शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
6
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
7
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
8
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
9
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
10
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
11
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
12
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
13
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
14
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
15
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
16
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
17
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
18
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
19
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
20
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार

याला म्हणतात लॉटरी! युद्ध युक्रेन अन् रशियाचं, पण केंद्रस्थानी भारत; एक निर्णय ठरला गेमचेंजर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2022 11:53 IST

युक्रेन रशिया युद्धाचा भारताला फायदाच फायदा; अचानक लागल्या नेत्यांच्या रांगा

नवी दिल्ली: रशिया युक्रेन युद्ध सुरू होऊन महिना उलटला आहे. अद्यापही युद्ध सुरुच आहे. रशियानं युद्ध जाहीर केल्यानंतर लगेचच अमेरिकेसह युरोपियन देशांनी निर्बंध लादले. सगळे देश युक्रेनच्या बाजूनं उभे राहिले. अशा स्थितीत भारत अडचणीत येईल असं अनेकांना वाटलं. कारण अमेरिकेसह पाश्चात्य देशांकडून दबाव वाढत होता. त्यांच्यासोबतचे संबंध बिघडण्याची शक्यता होती. मात्र त्याचवेळी भारत रशियासोबत पंगा घेऊ शकत नव्हता. अमेरिका पाकिस्तानच्या बाजूनं उभा राहिला, तेव्हा वेळोवेळी रशिया भारतासाठी धावून आला. त्यामुळे भारतानं रशियावर निर्बंध लादले नाहीत. चर्चेतून प्रश्न सोडवा अशी भूमिका भारतानं घेतली. भारतानं घेतलेल्या या भूमिकेचे फायदे होताना दिसत आहेत.

भारतानं रशियाचा विश्वास जिंकला आहे. पाश्चिमात्य देशांनी भारतावर कोणतेही निर्बंध लादलेले नाहीत. त्यांच्यासोबतचे संबंधदेखील भारतानं जपले आहेत. चीन प्रश्नी रशिया तुमच्या मदतीला धावून येईल अशी अपेक्षाच ठेवू नका, असं अमेरिकेनं भारताला सुनावलं. मात्र त्यापलीकडे अमेरिकेनं भारताविरोधात कोणतीही कारवाई केली नाही. भारतानं रशिया विरुद्ध युक्रेन युद्धाबाबत घेतलेली भूमिका फायदेशीर ठरली आहे.

रशियासोबतचे संबंध उत्तम असल्यानं भारतीय विद्यार्थ्यांची युक्रेनमधून सुटका झाली. त्यानंतर गेल्या काही दिवसांपासून भारतात अनेक बड्या देशांच्या नेत्यांची ये जा सुरू आहे. चीन आणि ब्रिटनच्या परराष्ट्र मंत्र्यांनी भारताचा दौरा केला आहे. अमेरिकेचे डेप्युटी नॅशनल सिक्युरिटी ऍडव्हायजर भारतात येऊ गेले आहेत. अमेरिकेनं निर्बंध लादलेले रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्गेई लावरोव यांनीदेखील नुकताच भारताचा दौरा केला.

लावरोव यांनी केलेली दोन विधानं भारतासाठी महत्त्वाची आहेत. या दोन वक्तव्यांमधून त्यांनी भारताचं स्थान अधोरेखित केलं. भारताला सुरू असलेला वस्तूंचा पुरवठा सुरुच ठेवू. त्यासाठी निर्बंधांना फाटा कसा देता येईल ते पाहू, असं लावरोव म्हणाले. भारत युक्रेन आणि रशियामध्ये मध्यस्थाची भूमिका बजावू शकतो, असंही लावरोव यांनी म्हटलं. 

अमेरिका आणि युरोपियन देश आक्रमक झाले असताना भारतानं रशियाविरोधात भूमिका घेतली नाही. त्यामुळे रशिया भारतावर खूष आहे. भारतासोबत कोणत्याही अटींशिवाय व्यापार करण्यास रशिया उत्सुक आहे. भारताल जे काही हवंय ते रशिया देईल, असं लावरोव यांनी थेट म्हटलं आहे. दोन्ही देशांत आता डॉलरमध्ये नव्हे, तर रुबल आणि रुपयामध्ये व्यवहार होतील, अशीही ऑफर रशियानं दिली आहे. भारताला आवश्यक असलेलं ८५ टक्के खनिज तेल निर्यात करावं लागतं. तर रशिया मुख्य तेल निर्यातदारांपैकी एक आहे. अशा स्थितीत रशिया भारताच्या कामी येऊ शकतो.

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशियाCrude Oilखनिज तेल