शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
2
राजकीय हस्तक्षेपामुळे राज्याचे उद्योगविश्व त्रस्त; विकासकामांना करतात विरोध, दादागिरीही वाढली
3
मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाही! निर्णय फक्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंबाबतच
4
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा
6
सूतगिरण्यांच्या अर्थसाहाय्याबाबत आता समान निकष; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
7
अनिल अंबानी यांच्यावर सलग तिसऱ्या दिवशी ईडीचे छापे; विविध कार्यालयांतून कागदपत्रे जप्त
8
विजयदिनी शहीद जवानांच्या शौर्याला सलामी; कारगिलमध्ये २६ जुलै १९९९ रोजी फडकावला तिरंगा
9
दहशतवादी प्रकरणांतील फरारी गुन्हेगारांना परत आणण्यासाठी उपाययोजना करा: अमित शाह
10
‘निसार’ मोहीम पृथ्वी निरीक्षण क्षेत्रात आणणार क्रांती: इस्रो; उपग्रहाची वैशिष्ट्ये काय?
11
शाळेतील सुरक्षा उपायांचे ऑडिट आता अनिवार्य; केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना दिले आदेश
12
वादग्रस्त न्यायाधीश यशवंत वर्मांप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी
13
‘जन्माधारित नागरिकत्व’चा ट्रम्प यांचा निर्णय कोर्टाकडून स्थगित; अमेरिकेतील भारतीयांना दिलासा
14
थायलंड-कंबोडिया संघर्षात ३३ ठार, हजारो विस्थापित; पुरातन मंदिरावरून पेटला संघर्ष
15
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
16
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
17
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
18
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७३ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
19
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
20
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या

'भारतसाठी कॅनडा सर्वात मोठी समस्या', एस जयशंकर यांचा जस्टिन ट्रुडोंना स्पष्ट इशारा, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2024 16:59 IST

S Jaishankar: खालिस्तान दहशतवादी हरदीपसिंग निज्जरच्या हत्येत भारताचा सहभाग असल्याचा आरोप कॅनडाच्या पंतप्रधानांनी केला आहे.

S Jaishankar slams Canada: खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंग निज्जरची कॅनडात हत्या झाली. तेव्हापासून भारत आणि कॅनडामधील संबंध बिघडले आहेत. अशातच कॅनडा पोलिसांनी याप्रकरणी 3 जणांना अटक केली असून, हे तिघेही भारतीय असल्याचे कॅनडा पोलिसांचे म्हणणे आहे. यामुळे आता परत एकदा भारत आणि कॅनडामध्ये वाकयुद्ध सुरू झाले आहे. आता भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर (S Jaishankar) यांनी प्रकरणावरुन कॅनडा सरकार आणि पंतप्रधान जस्टीन ट्रुडो (Justin Trudeau) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.

फक्त आरोप नको, पुरावे दाखवाओडिशातील एका कार्यक्रमात बोलताना परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी म्हटले की, कॅनडा त्यांच्या देशात होत असलेल्या गुन्ह्यांसाठी भारताला जबाबदार धरतो. पण, ते कधीही पुरावे देत नाही. मी ऐकले की, कॅनडा पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे. आता कॅनडाने त्या तिघांबद्दल आम्हाला अधिक माहिती द्यावी, आम्ही त्याचीच वाट पाहत आहोत. फक्त आरोप करण्यापेक्षा कॅनडा सरकारने पुरावे सादर करावे. त्यांनी आतापर्यंत असा कुठलाही पुरावा दिला नाही, ज्यामुळे या प्रकरणात भारताचा सहभाग सिद्ध होईल. आम्ही कॅनडा सरकारला वारंवार पुरावे दाखवण्याची मागणी केली आहे. 

कॅनडाच्या सरकारवर गंभीर आरोपपंजाबमधील संघटित गुन्ह्यांशी संबंधित गुन्हेगारांना व्हिसा दिल्याबद्दल एस जयशंकर यांनी कॅनडाच्या सरकारवर टीका केली. ते म्हणाले की, पंजाबमधील संघटित गुन्हेगारीशी संबंधित अनेकांना कॅनडात राहण्याची परवानगी दिली जाते. आम्ही कॅनडाला वारंवार सांगतो की, भारतातील वॉन्टेड गुन्हेगारांना व्हिसा देऊ नका. अनेक लोक खोट्या कागदपत्रांवर कॅनडाला जातात आणि तेथील सरकार  त्यांना राहण्याची परवानगी देते. भारताने 25 खलिस्तानी समर्थकांची माहिती कॅनडाला दिली आणि त्यांच्या प्रत्यार्पणाची विनंती केली, परंतु कॅनडाने अद्याप कोणतेही उत्तर दिलेले नाही, असा आरोपही त्यांनी यावेळी कॅनडावर केला. 

कॅनडा भारतासाठी मोठी समस्यापरराष्ट्रमंत्र्यांनी कॅनडा ही भारताची सर्वात मोठी समस्या असल्याचे म्हटले. ते म्हणाले, आज कॅनडामध्ये जे सरकार आहे, त्यांनी स्वातंत्र्याच्या नावाखाली अतिरेकी, फुटीरतावाद आणि हिंसाचाराचा पुरस्कार करणाऱ्यांना आसरा दिला आहे. अशा लोकांनी स्वतःला राजकीयदृष्ट्या संघटित केले आहे आणि एक राजकीय लॉबी बनवली आहे. यापैकी अनेकांनी तिथल्या राजकारण्यांचा विश्वास मिळवला आहे. अमेरिकेत अशाप्रकारची समस्या नाही, सध्या भारताची सर्वात मोठी समस्या कॅनडा आहे, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.

टॅग्स :S. Jaishankarएस. जयशंकरCanadaकॅनडाJustin Trudeauजस्टीन ट्रुडोIndiaभारतInternationalआंतरराष्ट्रीय