शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
2
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
3
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
4
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
5
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
6
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
7
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
8
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
9
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
10
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
11
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
12
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
13
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
14
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
15
“अधिवेशानाचे सत्ताधाऱ्यांना गांभीर्य नाही, ‘हम करे सो कायदा’ पद्धतीने…”: हर्षवर्धन सपकाळ
16
“संसदीय लोकशाहीत विविध पक्षांच्या संघटनेचे योगदान देखील महत्त्वाचे”: मंत्री चंद्रकांत पाटील
17
“बाबा आणि आत्याने आईला खूप मारलं'”; ढसाढसा रडत ४ वर्षांच्या लेकाचा धक्कादायक खुलासा
18
अक्षय खन्नाला आहेत दोन भाऊ, एक सख्खा अन् एक सावत्र, दोघांनीही बॉलिवूडमध्ये केलं काम
19
विराट कोहली, रोहित शर्माला कपिल देव यांचा अजब सल्ला, म्हणाले- "मला वाटतं की टीम इंडियात..."
20
कॅमेरा नसलेला 'आयफोन' बाजारात? खरेच असा फोन अस्तित्वात आहे का? ॲप्पलच बनविते...
Daily Top 2Weekly Top 5

दिवसभरात केवळ दोन कप चहा, तरीही पूर्णपणे निरोगी; डॉक्टरही संभ्रमात!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2022 10:27 IST

रामबाग दादावाडीत १८ वर्षांपासून राहत असलेल्या साध्वी विमलयशा यांनी ३९ वर्षांपासून अन्नाचा कण खाल्लेला नाही. त्या दिवसभरात केवळ दोन कप चहा घेतात.

इंदूर : 

रामबाग दादावाडीत १८ वर्षांपासून राहत असलेल्या साध्वी विमलयशा यांनी ३९ वर्षांपासून अन्नाचा कण खाल्लेला नाही. त्या दिवसभरात केवळ दोन कप चहा घेतात. तरीही त्या पूर्णपणे निरोगी आहेत. ६२व्या वर्षीही त्यांना कोणताही आजार नाही. चहामुळे लोक नेहमीच असिडिटीची तक्रार करतात. पण साध्वी विमला यांना कधीच याचाही त्रास झाला नाही.

खरतरगच्छ श्री संघच्या विमलयशा श्रीजी मसा ह्या याला संकल्पाच्या शक्तीचा चमत्कार असल्याचे सांगतात. त्या सकाळी ७.३० वाजता आणि ११.३० ते दुपारी १२ च्या दरम्यान दुसऱ्यांदा चहा घेतात. त्या दुपारी ३ नंतर पाणीसुद्धा घेत नाहीत, त्या सांगतात की, संयम, त्याग हाच जीवनातील सर्वात मोठा संकल्प असल्याचे त्या सांगतात. त्या म्हणतात की, आमचे जीवन त्यागमयी आहे. साधू जीवन आहे. जितका त्याग करू तेवढेच पुढे जाऊ. मनात जेव्हा काही खाण्याची लालसा राहते तेव्हा कठीण होते, मन भटकते, पण भटकत्या मनाला रोखणे हे आपल्याच हातात असते. जोपर्यंत मन मान्य करत नाही तोपर्यंत कोणतेही कार्य होत नाही आणि जेव्हा मन तयार तेव्हा कठीण कामही सहज होऊन जाते. खरतरगच्छ श्री संघचे प्रचार सचिव योगेंद्र सांड यांनी सांगितले की, या अनोख्या तपामुळे त्यांची ख्याती चहावाली म. सा. नावाने आहे. त्यांनी १४ मे १९७५ रोजी अक्षय तृतीयेला दीक्षा घेतली होती.

डॉक्टरही संभ्रमात : दिवसभर कशा राहतात उत्साही

  • साध्यींची वैद्यकीय तपासणी करणारे फिजिशियन डॉ. रुपेश मोदी सांगतात की, त्या ६२व्या वर्षीही पूर्णपणे निरोगी आहेत. त्यांना कोणताही आजार नाही. त्या पूर्ण दिवस केवळ दोन कप चहा घेऊन राहतात तरीही दिवसभर उत्साही असतात, प्रवचन देतात, फिरण्यामुळेही त्यांच्या आरोग्याला काही बाधा होत नाही.
  • डॉ. मोदी म्हणतात की, दोन कप चहानंतर १८ ते १९ तासांचा उपवास होतो. हे इंटर मिटेंट फास्टिंग (अधूनमधून खंडित होणारा उपवास) श्रेणीत एक कप चहात जवळपास १५० कॅलरी असतात. म्हणजेच, दोन कप चहातून शरीराला ३०० कॅलरी मिळतात. चहा हा रोगप्रतिकारक प्रणालीला चालना देतो. कॅन्सर आणि हृदयरोगातही संरक्षण देतो. चयापचय चांगले राहते. चहासोबत अन्य केमिकल, कार्बोहायड्रेटने अॅसिडिटी होते, अन्यथा होत नाही. आध्यात्मिक शक्तीनेही सकारात्मक हार्मोन शरीराला ऊर्जा देतात. साध्वीजीनी जो अंगीकार केला आहे त्यामुळे त्यांना भोजनाची आवश्यकता वाटत नाही..
टॅग्स :Jara hatkeजरा हटके