शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: भगूर नगरपरिषदेत शिवसेनेची २५ वर्षांची सत्ता अजितदादांच्या राष्ट्रवादीने उलथवली; पहा लेटेस्ट अपडेट
2
अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी
3
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
4
Maharashtra Local Body Election Results 2025: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
5
घर खरेदीचे स्वप्न होणार साकार! 'ही' बँक देतेय स्वस्त होम लोन; ५० लाखांच्या कर्जासाठी किती हवी सॅलरी?
6
नात्याला काळीमा! विम्याच्या पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
7
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
8
Nora Fatehi : "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती?
9
घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली...
10
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
11
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
12
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
13
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
14
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
15
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
16
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
17
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
18
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
19
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
20
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
Daily Top 2Weekly Top 5

“इलेक्टोरल बॉण्डमुळे मोदी सरकारचा बॅण्ड वाजला, भाजपा भ्रष्टाचाराचे गोडाऊन झाले”: अखिलेश यादव

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2024 11:34 IST

Akhilesh Yadav News: भाजपाच्या नैतिकतेचा बुडबुडा फुटला आहे. भाजपाची प्रत्येक गोष्ट खोटी आहे, अशी टीका अखिलेश यादव यांनी केली.

Akhilesh Yadav News: इलेक्टोरल बॉण्डमुळे मोदी सरकारचा बॅण्ड वाजला आहे. भाजपा सर्व प्रकारच्या भ्रष्टाचाराचे गोडाऊन बनले आहे. केवळ भ्रष्टाचारी लोकांना पक्षात घेत नाहीत, तर भ्रष्टाचारी लोकांनी जो पैसा कमावला आहे, तोही घेत आहेत. डबल इंजिन सरकारचा दावा करणारे आता होर्डिंग्सवर फक्त एकाचाच फोटो लावत आहेत, या शब्दांत समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी भाजपा आणि केंद्रातील मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले.

काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांच्यासोबत घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत बोलताना अखिलेश यादव यांनी टीकास्त्र सोडले. भाजपाची प्रत्येक गोष्ट खोटी आहे. त्यांनी दिलेली आश्वासने खोटी आहेत. भाजपाने सांगितले होते की, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होईल, तरुणांना रोजगार मिळेल. विकासाची अनेक स्वप्ने दाखवण्यात आली. मात्र, नैतिकतेचा बुडबुडा फुटला आहे. भाजपाने दिलेली आश्वासने फोल ठरली आहेत, असे अखिलेश यादव यांनी म्हटले आहे. 

 जातिनिहाय जनगणना हाही एक महत्त्वाचा मुद्दा आहे

इंडिया आघाडी ही निवडणुकीतील नवीन आशा आहे. राहुल गांधी यांनी सांगितल्याप्रमाणे, त्यांच्या जाहीरनाम्यात अनेक गोष्टी आहेत, ज्याद्वारे गरिबी हटवता येऊ शकेल. ज्या दिवशी देशातील शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांना योग्य भाव मिळू लागेल, त्या दिवशी शेतकरी सुखी होतील. इंडिया आघाडीतील घटक पक्ष सांगत आहेत की, आम्ही एमएसपीची गॅरंटी देऊ. ज्या दिवशी भारत सरकार शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवेल, त्या दिवसापासून देशातील गरिबी दूर व्हायला सुरुवात होईल. जातिनिहाय जनगणना हाही एक महत्त्वाचा मुद्दा आहे. सामाजिक न्यायाशिवाय समाजाला पुढे घेऊन जाऊ शकत नाही, असे अखिलेश यादव यांनी सांगितले. 

दरम्यान, ही निवडणूक विचारधारेची आहे. भाजपा संविधान संपवणार आहे. संविधान वाचवण्याची ही निवडणूक असून इंडिया आघाडी आणि काँग्रेस पक्ष लोकशाही वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. पंतप्रधान मोदी भ्रष्टाचाराचे चॅम्पियन आहेत. या निवडणुकीत भाजपाला केवळ १५० जागा मिळतील असा दावा काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केला आहे. तसचे १५-२० दिवसांपूर्वी मला वाटत होते की, भाजपा १८० जागा जिंकेल. परंतु आता १५० जागा भाजपाला मिळतील असे वाटते. आम्हाला प्रत्येक राज्यातून इंडिया आघाडी मजबूत होते, असा रिपोर्ट मिळत आहे, असे राहुल गांधी म्हणाले.  

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Uttar Pradesh Lok Sabha Election 2024उत्तर प्रदेश लोकसभा निवडणूक निकाल २०२४Akhilesh Yadavअखिलेश यादवSamajwadi Partyसमाजवादी पार्टीINDIA Opposition Allianceइंडिया आघाडी