शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
3
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
4
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
5
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
6
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
7
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
8
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
9
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
10
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
11
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
12
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
13
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
14
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
15
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
16
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
17
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
18
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
19
काश्मीरला जाण्यासाठी अनेक महिने पैसे साठवले; आनंद, स्वप्न पूर्ण करायला गेले अन् घात झाला 
20
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...

पुराने उद्ध्वस्त केलं, लेकीच्या लग्नासाठी जमवलेलं सर्व सामान वाहून गेलं; डोळे पाणावणारी घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2024 11:56 IST

पुरामुळे सहरसा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. पुरामुळे अनेकांची घरं उद्ध्वस्त झाली असून अनेक लोक बेघर झाले आहेत. घरात पुराचं पाणी शिरल्याने लोकांची स्वप्नं वाहून गेली आहेत.

बिहारमधील कोसी नदीला आलेल्या पुरामुळे सहरसा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. पुरामुळे अनेकांची घरं उद्ध्वस्त झाली असून अनेक लोक बेघर झाले आहेत. घरात पुराचं पाणी शिरल्याने लोकांची स्वप्नं वाहून गेली आहेत. परिस्थिती अशी आहे की अनेक लोक अजूनही त्यांच्या घराबाहेर तात्पुरत्या निवाऱ्यात राहत आहेत, तर काही लोक त्यांची उद्ध्वस्त झालेली घरं पुन्हा बांधण्याचा प्रयत्न करत आहेत. 

स्थानिक लोकांना त्यांची घरं पुन्हा बांधता यावीत, यासाठी सरकारकडे मदतीची अपेक्षा केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सहरसा जिल्ह्यातील महर्षी ब्लॉकच्या कुंडा पंचायतीला आलेल्या पुरामुळे संपूर्ण गाव पाण्याखाली गेलं. शेतात उभं असलेलं भातपीक पूर्णपणे उद्ध्वस्त झालं.

गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, गावामध्ये त्यांनी अशी परिस्थिती यापूर्वी कधीही पाहिली नव्हती. अचानक आलेल्या पुरामुळे लोकांना काहीच करण्याची संधीच मिळाली नाही आणि त्यांचं सर्व सामान पाण्यात वाहून गेलं. अनेक कच्च्या घरांची पडझड झाली तर काही घरं पूर्णपणे पाण्यात बुडाली आहेत.

आपली सर्व स्वप्नं पुराच्या पाण्यात वाहून गेल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे. एका व्यक्तीने सांगितलं की, त्याच्या मुलीच्या लग्नासाठी जमवलेल्या सर्व वस्तू पुराच्या पाण्यात वाहून गेल्या आहेत. आता आपलं घर कसं बांधणार आणि पुढचं जीवन नेमकं कसं जगणार याची चिंता लोकांना वाटू लागली आहे.

पुनर्वसन आणि भरपाईसाठी ग्रामस्थ आता सरकारकडे मदतीसाठी पाहत आहेत. लोकांना आशा आहे की, सरकार त्यांना घरं बांधण्यासाठी आणि त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी मदत करेल, जेणेकरून त्यांचे जीवन पुन्हा रुळावर येईल. या पुरामुळे जनजीवन विस्कळीत झालं असून मोठं नुकसान झालं आहे.  

टॅग्स :BiharबिहारfloodपूरRainपाऊसmarriageलग्न