शहरं
Join us  
Trending Stories
1
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
2
आजचे राशीभविष्य, २७ ऑक्टोबर २०२५: धनलाभ योग, ठरवलेली कामे होतील; यशाचा-प्रसन्न दिवस
3
Video - अग्निकल्लोळ! रेस्टॉरंटमध्ये भीषण आग; एकामागून एक ४ सिलिंडरचा स्फोट, महिलेचा मृत्यू
4
राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचा फेरा, हातातोंडाशी आलेल्या पिकांवर मारा; जोर वाढण्याची शक्यता, चार-पाच दिवस सावट
5
रशियावरच्या निर्बंधाने भारतीय तेल कंपन्या अडचणीत; फटका बसू नये म्हणून ONGC जाणार न्यायालयात
6
पश्चिम उपनगरातील वाहतूककोंडी सुटण्यास आणखी ३ वर्षे; गोरगाव ते ओशिवरा केबल-स्टेड पूल उभारणार
7
गृहनिर्माण सोसायट्यांना पुनर्विकासास पूर्ण मुभा; कोर्टाच्या निर्णयामुळे संभ्रम दूर, जुने परिपत्रक मागे घेण्याचे आदेश
8
११३९ कोटी कधी मिळणार? १६ लाख शेतकरी अजून बँकांच्या केवायसीत अडकलेले
9
पाऊस पुन्हा मुक्कामी, मुसळधारेमुळे महामुंबईत धावपळ; ३० ऑक्टोबरपर्यंत मुंबईसह कोकणात मुसळधार
10
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
11
देशभरातील आठ हजार शाळा ‘रिकाम्या’; २० हजार शिक्षक घेताहेत फुकटचा पगार
12
एमबीबीएस प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा उडाला गोंधळ; निकालापूर्वीच बीएएमएस, बीएचएमएस प्रवेश फेरी सुरू
13
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
14
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
15
सलग दुसऱ्या दिवशीही प्रसूतिगृहाचा काेंडवाडा; सहा महिला वेटिंगवर, दाटीवाटीने लावले बेड
16
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
17
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
18
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
19
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
20
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार

'भारतसाठी कॅनडा सर्वात मोठी समस्या', एस जयशंकर यांचा जस्टिन ट्रुडोंना स्पष्ट इशारा, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2024 16:59 IST

S Jaishankar: खालिस्तान दहशतवादी हरदीपसिंग निज्जरच्या हत्येत भारताचा सहभाग असल्याचा आरोप कॅनडाच्या पंतप्रधानांनी केला आहे.

S Jaishankar slams Canada: खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंग निज्जरची कॅनडात हत्या झाली. तेव्हापासून भारत आणि कॅनडामधील संबंध बिघडले आहेत. अशातच कॅनडा पोलिसांनी याप्रकरणी 3 जणांना अटक केली असून, हे तिघेही भारतीय असल्याचे कॅनडा पोलिसांचे म्हणणे आहे. यामुळे आता परत एकदा भारत आणि कॅनडामध्ये वाकयुद्ध सुरू झाले आहे. आता भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर (S Jaishankar) यांनी प्रकरणावरुन कॅनडा सरकार आणि पंतप्रधान जस्टीन ट्रुडो (Justin Trudeau) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.

फक्त आरोप नको, पुरावे दाखवाओडिशातील एका कार्यक्रमात बोलताना परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी म्हटले की, कॅनडा त्यांच्या देशात होत असलेल्या गुन्ह्यांसाठी भारताला जबाबदार धरतो. पण, ते कधीही पुरावे देत नाही. मी ऐकले की, कॅनडा पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे. आता कॅनडाने त्या तिघांबद्दल आम्हाला अधिक माहिती द्यावी, आम्ही त्याचीच वाट पाहत आहोत. फक्त आरोप करण्यापेक्षा कॅनडा सरकारने पुरावे सादर करावे. त्यांनी आतापर्यंत असा कुठलाही पुरावा दिला नाही, ज्यामुळे या प्रकरणात भारताचा सहभाग सिद्ध होईल. आम्ही कॅनडा सरकारला वारंवार पुरावे दाखवण्याची मागणी केली आहे. 

कॅनडाच्या सरकारवर गंभीर आरोपपंजाबमधील संघटित गुन्ह्यांशी संबंधित गुन्हेगारांना व्हिसा दिल्याबद्दल एस जयशंकर यांनी कॅनडाच्या सरकारवर टीका केली. ते म्हणाले की, पंजाबमधील संघटित गुन्हेगारीशी संबंधित अनेकांना कॅनडात राहण्याची परवानगी दिली जाते. आम्ही कॅनडाला वारंवार सांगतो की, भारतातील वॉन्टेड गुन्हेगारांना व्हिसा देऊ नका. अनेक लोक खोट्या कागदपत्रांवर कॅनडाला जातात आणि तेथील सरकार  त्यांना राहण्याची परवानगी देते. भारताने 25 खलिस्तानी समर्थकांची माहिती कॅनडाला दिली आणि त्यांच्या प्रत्यार्पणाची विनंती केली, परंतु कॅनडाने अद्याप कोणतेही उत्तर दिलेले नाही, असा आरोपही त्यांनी यावेळी कॅनडावर केला. 

कॅनडा भारतासाठी मोठी समस्यापरराष्ट्रमंत्र्यांनी कॅनडा ही भारताची सर्वात मोठी समस्या असल्याचे म्हटले. ते म्हणाले, आज कॅनडामध्ये जे सरकार आहे, त्यांनी स्वातंत्र्याच्या नावाखाली अतिरेकी, फुटीरतावाद आणि हिंसाचाराचा पुरस्कार करणाऱ्यांना आसरा दिला आहे. अशा लोकांनी स्वतःला राजकीयदृष्ट्या संघटित केले आहे आणि एक राजकीय लॉबी बनवली आहे. यापैकी अनेकांनी तिथल्या राजकारण्यांचा विश्वास मिळवला आहे. अमेरिकेत अशाप्रकारची समस्या नाही, सध्या भारताची सर्वात मोठी समस्या कॅनडा आहे, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.

टॅग्स :S. Jaishankarएस. जयशंकरCanadaकॅनडाJustin Trudeauजस्टीन ट्रुडोIndiaभारतInternationalआंतरराष्ट्रीय