शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

कॅनडाच्या अधिकाऱ्यांना परत का पाठवले? भारत-कॅनडा संबंधांवर एस जयशंकर स्पष्ट बोलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2023 20:21 IST

S Jaishankar India Canada Relations: भारत आणि कॅनडामध्ये सुरू झालेल्या वादावर परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांचे महत्वाचे वक्तव्य आले आहे.

S Jaishankar India Canada Relations: भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी रविवारी(दि.22) भारत-कॅनडा संबंधांवर भाष्य केले. यावेळी ते म्हणाले की, कॅनडाच्या कर्मचार्‍यांनी देशाच्या कारभारात सतत हस्तक्षेप केल्यामुळे भारताने कॅनडाशी राजनैतिक समानतेची मागणी केली, ज्यामुळे त्यांना आपले 41 अधिकारी परत बोलवावे लागले. एका देशात किती नौकरशहा आहेत आणि दुसर्‍या देशात किती आहेत, यावरुन समानता ठरवली जाते. ही समानता व्हिएन्ना कन्व्हेन्शनद्वारे प्रदान केली गेली आहे, अशी प्रतक्रिया जयशंकर यांनी दिली.

ते पुढे म्हणाले, आम्ही समानतेची मागणी केली, कारण आम्हाला कॅनेडियन अधिकाऱ्यांकडून आमच्या कारभारात होणाऱ्या सततच्या हस्तक्षेपाची चिंता होती. मला विश्वास आहे की कालांतराने अधिक गोष्टी प्रकाशात येतील आणि लोकांना समजेल की, आम्हाला हा निर्णय का घ्यावा लागला.

भारत-कॅनडा संबंधांवर जयशंकर म्हणाले की, सध्या संबंध कठीण टप्प्यातून जात आहेत. भारताची समस्या कॅनडाच्या काही राजकीय मुद्द्यांशी आहे. कॅनडाचा व्हिसा देणे पुन्हा कधी सुरू होईल? या प्रश्नाला उत्तर देताना जयशंकर म्हणाले की, जर आम्हाला कॅनडातील आमच्या डिप्लोमॅट्सच्या सुरक्षेत प्रगती दिसली, तर आम्ही व्हिसा जारी करण्यास पुन्हा सुरुवात करू.

तणाव वाढला...जस्टिन ट्रूडो सरकारने 41 अधिकाऱ्यांना परत बोलावल्याची घोषणा केल्यावर भारत आणि कॅनडामधील तणाव वाढला. भारताने ठरवून दिलेल्या मुदतीच्या एक दिवस आधीच सरकारने त्यांच्या अधिकाऱ्यांना माघारी बोलावले. विशेष म्हणजे, कॅनडात एका खलिस्तानी समर्थकाच्या हत्येनंतर हा वाद निर्णय झाला आहे. कॅनडाने या हत्येत भारतावर आरोप केला आहे. पण, भारताने या आरोपाचे खंडन केले आहे.

टॅग्स :S. Jaishankarएस. जयशंकरIndiaभारतCanadaकॅनडाInternationalआंतरराष्ट्रीय