शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

'1984 मध्ये खूप काही झालं, त्यावर डॉक्युमेंट्री का बनवली नाही?', परराष्ट्रमंत्री जयशंकर यांचे मोठे विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2023 19:56 IST

परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गुजरात दंगलीवरील बीबीसी डॉक्युमेंट्रीवर स्पष्टपणे भाष्य केले.

MEA S Jaishankar: परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गुजरात दंगलीवरील बीबीसी डॉक्युमेंट्रीच्या वादावर मोठे वक्तव्य केले आहे. पंतप्रधान मोदी आणि भारताबाबत पाश्चिमात्य प्रसारमाध्यमांकडून काही दिवसांपासून काही ना काही चर्चा सुरू आहे. यावर जयशंकर म्हणाले की, टायमिंग अॅक्सीडेंटल आहे, असे तुम्हाला वाटते का? भारतात निवडणुकीचा हंगाम सुरू झाला आहे की नाही माहीत नाही, पण लंडन आणि न्यूयॉर्कमध्ये मात्र नक्कीच सुरू झाला आहे. हे राजकारण त्या लोकांची चाल आहे ज्यांना राजकीय क्षेत्रात उतरण्याची हिंमत नाही.

एएनआयच्या मुलाखतीत जयशंकर पुढे म्हणतात, काही रिपोर्ट आणि विचारांमध्ये अचानक वाढ का झाली? म्हणजे, या आधी काही गोष्टी घडत नव्हत्या का? 1984 मध्ये दिल्लीत खूप काही घडले होते, त्यावर आपण डॉक्युमेंट्री का पाहत नाही? मी खूप मानवतावादी आहे आणि माझा विश्वास आहे की ज्यांच्यावर अन्याय झाला आहे त्यांना न्याय मिळाला पाहिजे. अशा अजेंड्याला बळी पडू नका. राजकीय क्षेत्रात उतरण्याची हिंमत नसलेल्या लोकांकडून हे राजकारण खेळले जात आहे. 

जयशंकर पुढे म्हणतात की, काही वेळा भारताचे राजकारण केवळ देशाच्या सीमेतच होत नाही, तर ते बाहेरुनही घडते. आम्ही केवळ एखाद्या माहितीपटावर, एखाद्या युरोपियन शहरात दिलेल्या भाषणावर किंवा कोठेतरी वर्तमानपत्रात प्रसिद्ध झालेल्या भाषणावर चर्चा करत नाही. आपण राजकारणात वाद घालत आहोत, जो प्रसारमाध्यमातून चुकीचा दाखवला जात आहे. अशा प्रकारे भारताची, सरकारची, भाजपची, पंतप्रधानांची अतिरेकी प्रतिमा कशी आकाराला येते हे तुम्हाला कळेल. एका दशकापासून हे चालू आहे, असेही ते म्हणाले.

 

टॅग्स :S. Jaishankarएस. जयशंकरIndiaभारतBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेस