शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
4
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
5
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
6
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
7
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
8
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
9
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
10
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
11
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
13
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
14
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
15
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
16
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
17
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
18
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
19
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
20
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स

'1984 मध्ये खूप काही झालं, त्यावर डॉक्युमेंट्री का बनवली नाही?', परराष्ट्रमंत्री जयशंकर यांचे मोठे विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2023 19:56 IST

परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गुजरात दंगलीवरील बीबीसी डॉक्युमेंट्रीवर स्पष्टपणे भाष्य केले.

MEA S Jaishankar: परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गुजरात दंगलीवरील बीबीसी डॉक्युमेंट्रीच्या वादावर मोठे वक्तव्य केले आहे. पंतप्रधान मोदी आणि भारताबाबत पाश्चिमात्य प्रसारमाध्यमांकडून काही दिवसांपासून काही ना काही चर्चा सुरू आहे. यावर जयशंकर म्हणाले की, टायमिंग अॅक्सीडेंटल आहे, असे तुम्हाला वाटते का? भारतात निवडणुकीचा हंगाम सुरू झाला आहे की नाही माहीत नाही, पण लंडन आणि न्यूयॉर्कमध्ये मात्र नक्कीच सुरू झाला आहे. हे राजकारण त्या लोकांची चाल आहे ज्यांना राजकीय क्षेत्रात उतरण्याची हिंमत नाही.

एएनआयच्या मुलाखतीत जयशंकर पुढे म्हणतात, काही रिपोर्ट आणि विचारांमध्ये अचानक वाढ का झाली? म्हणजे, या आधी काही गोष्टी घडत नव्हत्या का? 1984 मध्ये दिल्लीत खूप काही घडले होते, त्यावर आपण डॉक्युमेंट्री का पाहत नाही? मी खूप मानवतावादी आहे आणि माझा विश्वास आहे की ज्यांच्यावर अन्याय झाला आहे त्यांना न्याय मिळाला पाहिजे. अशा अजेंड्याला बळी पडू नका. राजकीय क्षेत्रात उतरण्याची हिंमत नसलेल्या लोकांकडून हे राजकारण खेळले जात आहे. 

जयशंकर पुढे म्हणतात की, काही वेळा भारताचे राजकारण केवळ देशाच्या सीमेतच होत नाही, तर ते बाहेरुनही घडते. आम्ही केवळ एखाद्या माहितीपटावर, एखाद्या युरोपियन शहरात दिलेल्या भाषणावर किंवा कोठेतरी वर्तमानपत्रात प्रसिद्ध झालेल्या भाषणावर चर्चा करत नाही. आपण राजकारणात वाद घालत आहोत, जो प्रसारमाध्यमातून चुकीचा दाखवला जात आहे. अशा प्रकारे भारताची, सरकारची, भाजपची, पंतप्रधानांची अतिरेकी प्रतिमा कशी आकाराला येते हे तुम्हाला कळेल. एका दशकापासून हे चालू आहे, असेही ते म्हणाले.

 

टॅग्स :S. Jaishankarएस. जयशंकरIndiaभारतBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेस