शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
2
"आम्ही गांधींचा भारत स्वीकारला होता, मोदींचा भारत नाही", फारुख अब्दुल्लांचा भाजपावर हल्लाबोल
3
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
4
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
5
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
6
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
7
मनात धाकधूक की राजकीय खेळी? सुप्रियाताई अचानक अजितदादांच्या घरी का गेल्या?; बारामतीत तर्कवितर्क
8
अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का; सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, कोठडी २० मेपर्यंत वाढवली
9
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
10
किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण
11
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले
12
'हीरामंडी'मधील शेखर सुमनसोबतच्या इंटीमेट सीनवर मनीषा कोईरालानं सोडलं मौन, म्हणाली...
13
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
14
दृष्टीहीन तरुणीने पंतप्रधानांचा हात पकडला; SPG कमांडो आला तेवढ्यात...पाहा मोदींनी काय केले
15
Baramati Lok Sabha : 'मटण, दारु, मताला हजार रुपये वाटले...' सुनिल शेळकेंचे आमदार रोहित पवारांवर गंभीर आरोप
16
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट
17
उत्तर प्रदेशमध्ये इंडिया आघाडीसाठी राहुल गांधींनी घेतला मोठा निर्णय; भाजपाच्या अडचणी वाढणार?
18
MS Dhoni च्या फलंदाजी क्रमावरून टीका करणाऱ्यांनो, जरा कारण जाणून घ्या! औषधं खाऊन खेळतोय तो
19
भाजपात सामील झाल्यानंतर शेखर सुमन म्हणाले, "मी सामान्य माणूस, हिरामंडीचा नवाब नाही..."
20
"मी नाही तर कोण?" अमिताभ बच्चन यांच्याशी तुलना केल्यानंतर ट्रोल झालेली कंगना पुन्हा बरळली

मरकजमध्ये कार्यक्रम न घेण्याचा साद यांनी सल्ला धुडकावला होता

By ऑनलाइन लोकमत | Published: April 08, 2020 5:05 AM

बुद्धिवंतांनी केली होती विनंती : अनुयायांना संकटात लोटल्याचे मत

नवी दिल्ली : तबलिगी जमातचे प्रमुख मौलाना मुहम्मद साद कंधलावी यांना त्यांचे स्वत:चे सहकारी, अनेक ज्येष्ठ मुस्लिम धर्मगुरू व बुद्धिवंतांनी कोविड-१९चा उद्रेक झाल्यानंतर लगेच गेल्या मार्च महिन्यातील निजामुद्दीन कार्यक्रम रद्द करा असा सल्ला देऊन विनंती केली होती; परंतु साद यांनी ती ऐकली नाही, असे समजते.माझ्यावर डोळे झाकून विश्वास ठेवा, असे आपल्या अनुयायांना शिकवण दिलेल्या साद कंधलावी यांच्या दुराग्रहामुळे त्यांच्या शेकडो अनुयायांचे जीवित संकटात लोटले गेले आहे. एवढेच नाही तर मुस्लिमांची प्रतिमाही कलंकित झाली आहे, असे मुस्लिमांतील अनेकांचे म्हणणे आहे. निजामुद्दीनमधील कार्यक्रमाला उपस्थित राहिलेल्यांपैकी अनेक जणांची कोविड-१९ ची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे व त्यांना क्वारंटाईन व्हावे लागले आहे. त्याचवेळी साद कंधलावी हे आपल्या मूठभर सल्लागारांना घेऊन लपून बसले आहेत. देशात कोरोनाचे जेवढे रुग्ण आहेत त्यातील ३० टक्के हे जमातशी संबंधित आहेत. हीच टक्केवारी उत्तर प्रदेशमध्ये जवळपास ५० टक्क्यांपर्यंत जाते. तबलिगी जमातचा दुसरा गट ‘शुरा-ए- जमात’ने कोरोना विषाणूचा उद्रेक होताच आपले सगळे कार्यक्रम रद्द केले. अविचल राहिलेले मौलाना साद यांनी पूर्वीच ठरलेल्या वेळापत्रकाप्रमाणे कार्यक्रम घेण्याचा आग्रह केला ‘मशिदीतील मृत्यू उत्तम’ याबाबत प्रवचनही दिले.नाव न सांगण्याच्या अटीवर मौलाना सादचे एक निकटस्थ म्हणाले की, त्यांना अनेकदा कार्यक्रम रद्द करण्याबाबत सांगण्यात आले होते, मात्र, त्यांनी दुर्लक्ष केले. त्यांनी स्वत:च्याच अनुयायांना मृत्यूच्या खाईत ढकलले. काँग्रेसचे नेते मीम अफजल आणि मुस्लिम नेते जफर सरेशवाला यांनीही मौलाना साद यांना कार्यक्रम रद्द करण्याचा सल्ला दिला, मात्र, ते जुमानले नाहीत, असा खुलासा केला आहे. दुसरीकडे मौलाना साद यांचे सहकारी मौलाना हयारिस यांनी त्यांची बाजू घेतली. ते म्हणाले,जेव्हा जमातचे सदस्य विदेशातून येत होते, तेव्हा सरकारने त्यांना परवानगी दिली, त्यात आमची काय चूक आहे?कोरोनाच्या महामारीबद्दल ते अज्ञानी कसेतबलिगी जमातचे ज्येष्ठ मोहम्मद आलम म्हणाले की, ‘‘साद यांना प्रत्येक गोष्टीची जाणीव होती. परंतु, त्यांच्या दुराग्रही वृत्तीमुळे निष्पाप तबलिगी महामारीच्या जबड्यात लोटले गेले’’.च्जी व्यक्ती जगातील मुस्लिमांचे आपण आमीर असल्याचा दावा करते आणि मक्का आणि मदिनानंतर तबलिगी मरकज हे सर्वात पवित्र स्थळ असल्याचे सांगते ती कोरोना विषाणूच्या महामारीबद्दल एवढी कशी अज्ञानी राहू शकते, असा प्रश्न त्यांनी विचारला.च्आणखी एक वृद्ध तबलिगी सदस्य लियाकतअलीखान म्हणाले की, ‘‘जबाबदार मुस्लिम बुद्धीवंतांनी दिलेला सल्ला मौलाना साद यांनी का निरुपयोगी ठरवला? आणि आता ते का लपून बसले आहेत व विषाणूची बाधा झाली की नाही याची तपासणी का करून घेत नाहीत?’’

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या