शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

याला म्हणतात लॉटरी! युद्ध युक्रेन अन् रशियाचं, पण केंद्रस्थानी भारत; एक निर्णय ठरला गेमचेंजर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2022 11:53 IST

युक्रेन रशिया युद्धाचा भारताला फायदाच फायदा; अचानक लागल्या नेत्यांच्या रांगा

नवी दिल्ली: रशिया युक्रेन युद्ध सुरू होऊन महिना उलटला आहे. अद्यापही युद्ध सुरुच आहे. रशियानं युद्ध जाहीर केल्यानंतर लगेचच अमेरिकेसह युरोपियन देशांनी निर्बंध लादले. सगळे देश युक्रेनच्या बाजूनं उभे राहिले. अशा स्थितीत भारत अडचणीत येईल असं अनेकांना वाटलं. कारण अमेरिकेसह पाश्चात्य देशांकडून दबाव वाढत होता. त्यांच्यासोबतचे संबंध बिघडण्याची शक्यता होती. मात्र त्याचवेळी भारत रशियासोबत पंगा घेऊ शकत नव्हता. अमेरिका पाकिस्तानच्या बाजूनं उभा राहिला, तेव्हा वेळोवेळी रशिया भारतासाठी धावून आला. त्यामुळे भारतानं रशियावर निर्बंध लादले नाहीत. चर्चेतून प्रश्न सोडवा अशी भूमिका भारतानं घेतली. भारतानं घेतलेल्या या भूमिकेचे फायदे होताना दिसत आहेत.

भारतानं रशियाचा विश्वास जिंकला आहे. पाश्चिमात्य देशांनी भारतावर कोणतेही निर्बंध लादलेले नाहीत. त्यांच्यासोबतचे संबंधदेखील भारतानं जपले आहेत. चीन प्रश्नी रशिया तुमच्या मदतीला धावून येईल अशी अपेक्षाच ठेवू नका, असं अमेरिकेनं भारताला सुनावलं. मात्र त्यापलीकडे अमेरिकेनं भारताविरोधात कोणतीही कारवाई केली नाही. भारतानं रशिया विरुद्ध युक्रेन युद्धाबाबत घेतलेली भूमिका फायदेशीर ठरली आहे.

रशियासोबतचे संबंध उत्तम असल्यानं भारतीय विद्यार्थ्यांची युक्रेनमधून सुटका झाली. त्यानंतर गेल्या काही दिवसांपासून भारतात अनेक बड्या देशांच्या नेत्यांची ये जा सुरू आहे. चीन आणि ब्रिटनच्या परराष्ट्र मंत्र्यांनी भारताचा दौरा केला आहे. अमेरिकेचे डेप्युटी नॅशनल सिक्युरिटी ऍडव्हायजर भारतात येऊ गेले आहेत. अमेरिकेनं निर्बंध लादलेले रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्गेई लावरोव यांनीदेखील नुकताच भारताचा दौरा केला.

लावरोव यांनी केलेली दोन विधानं भारतासाठी महत्त्वाची आहेत. या दोन वक्तव्यांमधून त्यांनी भारताचं स्थान अधोरेखित केलं. भारताला सुरू असलेला वस्तूंचा पुरवठा सुरुच ठेवू. त्यासाठी निर्बंधांना फाटा कसा देता येईल ते पाहू, असं लावरोव म्हणाले. भारत युक्रेन आणि रशियामध्ये मध्यस्थाची भूमिका बजावू शकतो, असंही लावरोव यांनी म्हटलं. 

अमेरिका आणि युरोपियन देश आक्रमक झाले असताना भारतानं रशियाविरोधात भूमिका घेतली नाही. त्यामुळे रशिया भारतावर खूष आहे. भारतासोबत कोणत्याही अटींशिवाय व्यापार करण्यास रशिया उत्सुक आहे. भारताल जे काही हवंय ते रशिया देईल, असं लावरोव यांनी थेट म्हटलं आहे. दोन्ही देशांत आता डॉलरमध्ये नव्हे, तर रुबल आणि रुपयामध्ये व्यवहार होतील, अशीही ऑफर रशियानं दिली आहे. भारताला आवश्यक असलेलं ८५ टक्के खनिज तेल निर्यात करावं लागतं. तर रशिया मुख्य तेल निर्यातदारांपैकी एक आहे. अशा स्थितीत रशिया भारताच्या कामी येऊ शकतो.

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशियाCrude Oilखनिज तेल