शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

साहित्य अकादमीची ‘दलित चेतना’ आता देशभर 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2019 3:44 PM

साहित्य अकादमीने ‘दलित चेतना’ या नावाने केवळ दलित लेखकांसाठी स्थापन केलेले व्यासपीठ सध्या केवळ दिल्लीपुरता मर्यादित असून लवकरच ते संपूर्ण देशात पोहोचणार आहे.

नितीन नायगांवकर

नवी दिल्ली - साहित्य अकादमीने ‘दलित चेतना’ या नावाने केवळ दलित लेखकांसाठी स्थापन केलेले व्यासपीठ सध्या केवळ दिल्लीपुरता मर्यादित असून लवकरच ते संपूर्ण देशात पोहोचणार आहे. अकादमीच्या मुंबई, कोलकाता आणि बंगळुरू येथील प्रादेशिक कार्यालयांना अलीकडेच पत्राद्वारे सूचना देण्यात आल्या आहेत. 

साहित्य अकादमीच्या प्रत्येक कार्यक्रमात साहित्यातील सर्व घटकांना सामावून घेण्याचा प्रयत्न होतोय. दलित साहित्यदेखील यातून सुटलेले नाही. अकादमीने खास या समाजातील लेखकांसाठी संमेलनेही आयोजित केली. यात महाराष्ट्राचे योगदान मोठे राहिलेले आहे. परंतु, तरीही दलित समाजातील लेखक वर्गाला पूर्णपणे सामावून घेण्यात अकादमीला यश आलेले नाही. त्यामुळे खास दलित लेखकांसाठी ‘दलित चेतना’ या उपक्रमाची सुरुवात अकादमीने दोन महिन्यांपूर्वी केली. दर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात दिल्लीमध्ये याअंतर्गत कार्यक्रमाचे आयोजन होत असते. या मालिकेतील दोन कार्यक्रम झाले आहेत. यात विविध राज्यांच्या दलित लेखकांना आमंत्रित करण्यात आले. कथावाचन, कविता, पुस्तकांवरील चर्चा, सामाजिक विषयांवरील चर्चा असे या कार्यक्रमाचे स्वरुप आहे. तिसरा कार्यक्रम या महिन्याच्या अखेरीस दिल्लीत होईल. पण, हा उपक्रम दिल्लीतपुरता मर्यादित ठेवला तर उद्देश साध्य होणार नाही, याचा विचार करून साहित्य अकादमीने तिन्ही प्रादेशिक कार्यालयांना याअंतर्गत कार्यक्रम आयोजित करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

देशातील सर्व २४ भाषांमधील दलित लेखक यात सहभागी करून घेण्यासाठी ‘दलित चेतना’ राजधानीतून बाहेर पडणार आहे. जास्तीत जास्त लोकांपर्यंत या समाजातील नवलेखक-कवींचे साहित्य पोहोचावे, या उद्देशाने हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे, असे अकादमीचे सचिव डॉ. के. श्रीनिवास राव यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. मुंबईतील प्रादेशिक कार्यालयांतर्गत महाराष्ट्र, गुजरात आणि गोवा ही तीन राज्ये येतात. त्यामुळे मुंबईतच कार्यक्रम होईल असे नाही. महाराष्ट्राच्या कुठल्याही गावात, शहरात ‘दलित चेतना’चे आयोजन होऊ शकेल, असेही डॉ. राव म्हणाले. 

खास दलित लेखकांसाठी स्वतंत्र व्यासपीठ असावे, अशी ‘दलित चेतना’ या उपक्रमामागची कल्पना होती. देशभरात त्याचा विस्तार व्हावा, या उद्देशाने प्रादेशिक कार्यालयांना पत्र पाठविण्यात आले आहे.

- डॉ. के. श्रीनिवास राव, सचिव, साहित्य अकादमी

टॅग्स :literatureसाहित्य