शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
2
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
3
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
4
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
5
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
6
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
7
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
8
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
9
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
10
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
11
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
12
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
13
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
14
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
15
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
16
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
17
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
18
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
19
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
20
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?

कॅनडाच्या अधिकाऱ्यांना परत का पाठवले? भारत-कॅनडा संबंधांवर एस जयशंकर स्पष्ट बोलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2023 20:21 IST

S Jaishankar India Canada Relations: भारत आणि कॅनडामध्ये सुरू झालेल्या वादावर परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांचे महत्वाचे वक्तव्य आले आहे.

S Jaishankar India Canada Relations: भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी रविवारी(दि.22) भारत-कॅनडा संबंधांवर भाष्य केले. यावेळी ते म्हणाले की, कॅनडाच्या कर्मचार्‍यांनी देशाच्या कारभारात सतत हस्तक्षेप केल्यामुळे भारताने कॅनडाशी राजनैतिक समानतेची मागणी केली, ज्यामुळे त्यांना आपले 41 अधिकारी परत बोलवावे लागले. एका देशात किती नौकरशहा आहेत आणि दुसर्‍या देशात किती आहेत, यावरुन समानता ठरवली जाते. ही समानता व्हिएन्ना कन्व्हेन्शनद्वारे प्रदान केली गेली आहे, अशी प्रतक्रिया जयशंकर यांनी दिली.

ते पुढे म्हणाले, आम्ही समानतेची मागणी केली, कारण आम्हाला कॅनेडियन अधिकाऱ्यांकडून आमच्या कारभारात होणाऱ्या सततच्या हस्तक्षेपाची चिंता होती. मला विश्वास आहे की कालांतराने अधिक गोष्टी प्रकाशात येतील आणि लोकांना समजेल की, आम्हाला हा निर्णय का घ्यावा लागला.

भारत-कॅनडा संबंधांवर जयशंकर म्हणाले की, सध्या संबंध कठीण टप्प्यातून जात आहेत. भारताची समस्या कॅनडाच्या काही राजकीय मुद्द्यांशी आहे. कॅनडाचा व्हिसा देणे पुन्हा कधी सुरू होईल? या प्रश्नाला उत्तर देताना जयशंकर म्हणाले की, जर आम्हाला कॅनडातील आमच्या डिप्लोमॅट्सच्या सुरक्षेत प्रगती दिसली, तर आम्ही व्हिसा जारी करण्यास पुन्हा सुरुवात करू.

तणाव वाढला...जस्टिन ट्रूडो सरकारने 41 अधिकाऱ्यांना परत बोलावल्याची घोषणा केल्यावर भारत आणि कॅनडामधील तणाव वाढला. भारताने ठरवून दिलेल्या मुदतीच्या एक दिवस आधीच सरकारने त्यांच्या अधिकाऱ्यांना माघारी बोलावले. विशेष म्हणजे, कॅनडात एका खलिस्तानी समर्थकाच्या हत्येनंतर हा वाद निर्णय झाला आहे. कॅनडाने या हत्येत भारतावर आरोप केला आहे. पण, भारताने या आरोपाचे खंडन केले आहे.

टॅग्स :S. Jaishankarएस. जयशंकरIndiaभारतCanadaकॅनडाInternationalआंतरराष्ट्रीय