शहरं
Join us  
Trending Stories
1
गोंदियात EVM चं सील तोडल्याचा आरोप तर सांगलीत रातोरात मतदान वाढल्याचा दावा; स्टाँगरूमबाहेर राडा
2
पुतिन यांच्या भेटीपूर्वी युरोपने भारताला युद्ध संपवण्याचे आवाहन केले; म्हणाले, ते तुमचे ऐकतात...'
3
मुंबईत दुबार मतदारांचा गोंधळात गोंधळ सुरुच; पहिल्याच प्रयोगात नावाशी साधर्म्य असणारेच सर्वाधिक मतदार
4
स्मार्टफोनमध्ये संचार साथी ॲप अनिवार्य नाही; सर्व बाजूंनी टीका झाल्यानंतर सरकारची माघार
5
"मी इतकंच सांगेन की...", विजय देवरकोंडासोबत लग्नाच्या चर्चांवर रश्मिका मंदानाने सोडलं मौन
6
Video: बिहारमध्ये लग्नाच्या पंगतीत रसगुल्ले कमी पडल्यानं तुंबळ हाणामारी; वऱ्हाडी भिडले अन्...
7
मुलींसाठी LIC ची जबरदस्त स्कीम, ₹१२१ रुपयांच्या बचतीतून मिळेल लाखोंचा रिटर्न; कोणती आहे योजना?
8
पतीची हत्या करून ड्रममध्ये टाकणाऱ्या मुस्कानची नवी मागणी; म्हणे, मुलीचा चेहरा प्रियकराला दाखवायचाय!
9
शेअर बाजारात आधी घसरण मग सावरला; सेन्सेक्समध्ये ३५ अंकांची तेजी, निफ्टी २५,९९५ च्या पुढे
10
कर्जासाठी कायपण! पाकिस्तानला विकावी लागणार सरकारी विमान कंपनी; 'फिल्ड मार्शल' मुनीर यांचा डोळा
11
"डोळे मिट, मनात इच्छा धर, फुंकर मार"... रोहित शर्मा- ऋषभ पंत यांचा भर मैदानात वेगळाच 'खेळ'; व्हिडिओ व्हायरल
12
भाजपाचं धक्कातंत्र सुरूच...! श्रीकांत शिंदेंच्या मतदारसंघातील शिंदेसेनेचे बडे नेते लावले गळाला
13
Post Office मध्ये ६० महिन्यांसाठी २ लाख रुपये जमा केले तर मॅच्युरिटीवर किती रक्कम मिळेल? पटापट चेक करा डिटेल्स
14
आजचे राशीभविष्य, ४ डिसेंबर २०२५: अचानक धनप्राप्ती अन् विविध फायदे होतील, ज्याने आनंदित व्हाल
15
Orange Gate Tunnel: सोळा मजली उंच इमारतीइतक्या खोल, ७०० इमारतींखालून जाणार ऑरेंज गेट बोगदा
16
Bike Taxi: बेकायदेशीर बाईक टॅक्सी चालवणाऱ्या ' रॅपिडो, उबेर 'ला बसणार दणका; कंपन्यांवर गुन्हे दाखल होणार
17
संयुक्त राष्ट्रात १० दिवसांत भारताविरोधात ३ प्रस्ताव; रशियानं 'व्हेटो' वापरत निभावली मैत्री
18
प्रशिक्षणादरम्यान F-16C लढाऊ विमान वाळवंटात कोसळलं; कॅलिफोर्नियातील थरारक घटना!
19
रुपया नव्वदीपार, गाठला ऐतिहासिक तळ; महागाई वाढणार, विद्यार्थ्यांपासून गृहिणींपर्यंत सर्वांना बसणार फटका
20
हळद पिवळी पोर कवळी...! तेजस्वीनी लोणारीची लगीनघाई, हळदी समारंभाचे फोटो समोर
Daily Top 2Weekly Top 5

'राहुल गांधी यांनी अध्यक्षपद सोडणं हीच काँग्रेसची समस्या'

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2019 12:36 IST

राहुल गांधी लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला.

