शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

Russia Ukraine War : 'इथेच शिकेन पण परदेशात जाणार नाही'; युक्रेनवरून परतलेल्या विद्यार्थ्याने सांगितला भयंकर अनुभव

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2022 08:36 IST

Russia Ukraine War : शिवपाल घरी परतल्यावर त्याच्या घरी अत्यंत आनंदाचं वातावरण आहे.

नवी दिल्ली - युक्रेनमधील तणावपूर्ण परिस्थितीत अद्यापही अनेक भारतीय विद्यार्थी हे अडकून राहिले आहेत. भारतीयांना पुन्हा मायदेशी परत आणण्यासाठी मोदी सरकार देखील पावलं उचलत आहेत. याच दरम्यान राजस्थानचा एक विद्यार्थी आपल्या घरी सुखरूप परत आला आहे. 'इथेच शिकेन पण आता परदेशात जाणार नाही' असं म्हणत युक्रेनवरून परतलेल्या विद्यार्थ्याने भयंकर अनुभव सांगितला आहे. शिवपाल असं या एमबीबीएस विद्यार्थ्याचं नाव असून तो राजस्थानच्या धौलपूरमध्ये परत आला आहे. मेडिकलचं पुढचं शिक्षण इथेच झालं तर पुन्हा युक्रेनला जाणार नाही असं शिवपालने म्हटलं आहे. 

शिवपाल घरी परतल्यावर त्याच्या घरी अत्यंत आनंदाचं वातावरण आहे. विद्यार्थ्याने दिलेल्या माहितीनुसार, "युक्रेनमध्ये अत्यंत गंभीर परिस्थिती आहे. तिथे सातत्याने हल्ले केले जात आहेत. बॉर्डरपर्यंत पोहोचणं तर खूपच अवघड आहे. 30 किमी पायी चालत बॉर्डरपर्यंत पोहोचलो. अनेक विद्यार्थी अद्यापही तिथेच आहेत. ते भारतात परत येण्याची वाट पाहत आहेत. युद्धाच्या परिस्थिती युक्रेनमध्ये विद्यार्थ्यांना स्थानिक सरकारकडून कोणतीच मदत मिळत नाही. मी सुखरुप घरी परत आल्यामुळे भारत सरकार आणि राजस्थान सरकारचे आभार मानतो. त्यांनी आमची भरपूर मदत केली."

"युक्रेनमध्ये खाण्या-पिण्याची काही व्यवस्था नाही"

"राजस्थान सरकारच्या अधिकाऱ्यांनी आमची खूपच मदत केली. माझ्या घरापर्यंतच्या प्रवासाची जबाबदारी पार पाडली. युक्रेनमध्ये खाण्या-पिण्याची काही व्यवस्था नाही. आम्हाला अनेक खडतर प्रसंगाचा सामना करावा लागला. आम्ही दोन रात्री बॉर्डरवर थांबलो आणि आता तिसऱ्या दिवशी येथे येऊ शकलो. बॉर्डरवर प्रचंड गर्दी आहे" अशी माहिती शिवपालने दिली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. एका भारतीय विद्यार्थ्याने मदतीसाठी साद घातली आहे. "ब्रेडचा एक तुकडा उरलाय, बंकरमध्ये हाडं गोठवणारं तापमान, आम्हाला येथून घेऊन चला" असं त्याने म्हटलं आहे. असोयुन हुसैन असं या भारतीय विद्यार्थ्याचं नाव असून तो केरळचा रहिवासी आहे. बंकरमध्ये अडकून राहिलेल्यांची नेमकी कशी परिस्थिती आहे याची त्याने माहिती दिली आहे. 

'फक्त ब्रेडचा तुकडा उरलाय, हाडं गोठवणारं तापमान, आम्हाला येथून घेऊन चला'

एका न्यूज एजन्सीसोबत फोनवर चर्चा करताना हुसैन याने "युक्रेनमधील परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. जेवण आणि औषधं मिळणं अत्यंत कठीण झालं आहे कारण येथे स्थानिक लोकांना प्राथमिकता दिली जात आहे. बंकरमध्ये तापमान इतकं खाली गेलं आहे की बर्फ जमा झाला आहे. गेल्या 48 तासांत आमच्याकडे खाण्यासाठी फक्त ब्रेडचा एक छोटासा तुकडा उरला आहे. जेवण तर लांबची गोष्ट आहे. पिण्याच्या पाण्यासाठी देखील अनेक तास वाट पाहावी लागत आहे. येथील परिस्थिती अत्यंत वाईट आहे. बंकरमध्ये खूप जास्त गर्दी आहे. आमचं जॅकेट देखील खराब झालं आहे. थंडी इतकी आहे की नेमकं काय करावं हे समजत नाही. आमच्याकडे 4-5 बेडशीट होत्या. आम्ही त्यावरच रेल्वे ट्रॅक किंवा प्लॅटफॉर्मवर झोपत आहोत" असं असोयुन हुसैन याने म्हटलं आहे. 

 

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशियाIndiaभारतRajasthanराजस्थान