंडियाचे ट्विट, दिली महत्त्वाची माहिती
6
Video: आकाशात धूरांचे लोट, अहमदाबाद विमान अपघाताचा व्हिडीओ आला समोर
7
Sankashti Chaturthi 2025: ज्येष्ठ महिन्यातील संकष्ट चतुर्थी, 'या' ९ राशींवर होणार बाप्पाचा कृपावर्षाव!
8
धक्कादायक! आधी दारू पाजली, मग गळा आवळला; प्रियकर आणि पतीच्या मदतीने जुन्या बॉयफ्रेंडचा काटा काढला!
9
'मंत्र्यांना भरसभांमध्ये तुडवल्याशिवाय गप्प बसू नका', राजू शेट्टींचे लोकांना आवाहन, महायुतीवर का भडकले?
10
तुर्की-पाकिस्तानच्या जोडीला भारताचं खुलं आव्हान; २३ वर्षानंतर पुन्हा जुनी मैत्री अन् नवा डाव
11
"जा अन् वडिलांप्रमाणे रिक्षा चालव"; सिराजनं शेअर केलेली लांबलचक पोस्ट चर्चेत
12
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
13
जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशनचा मोठा खुलासा केला, म्हणाली- "मुलगा अंगदच्या जन्मानंतर..."
14
विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशी पुस्तके मिळणार
15
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
16
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
17
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
18
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
19
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
20
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप

“इलेक्टोरल बॉण्डमुळे मोदी सरकारचा बॅण्ड वाजला, भाजपा भ्रष्टाचाराचे गोडाऊन झाले”: अखिलेश यादव

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2024 11:34 IST

Akhilesh Yadav News: भाजपाच्या नैतिकतेचा बुडबुडा फुटला आहे. भाजपाची प्रत्येक गोष्ट खोटी आहे, अशी टीका अखिलेश यादव यांनी केली.

Akhilesh Yadav News: इलेक्टोरल बॉण्डमुळे मोदी सरकारचा बॅण्ड वाजला आहे. भाजपा सर्व प्रकारच्या भ्रष्टाचाराचे गोडाऊन बनले आहे. केवळ भ्रष्टाचारी लोकांना पक्षात घेत नाहीत, तर भ्रष्टाचारी लोकांनी जो पैसा कमावला आहे, तोही घेत आहेत. डबल इंजिन सरकारचा दावा करणारे आता होर्डिंग्सवर फक्त एकाचाच फोटो लावत आहेत, या शब्दांत समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी भाजपा आणि केंद्रातील मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले.

काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांच्यासोबत घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत बोलताना अखिलेश यादव यांनी टीकास्त्र सोडले. भाजपाची प्रत्येक गोष्ट खोटी आहे. त्यांनी दिलेली आश्वासने खोटी आहेत. भाजपाने सांगितले होते की, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होईल, तरुणांना रोजगार मिळेल. विकासाची अनेक स्वप्ने दाखवण्यात आली. मात्र, नैतिकतेचा बुडबुडा फुटला आहे. भाजपाने दिलेली आश्वासने फोल ठरली आहेत, असे अखिलेश यादव यांनी म्हटले आहे. 

 जातिनिहाय जनगणना हाही एक महत्त्वाचा मुद्दा आहे

इंडिया आघाडी ही निवडणुकीतील नवीन आशा आहे. राहुल गांधी यांनी सांगितल्याप्रमाणे, त्यांच्या जाहीरनाम्यात अनेक गोष्टी आहेत, ज्याद्वारे गरिबी हटवता येऊ शकेल. ज्या दिवशी देशातील शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांना योग्य भाव मिळू लागेल, त्या दिवशी शेतकरी सुखी होतील. इंडिया आघाडीतील घटक पक्ष सांगत आहेत की, आम्ही एमएसपीची गॅरंटी देऊ. ज्या दिवशी भारत सरकार शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवेल, त्या दिवसापासून देशातील गरिबी दूर व्हायला सुरुवात होईल. जातिनिहाय जनगणना हाही एक महत्त्वाचा मुद्दा आहे. सामाजिक न्यायाशिवाय समाजाला पुढे घेऊन जाऊ शकत नाही, असे अखिलेश यादव यांनी सांगितले. 

दरम्यान, ही निवडणूक विचारधारेची आहे. भाजपा संविधान संपवणार आहे. संविधान वाचवण्याची ही निवडणूक असून इंडिया आघाडी आणि काँग्रेस पक्ष लोकशाही वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. पंतप्रधान मोदी भ्रष्टाचाराचे चॅम्पियन आहेत. या निवडणुकीत भाजपाला केवळ १५० जागा मिळतील असा दावा काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केला आहे. तसचे १५-२० दिवसांपूर्वी मला वाटत होते की, भाजपा १८० जागा जिंकेल. परंतु आता १५० जागा भाजपाला मिळतील असे वाटते. आम्हाला प्रत्येक राज्यातून इंडिया आघाडी मजबूत होते, असा रिपोर्ट मिळत आहे, असे राहुल गांधी म्हणाले.  

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Uttar Pradesh Lok Sabha Election 2024उत्तर प्रदेश लोकसभा निवडणूक निकाल २०२४Akhilesh Yadavअखिलेश यादवSamajwadi Partyसमाजवादी पार्टीINDIA Opposition Allianceइंडिया आघाडी