ठळक मुद्देकाँग्रेसचे जेष्ठ नेते सलमान खुर्शीद यांनी काँग्रेस पक्षाच्या सद्यस्थितीवर चिंता व्यक्त केली आहे. राहुल गांधी यांनी पद सोडणं हीच काँग्रेससाठी समस्या असल्याचं सलमान खुर्शीद यांनी म्हटलं आहे.राहुल गांधींच्या या निर्णयामुळे लोकसभा निवडणुकीच्या पराभवानंतरही पक्षाला आत्मपरीक्षण करता आलेले नाही.

नवी दिल्ली - काँग्रेसचे जेष्ठ नेते सलमान खुर्शीद यांनी काँग्रेस पक्षाच्या सद्यस्थितीवर चिंता व्यक्त केली आहे. राहुल गांधी लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यावर पहिल्यांदा खुर्शीद यांनी वक्तव्य केलं आहे. राहुल गांधी यांनी पद सोडणं हीच काँग्रेससाठी समस्या असल्याचं सलमान खुर्शीद यांनी म्हटलं आहे. 'आमचे नेते सोडून गेले हीच आमची मोठी समस्या आहे. राहुल गांधी यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर पक्षावरील संकट आणखी वाढलं आहे' असं खुर्शीद यांनी म्हटलं आहे. 

राहुल गांधींच्या या निर्णयामुळे लोकसभा निवडणुकीच्या पराभवानंतरही पक्षाला आत्मपरीक्षण करता आलेले नाही. लोकसभा निवडणुकीत पराभव का झाला याचं विश्लेषण करण्यासाठी आम्हाला अजूनही एकत्र येता आलेलं नाही अशी खंत खुर्शीद यांनी व्यक्त केली आहे. राहुल यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर उणीव जाणवू लागली आहे. त्यांच्या राजीनाम्यामुळे पक्षासमोरील संकट आणखी वाढलेलं दिसत आहे. हे पद सध्या सोनिया गांधी यांनी सांभाळलं आहे अशी माहिती सलमान खुर्शीद यांनी दिली आहे. 

सलमान खुर्शीद यांनी 'राहुल गांधी यांनी आपल्या पदाचा द्यायला नको होता. त्यांनी अजूनही या पदावर राहायला हवं होतं, असं मला वाटतं. राहुल गांधी या पदावर कायम राहावेत आणि नेतृत्व त्यांच्याकडे असावे असे फक्त मलाच नाही तर पक्षाच्या अनेक कार्यकर्त्यांनाही वाटत आहे. सोनिया गांधी यांनी हे पद सांभाळलं असलं तरी ती एक तात्पुरती व्यवस्था आहे' असं म्हटलं आहे. 

पक्ष बळकट करण्यासाठी काँग्रेस रणनीती बनवणार

हिंदी भाषिक राज्यांत पक्ष बळकट करण्यासाठी काँग्रेस रणनीती बनवत आहे. उच्च पदस्थ सूत्रांनुसार उत्तर प्रदेशची प्रभारी असतानाही काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी या रणनीतीच्या केंद्रस्थानी आहेत. प्रियंका गांधी आधी उत्तर प्रदेशमध्ये पक्ष तळागाळात उभा करण्याचा प्रयत्न करतील व त्यानंतर बिहार, छत्तीसगड, राजस्थान, पंजाबसारख्या उत्तर भारतातील राज्यांत काँग्रेसला बळकट केले जाईल. उत्तर प्रदेशमध्ये दशकांपासून सत्तेपासून वंचित राहिलेला काँग्रेस पक्ष आता सत्ता मिळवण्याच्या प्रयत्नांत आहे. त्यासाठी प्रियंका गांधी यांनी राज्याच्या जुन्या काँग्रेस नेत्यांना मार्गदर्शन मंडळात सामावून घेऊन राज्याची सूत्रे तरूण नेत्यांच्या हाती सोपवली आहे. दोन वेळा आमदार असलेले अजय कुमार लल्लू यांना गांधी यांनी राज बब्बर यांच्या जागी अध्यक्ष नियुक्त केले तर 12 सरचिटणीस, 4 उपाध्यक्ष, 18 सल्लागार समिती सदस्य आणि 8 कार्यकारी दल स्थापन केले आहेत.

 

टॅग्स :salman khurshidसलमान खुर्शिदRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेस