शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
2
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
3
माणिकराव कोकाटेंना साडेसातीची झळ, शनिदेव तारणार की राजकरणातून ‘मुक्ती’ देणार? लवकरच कळेल!
4
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
5
७ तासांपेक्षा कमी किंवा ९ तासांपेक्षा जास्त झोपता? लवकर मृत्यूचा धोका, रिसर्चमध्ये मोठा खुलासा
6
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
7
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."
8
"मी एका मोठ्या सिनेमात फेल झालो", फहाद फाजिलने पुन्हा 'पुष्पा'वर केलं भाष्य; पुढे म्हणाला...
9
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
10
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
11
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
12
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
13
राजकीय हस्तक्षेपामुळे राज्याचे उद्योगविश्व त्रस्त; विकासकामांना करतात विरोध, दादागिरीही वाढली
14
मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाही! निर्णय फक्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंबाबतच
15
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा
17
सूतगिरण्यांच्या अर्थसाहाय्याबाबत आता समान निकष; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
18
अनिल अंबानी यांच्यावर सलग तिसऱ्या दिवशी ईडीचे छापे; विविध कार्यालयांतून कागदपत्रे जप्त
19
विजयदिनी शहीद जवानांच्या शौर्याला सलामी; कारगिलमध्ये २६ जुलै १९९९ रोजी फडकावला तिरंगा
20
‘निसार’ मोहीम पृथ्वी निरीक्षण क्षेत्रात आणणार क्रांती: इस्रो; उपग्रहाची वैशिष्ट्ये काय?

"त्यांना परदेशात जाऊन भारतावर टीका करण्याची सवय", जयशंकर यांची राहुल गांधींवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2023 18:04 IST

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अमेरिका दौऱ्यात केलेल्या वक्तव्यावरून भाजप आणि काँग्रेसमध्ये शाब्दिक युद्ध सुरू झाले आहे.

Congress Vs BJP:काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अमेरिका दौऱ्यात केलेल्या वक्तव्यावरून भाजप आणि काँग्रेसमध्ये शाब्दिक युद्ध सुरू झाले आहे. भारतात लोकशाहीसाठी लढा सुरू ठेवण्याबाबत राहुल गांधी यांनी अमेरिकेत वक्तव्य केले होते. 'भारत हा मोठा देश आहे आणि देशातील लोकशाही नष्ट झाली तर त्याचा परिणाम संपूर्ण जगावर होईल', असे ते म्हणाले होते. त्यावर आता परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी निशाणा साधलाय.

परराष्ट्रमंत्र्यांचा राहुल गांधींवर हल्लाबोलराहुल गांधींच्या वक्तव्यावर भाजप नेत्यांकडून टीका होत आहे. मोदी सरकारला 9 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी गुरुवारी (8 जून) म्हटले की, "त्यांना (राहुल गांधी) पररदेशात जाऊन देशावर आणि आपल्या राजकारणावर टीका करण्याची सवय झाली आहे. या देशात निवडणुका होतात आणि कधी एक पक्ष जिंकतो, तर कधी दुसरा पक्ष, याकडे जग पाहत आहे. देशात लोकशाही नसेल तर असा बदल होऊच शकत नाही,'' असं ते म्हणाले 

स्मृती इराणी यांची टीकाकेंद्रीय मंत्री इराणी यांनी गुरुवारी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला. प्रसारमाध्यमांच्या प्रश्नांना उत्तर देताना त्या म्हणाल्या की, ''काँग्रेस नेतृत्व देशाच्या लोकशाहीला दुखावण्यासाठी बाह्य शक्तींचा कसा वापर करत आहे, हे भाजप पूर्वीपासूनच सांगत आहे. जशा निवडणुका जवळ येत आहेत, तसे काँग्रेस नेत्यांच्या अशा घटनांमध्ये वाढ झाली आहे. सत्तेची भूक असलेल्या काँग्रेसला देशाच्या लोकशाही व्यवस्थेला धक्का द्यायचा आहे,'' अशी टीका त्यांनी केली.

अधीर रंजन चौधरींचा पलटवार

काँग्रेस खासदार अधीर रंजन चौधरी यांनी परराष्ट्रमंत्री जयशंकर यांच्या वक्तव्यावर जोरदार प्रहार केला. एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना चौधरी म्हणाले की, ''जयशंकरजी निवडणूक आयोगाशी बोलत असावेत, अन्यथा कोण जिंकेल, हे त्यांना कसे कळाले. या लोकांचा अशा लोकशाहीवर विश्वास आहे, ज्यात लोक मतदान करण्यापूर्वीच ते (भाजप) निवडणुकीचे निकाल सांगू लागतात. जयशंकर यांच्या मते ही लोकशाही आहे,'' अशी टीका त्यांनी केली. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीS. Jaishankarएस. जयशंकरBJPभाजपाcongressकाँग्रेस