शहरं
Join us  
Trending Stories
1
परदेशात डॉक्टरी शिकून थेट भारतात प्रॅक्टीस करण्याचा मार्ग सोपा होणार; एनएमसी आणतेय नवे नियम...
2
'हिंजवडी' हातची गेली तर तोटा कोणाचा? पुण्याचा की महाराष्ट्राचा...; १५ वर्षांत किती बदलली...
3
Pune Video: लाज लज्जाच सोडली! पुण्यात जोडप्याचे दुचाकीवरच अश्लील चाळे; व्हिडीओ व्हायरल 
4
ठाकरे ब्रँडला शह देण्यासाठी रणनीती, मुंबईत एकत्र लढेल महायुती! 'प्लॅन बी'चीही तयारी...
5
बारामती हळहळलं ! २४ तासात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू, वडिलांनी देखील घेतला अखेरचा श्वास
6
बांगलादेशच्या मोहम्मद युनूस यांचे सूर बदलले, म्हणाले, 'भारताचे मनापासून आभार...', नेमकं कारण काय?
7
शाहरुख-सलमानच्या घराबाहेर चाहत्यांची गर्दी, पण आमिरच्या का नाही? अभिनेता म्हणाला...
8
आणखी एका चीनसाठी जागा नाही, भारतानं 'पुढचा ड्रॅगन' बनण्याचं स्वप्न सोडावं; रघुराम राजन यांचा इशारा
9
VIDEO: शटल कॉक घेऊन उभा राहिला अन् जोरात कोसळला…; २५ वर्षाच्या तरुणाचा धक्कादायक मृत्यू
10
Shreyasi Joshi : पुण्याच्या लेकीची कमाल; आशियाई रोलर स्केटिंग चॅम्पियनशिपमध्ये गोल्ड मेडल जिंकणारी पहिली भारतीय
11
देशातील सर्वात स्वस्त ईलेक्ट्रीक कार १५००० रुपयांनी महागली; वर्षात तिसऱ्यांदा वाढ...
12
भारतीय सैन्यापेक्षा ISI वर जास्त विश्वास; चिदंबरम यांच्या पहलगामबाबत केलेल्या वक्तव्यावर भाजपचा संताप
13
राज्यात तिसरी ते दहावीचा सुधारित अभ्यासक्रम जाहीर; हिंदी सक्तीला लागला ब्रेक? 'हे' विषय शिकवणार
14
Nag Panchami 2025: नागपंचमीला 'या' घरगुती उपायांनीदेखील दूर होईल कालसर्पदोष!
15
रॉयल एनफील्डच्या 'या' बाईकची गेल्या महिन्यात रेकॉर्ड ब्रेक विक्री; खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड!
16
गरोदरपणात सुचली कल्पना! फक्त ६० हजारांच्या गुंतवणुकीतून 'या' जोडप्याने कमावले ५ कोटी!
17
Uorfi Javed : बारीक दिसण्यासाठी जेवणं सोडलं, उपाशी राहिली अन्...; उर्फी जावेदने 'या' आजाराचा केला सामना
18
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा तामिळनाडू दौरा; महान चोल साम्राज्याचा उल्लेख करत म्हणाले...
19
Nag Panchami 2025: नागपंचमीला तळणे, चिरणे, कापणे निषिद्ध; वाचा शास्त्रीय आणि धार्मिक कारण!
20
मुलांच्या शिक्षणाचं टेन्शन? पोस्ट ऑफिसची 'ही' योजना देणार हमखास परतावा आणि टॅक्समध्ये सूट!

Sadabhau Khot: “राजस्थानातील शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत दयनीय, पाणी प्रश्न दूर करणार”: सदाभाऊ खोतांची ग्वाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2022 16:28 IST

Sadabhau Khot: राजस्थानमधील शेतकरी बांधवांनी सदाभाऊ खोत यांचे मोठ्या उत्साहात स्वागत केले.

जयपूर: देशभरातील शेतकरी बांधवांसमोर अनेक प्रश्न उभे आहेत. अलीकडेच वादग्रस्त केंद्रीय कृषी कायदे मागे घेण्यात आले. शेतकरी आंदोलनाचे हे मोठे यश असल्याचे बोलले जात आहे. विरोधकांनीही शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला होता. देशातील शेतकऱ्यांसाठी अनेक उपाययोजना राबवल्या जात असल्याचे केंद्रातील मोदी सरकारकडून सांगितले जात आहे. यातच रयत क्रांती शेतकरी संघटनेचे संस्थापक आणि आमदार सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) हे राजस्थान दौऱ्यावर होते. यावेळी राजस्थानातील शेतकऱ्यांची अवस्था दयनीय असून, पाणी प्रश्न दूर करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे आश्वास सदाभाऊ खोत यांनी दिले. 

राजस्थान येथील किसनपुरा जि.पाली येथे भव्य शेतकरी मेळावा संपन्न झाला. येथील शेतकरी बांधवांनी आमदार सदाभाऊ खोत यांचे मोठ्या उत्साहात स्वागत केले. राजस्थान राज्यातील शेतकरी बांधवांनी अवस्था अत्यंत दयनीय आहे. शेकडो एकर शेती असूनही ती पाणी नसल्यामुळे पिकवू शकत नाहीत. आगामी काळात शेतकरी बांधवांच्या शेतीला पाणी देण्याबाबत भविष्यात प्रयत्न करणार असल्याची ग्वाही सदाभाऊ खोत यांनी जमलेल्या शेतकऱ्यांना दिली.

राजस्थानातील शेतकरी प्रचंड कष्टाळू

राजस्थानधील किसानपुरा येथील शेतकरी मेळाव्याला मोठ्या प्रमाणावर शेतकरी बांधवांनी उपस्थिती लावली होती. यावेळी शेतकरी बांधवांना संबोधित करताना सदाभाऊ खोत म्हणाले की, राजस्थानातील शेतकरी बांधव प्रचंड कष्टाळू आहे. परंतु पाण्याच्या अभावामुळे त्यांना शेती करता येत नाही. येथील शेतकरी बांधवांची एकच मागणी आहे आमच्या शेतीला पाणी द्या. त्या शेतीमधून आम्ही सोने पिकवू. भविष्यात यासाठी निश्चित प्रयत्न करणार असून, त्यासाठी शेतकऱ्यांचे संघटना देखील उभारेन, असे सदाभाऊ खोत यांनी सांगितले.  

टॅग्स :Sadabhau Khotसदाभाउ खोत Rajasthanराजस्थानFarmerशेतकरीagricultureशेती