शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
3
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
4
ऑपरेशन मध्यातच सोडून पाकिस्तानी डॉक्टर झाला गायब! नर्सने दुसऱ्या रूमचा दरवाजा उघडताच दिसला धक्कादायक प्रकार
5
प्रेम कहाणीचा दुर्दैवी अंत! ६ महिन्यापूर्वी प्रियकरासोबत लग्न केलेल्या युवतीने उचललं टोकाचं पाऊल
6
BAN vs SL Head to Head Record : 'टायगर वर्सेस शेर' भिडणार! 'नागिन डान्स'सह कोण कुणावर काढणार खुन्नस?
7
'दोन्ही पायही तुटले असते...', करिश्मा शर्माने धावत्या ट्रेनमधून मारलेली उडी, आता तिने सांगितलं नेमकं काय घडलं?
8
सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश
9
पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया
10
Pitru Paksha 2025: पितरांना नैवेद्य पोहोचला, हे कसे ओळखावे? मत्स्यपुराणात सापडते उत्तर!
11
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
12
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
13
भारताच्या सर्व शेजारी देशांना राजकीय अस्थिरतेने ग्रासले
14
Pitru Paksha 2025: यंदा अविधवा नवमी कधी? काय आहे महत्त्व? कसे करावे श्राद्ध? सविस्तर वाचा!
15
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
16
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
17
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
18
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
19
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
20
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?

Sadabhau Khot: “राजस्थानातील शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत दयनीय, पाणी प्रश्न दूर करणार”: सदाभाऊ खोतांची ग्वाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2022 16:28 IST

Sadabhau Khot: राजस्थानमधील शेतकरी बांधवांनी सदाभाऊ खोत यांचे मोठ्या उत्साहात स्वागत केले.

जयपूर: देशभरातील शेतकरी बांधवांसमोर अनेक प्रश्न उभे आहेत. अलीकडेच वादग्रस्त केंद्रीय कृषी कायदे मागे घेण्यात आले. शेतकरी आंदोलनाचे हे मोठे यश असल्याचे बोलले जात आहे. विरोधकांनीही शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला होता. देशातील शेतकऱ्यांसाठी अनेक उपाययोजना राबवल्या जात असल्याचे केंद्रातील मोदी सरकारकडून सांगितले जात आहे. यातच रयत क्रांती शेतकरी संघटनेचे संस्थापक आणि आमदार सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) हे राजस्थान दौऱ्यावर होते. यावेळी राजस्थानातील शेतकऱ्यांची अवस्था दयनीय असून, पाणी प्रश्न दूर करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे आश्वास सदाभाऊ खोत यांनी दिले. 

राजस्थान येथील किसनपुरा जि.पाली येथे भव्य शेतकरी मेळावा संपन्न झाला. येथील शेतकरी बांधवांनी आमदार सदाभाऊ खोत यांचे मोठ्या उत्साहात स्वागत केले. राजस्थान राज्यातील शेतकरी बांधवांनी अवस्था अत्यंत दयनीय आहे. शेकडो एकर शेती असूनही ती पाणी नसल्यामुळे पिकवू शकत नाहीत. आगामी काळात शेतकरी बांधवांच्या शेतीला पाणी देण्याबाबत भविष्यात प्रयत्न करणार असल्याची ग्वाही सदाभाऊ खोत यांनी जमलेल्या शेतकऱ्यांना दिली.

राजस्थानातील शेतकरी प्रचंड कष्टाळू

राजस्थानधील किसानपुरा येथील शेतकरी मेळाव्याला मोठ्या प्रमाणावर शेतकरी बांधवांनी उपस्थिती लावली होती. यावेळी शेतकरी बांधवांना संबोधित करताना सदाभाऊ खोत म्हणाले की, राजस्थानातील शेतकरी बांधव प्रचंड कष्टाळू आहे. परंतु पाण्याच्या अभावामुळे त्यांना शेती करता येत नाही. येथील शेतकरी बांधवांची एकच मागणी आहे आमच्या शेतीला पाणी द्या. त्या शेतीमधून आम्ही सोने पिकवू. भविष्यात यासाठी निश्चित प्रयत्न करणार असून, त्यासाठी शेतकऱ्यांचे संघटना देखील उभारेन, असे सदाभाऊ खोत यांनी सांगितले.  

टॅग्स :Sadabhau Khotसदाभाउ खोत Rajasthanराजस्थानFarmerशेतकरीagricultureशेती