शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

"त्यांना परदेशात जाऊन भारतावर टीका करण्याची सवय", जयशंकर यांची राहुल गांधींवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2023 18:04 IST

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अमेरिका दौऱ्यात केलेल्या वक्तव्यावरून भाजप आणि काँग्रेसमध्ये शाब्दिक युद्ध सुरू झाले आहे.

Congress Vs BJP:काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अमेरिका दौऱ्यात केलेल्या वक्तव्यावरून भाजप आणि काँग्रेसमध्ये शाब्दिक युद्ध सुरू झाले आहे. भारतात लोकशाहीसाठी लढा सुरू ठेवण्याबाबत राहुल गांधी यांनी अमेरिकेत वक्तव्य केले होते. 'भारत हा मोठा देश आहे आणि देशातील लोकशाही नष्ट झाली तर त्याचा परिणाम संपूर्ण जगावर होईल', असे ते म्हणाले होते. त्यावर आता परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी निशाणा साधलाय.

परराष्ट्रमंत्र्यांचा राहुल गांधींवर हल्लाबोलराहुल गांधींच्या वक्तव्यावर भाजप नेत्यांकडून टीका होत आहे. मोदी सरकारला 9 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी गुरुवारी (8 जून) म्हटले की, "त्यांना (राहुल गांधी) पररदेशात जाऊन देशावर आणि आपल्या राजकारणावर टीका करण्याची सवय झाली आहे. या देशात निवडणुका होतात आणि कधी एक पक्ष जिंकतो, तर कधी दुसरा पक्ष, याकडे जग पाहत आहे. देशात लोकशाही नसेल तर असा बदल होऊच शकत नाही,'' असं ते म्हणाले 

स्मृती इराणी यांची टीकाकेंद्रीय मंत्री इराणी यांनी गुरुवारी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला. प्रसारमाध्यमांच्या प्रश्नांना उत्तर देताना त्या म्हणाल्या की, ''काँग्रेस नेतृत्व देशाच्या लोकशाहीला दुखावण्यासाठी बाह्य शक्तींचा कसा वापर करत आहे, हे भाजप पूर्वीपासूनच सांगत आहे. जशा निवडणुका जवळ येत आहेत, तसे काँग्रेस नेत्यांच्या अशा घटनांमध्ये वाढ झाली आहे. सत्तेची भूक असलेल्या काँग्रेसला देशाच्या लोकशाही व्यवस्थेला धक्का द्यायचा आहे,'' अशी टीका त्यांनी केली.

अधीर रंजन चौधरींचा पलटवार

काँग्रेस खासदार अधीर रंजन चौधरी यांनी परराष्ट्रमंत्री जयशंकर यांच्या वक्तव्यावर जोरदार प्रहार केला. एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना चौधरी म्हणाले की, ''जयशंकरजी निवडणूक आयोगाशी बोलत असावेत, अन्यथा कोण जिंकेल, हे त्यांना कसे कळाले. या लोकांचा अशा लोकशाहीवर विश्वास आहे, ज्यात लोक मतदान करण्यापूर्वीच ते (भाजप) निवडणुकीचे निकाल सांगू लागतात. जयशंकर यांच्या मते ही लोकशाही आहे,'' अशी टीका त्यांनी केली. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीS. Jaishankarएस. जयशंकरBJPभाजपाcongressकाँग्रेस