शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
2
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
3
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
4
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
5
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
6
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
7
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
8
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
9
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
10
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
11
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
12
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
13
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
14
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
15
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
16
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
17
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
18
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?
19
तालिबानचे नवे फर्मान! इस्लामविरोधी असल्याचे सांगत अफगाण शाळांमधून काढून टाकले ५१ विषय
20
सणासुदीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत

दिवसभरात केवळ दोन कप चहा, तरीही पूर्णपणे निरोगी; डॉक्टरही संभ्रमात!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2022 10:27 IST

रामबाग दादावाडीत १८ वर्षांपासून राहत असलेल्या साध्वी विमलयशा यांनी ३९ वर्षांपासून अन्नाचा कण खाल्लेला नाही. त्या दिवसभरात केवळ दोन कप चहा घेतात.

इंदूर : 

रामबाग दादावाडीत १८ वर्षांपासून राहत असलेल्या साध्वी विमलयशा यांनी ३९ वर्षांपासून अन्नाचा कण खाल्लेला नाही. त्या दिवसभरात केवळ दोन कप चहा घेतात. तरीही त्या पूर्णपणे निरोगी आहेत. ६२व्या वर्षीही त्यांना कोणताही आजार नाही. चहामुळे लोक नेहमीच असिडिटीची तक्रार करतात. पण साध्वी विमला यांना कधीच याचाही त्रास झाला नाही.

खरतरगच्छ श्री संघच्या विमलयशा श्रीजी मसा ह्या याला संकल्पाच्या शक्तीचा चमत्कार असल्याचे सांगतात. त्या सकाळी ७.३० वाजता आणि ११.३० ते दुपारी १२ च्या दरम्यान दुसऱ्यांदा चहा घेतात. त्या दुपारी ३ नंतर पाणीसुद्धा घेत नाहीत, त्या सांगतात की, संयम, त्याग हाच जीवनातील सर्वात मोठा संकल्प असल्याचे त्या सांगतात. त्या म्हणतात की, आमचे जीवन त्यागमयी आहे. साधू जीवन आहे. जितका त्याग करू तेवढेच पुढे जाऊ. मनात जेव्हा काही खाण्याची लालसा राहते तेव्हा कठीण होते, मन भटकते, पण भटकत्या मनाला रोखणे हे आपल्याच हातात असते. जोपर्यंत मन मान्य करत नाही तोपर्यंत कोणतेही कार्य होत नाही आणि जेव्हा मन तयार तेव्हा कठीण कामही सहज होऊन जाते. खरतरगच्छ श्री संघचे प्रचार सचिव योगेंद्र सांड यांनी सांगितले की, या अनोख्या तपामुळे त्यांची ख्याती चहावाली म. सा. नावाने आहे. त्यांनी १४ मे १९७५ रोजी अक्षय तृतीयेला दीक्षा घेतली होती.

डॉक्टरही संभ्रमात : दिवसभर कशा राहतात उत्साही

  • साध्यींची वैद्यकीय तपासणी करणारे फिजिशियन डॉ. रुपेश मोदी सांगतात की, त्या ६२व्या वर्षीही पूर्णपणे निरोगी आहेत. त्यांना कोणताही आजार नाही. त्या पूर्ण दिवस केवळ दोन कप चहा घेऊन राहतात तरीही दिवसभर उत्साही असतात, प्रवचन देतात, फिरण्यामुळेही त्यांच्या आरोग्याला काही बाधा होत नाही.
  • डॉ. मोदी म्हणतात की, दोन कप चहानंतर १८ ते १९ तासांचा उपवास होतो. हे इंटर मिटेंट फास्टिंग (अधूनमधून खंडित होणारा उपवास) श्रेणीत एक कप चहात जवळपास १५० कॅलरी असतात. म्हणजेच, दोन कप चहातून शरीराला ३०० कॅलरी मिळतात. चहा हा रोगप्रतिकारक प्रणालीला चालना देतो. कॅन्सर आणि हृदयरोगातही संरक्षण देतो. चयापचय चांगले राहते. चहासोबत अन्य केमिकल, कार्बोहायड्रेटने अॅसिडिटी होते, अन्यथा होत नाही. आध्यात्मिक शक्तीनेही सकारात्मक हार्मोन शरीराला ऊर्जा देतात. साध्वीजीनी जो अंगीकार केला आहे त्यामुळे त्यांना भोजनाची आवश्यकता वाटत नाही..
टॅग्स :Jara hatkeजरा हटके