शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
6
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
7
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
8
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
9
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
10
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
11
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
12
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
13
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
14
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
15
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
16
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
17
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
18
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
19
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
20
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज

"त्यांना परदेशात जाऊन भारतावर टीका करण्याची सवय", जयशंकर यांची राहुल गांधींवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2023 18:04 IST

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अमेरिका दौऱ्यात केलेल्या वक्तव्यावरून भाजप आणि काँग्रेसमध्ये शाब्दिक युद्ध सुरू झाले आहे.

Congress Vs BJP:काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अमेरिका दौऱ्यात केलेल्या वक्तव्यावरून भाजप आणि काँग्रेसमध्ये शाब्दिक युद्ध सुरू झाले आहे. भारतात लोकशाहीसाठी लढा सुरू ठेवण्याबाबत राहुल गांधी यांनी अमेरिकेत वक्तव्य केले होते. 'भारत हा मोठा देश आहे आणि देशातील लोकशाही नष्ट झाली तर त्याचा परिणाम संपूर्ण जगावर होईल', असे ते म्हणाले होते. त्यावर आता परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी निशाणा साधलाय.

परराष्ट्रमंत्र्यांचा राहुल गांधींवर हल्लाबोलराहुल गांधींच्या वक्तव्यावर भाजप नेत्यांकडून टीका होत आहे. मोदी सरकारला 9 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी गुरुवारी (8 जून) म्हटले की, "त्यांना (राहुल गांधी) पररदेशात जाऊन देशावर आणि आपल्या राजकारणावर टीका करण्याची सवय झाली आहे. या देशात निवडणुका होतात आणि कधी एक पक्ष जिंकतो, तर कधी दुसरा पक्ष, याकडे जग पाहत आहे. देशात लोकशाही नसेल तर असा बदल होऊच शकत नाही,'' असं ते म्हणाले 

स्मृती इराणी यांची टीकाकेंद्रीय मंत्री इराणी यांनी गुरुवारी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला. प्रसारमाध्यमांच्या प्रश्नांना उत्तर देताना त्या म्हणाल्या की, ''काँग्रेस नेतृत्व देशाच्या लोकशाहीला दुखावण्यासाठी बाह्य शक्तींचा कसा वापर करत आहे, हे भाजप पूर्वीपासूनच सांगत आहे. जशा निवडणुका जवळ येत आहेत, तसे काँग्रेस नेत्यांच्या अशा घटनांमध्ये वाढ झाली आहे. सत्तेची भूक असलेल्या काँग्रेसला देशाच्या लोकशाही व्यवस्थेला धक्का द्यायचा आहे,'' अशी टीका त्यांनी केली.

अधीर रंजन चौधरींचा पलटवार

काँग्रेस खासदार अधीर रंजन चौधरी यांनी परराष्ट्रमंत्री जयशंकर यांच्या वक्तव्यावर जोरदार प्रहार केला. एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना चौधरी म्हणाले की, ''जयशंकरजी निवडणूक आयोगाशी बोलत असावेत, अन्यथा कोण जिंकेल, हे त्यांना कसे कळाले. या लोकांचा अशा लोकशाहीवर विश्वास आहे, ज्यात लोक मतदान करण्यापूर्वीच ते (भाजप) निवडणुकीचे निकाल सांगू लागतात. जयशंकर यांच्या मते ही लोकशाही आहे,'' अशी टीका त्यांनी केली. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीS. Jaishankarएस. जयशंकरBJPभाजपाcongressकाँग्रेस