शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

दिवसभरात केवळ दोन कप चहा, तरीही पूर्णपणे निरोगी; डॉक्टरही संभ्रमात!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2022 10:27 IST

रामबाग दादावाडीत १८ वर्षांपासून राहत असलेल्या साध्वी विमलयशा यांनी ३९ वर्षांपासून अन्नाचा कण खाल्लेला नाही. त्या दिवसभरात केवळ दोन कप चहा घेतात.

इंदूर : 

रामबाग दादावाडीत १८ वर्षांपासून राहत असलेल्या साध्वी विमलयशा यांनी ३९ वर्षांपासून अन्नाचा कण खाल्लेला नाही. त्या दिवसभरात केवळ दोन कप चहा घेतात. तरीही त्या पूर्णपणे निरोगी आहेत. ६२व्या वर्षीही त्यांना कोणताही आजार नाही. चहामुळे लोक नेहमीच असिडिटीची तक्रार करतात. पण साध्वी विमला यांना कधीच याचाही त्रास झाला नाही.

खरतरगच्छ श्री संघच्या विमलयशा श्रीजी मसा ह्या याला संकल्पाच्या शक्तीचा चमत्कार असल्याचे सांगतात. त्या सकाळी ७.३० वाजता आणि ११.३० ते दुपारी १२ च्या दरम्यान दुसऱ्यांदा चहा घेतात. त्या दुपारी ३ नंतर पाणीसुद्धा घेत नाहीत, त्या सांगतात की, संयम, त्याग हाच जीवनातील सर्वात मोठा संकल्प असल्याचे त्या सांगतात. त्या म्हणतात की, आमचे जीवन त्यागमयी आहे. साधू जीवन आहे. जितका त्याग करू तेवढेच पुढे जाऊ. मनात जेव्हा काही खाण्याची लालसा राहते तेव्हा कठीण होते, मन भटकते, पण भटकत्या मनाला रोखणे हे आपल्याच हातात असते. जोपर्यंत मन मान्य करत नाही तोपर्यंत कोणतेही कार्य होत नाही आणि जेव्हा मन तयार तेव्हा कठीण कामही सहज होऊन जाते. खरतरगच्छ श्री संघचे प्रचार सचिव योगेंद्र सांड यांनी सांगितले की, या अनोख्या तपामुळे त्यांची ख्याती चहावाली म. सा. नावाने आहे. त्यांनी १४ मे १९७५ रोजी अक्षय तृतीयेला दीक्षा घेतली होती.

डॉक्टरही संभ्रमात : दिवसभर कशा राहतात उत्साही

  • साध्यींची वैद्यकीय तपासणी करणारे फिजिशियन डॉ. रुपेश मोदी सांगतात की, त्या ६२व्या वर्षीही पूर्णपणे निरोगी आहेत. त्यांना कोणताही आजार नाही. त्या पूर्ण दिवस केवळ दोन कप चहा घेऊन राहतात तरीही दिवसभर उत्साही असतात, प्रवचन देतात, फिरण्यामुळेही त्यांच्या आरोग्याला काही बाधा होत नाही.
  • डॉ. मोदी म्हणतात की, दोन कप चहानंतर १८ ते १९ तासांचा उपवास होतो. हे इंटर मिटेंट फास्टिंग (अधूनमधून खंडित होणारा उपवास) श्रेणीत एक कप चहात जवळपास १५० कॅलरी असतात. म्हणजेच, दोन कप चहातून शरीराला ३०० कॅलरी मिळतात. चहा हा रोगप्रतिकारक प्रणालीला चालना देतो. कॅन्सर आणि हृदयरोगातही संरक्षण देतो. चयापचय चांगले राहते. चहासोबत अन्य केमिकल, कार्बोहायड्रेटने अॅसिडिटी होते, अन्यथा होत नाही. आध्यात्मिक शक्तीनेही सकारात्मक हार्मोन शरीराला ऊर्जा देतात. साध्वीजीनी जो अंगीकार केला आहे त्यामुळे त्यांना भोजनाची आवश्यकता वाटत नाही..
टॅग्स :Jara hatkeजरा हटके