शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
3
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
4
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
5
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
6
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
7
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
8
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
9
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
10
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
11
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
12
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
13
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
14
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
16
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
17
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
18
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
19
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
20
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख

पुराने उद्ध्वस्त केलं, लेकीच्या लग्नासाठी जमवलेलं सर्व सामान वाहून गेलं; डोळे पाणावणारी घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2024 11:56 IST

पुरामुळे सहरसा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. पुरामुळे अनेकांची घरं उद्ध्वस्त झाली असून अनेक लोक बेघर झाले आहेत. घरात पुराचं पाणी शिरल्याने लोकांची स्वप्नं वाहून गेली आहेत.

बिहारमधील कोसी नदीला आलेल्या पुरामुळे सहरसा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. पुरामुळे अनेकांची घरं उद्ध्वस्त झाली असून अनेक लोक बेघर झाले आहेत. घरात पुराचं पाणी शिरल्याने लोकांची स्वप्नं वाहून गेली आहेत. परिस्थिती अशी आहे की अनेक लोक अजूनही त्यांच्या घराबाहेर तात्पुरत्या निवाऱ्यात राहत आहेत, तर काही लोक त्यांची उद्ध्वस्त झालेली घरं पुन्हा बांधण्याचा प्रयत्न करत आहेत. 

स्थानिक लोकांना त्यांची घरं पुन्हा बांधता यावीत, यासाठी सरकारकडे मदतीची अपेक्षा केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सहरसा जिल्ह्यातील महर्षी ब्लॉकच्या कुंडा पंचायतीला आलेल्या पुरामुळे संपूर्ण गाव पाण्याखाली गेलं. शेतात उभं असलेलं भातपीक पूर्णपणे उद्ध्वस्त झालं.

गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, गावामध्ये त्यांनी अशी परिस्थिती यापूर्वी कधीही पाहिली नव्हती. अचानक आलेल्या पुरामुळे लोकांना काहीच करण्याची संधीच मिळाली नाही आणि त्यांचं सर्व सामान पाण्यात वाहून गेलं. अनेक कच्च्या घरांची पडझड झाली तर काही घरं पूर्णपणे पाण्यात बुडाली आहेत.

आपली सर्व स्वप्नं पुराच्या पाण्यात वाहून गेल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे. एका व्यक्तीने सांगितलं की, त्याच्या मुलीच्या लग्नासाठी जमवलेल्या सर्व वस्तू पुराच्या पाण्यात वाहून गेल्या आहेत. आता आपलं घर कसं बांधणार आणि पुढचं जीवन नेमकं कसं जगणार याची चिंता लोकांना वाटू लागली आहे.

पुनर्वसन आणि भरपाईसाठी ग्रामस्थ आता सरकारकडे मदतीसाठी पाहत आहेत. लोकांना आशा आहे की, सरकार त्यांना घरं बांधण्यासाठी आणि त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी मदत करेल, जेणेकरून त्यांचे जीवन पुन्हा रुळावर येईल. या पुरामुळे जनजीवन विस्कळीत झालं असून मोठं नुकसान झालं आहे.  

टॅग्स :BiharबिहारfloodपूरRainपाऊसmarriageलग्न