शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

रशियाची भारताला ऑफर पण चीन आणि पाकिस्तान वाढवणार टेन्शन; 'अफगाण QUAD' काय आहे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2025 16:56 IST

भारताकडून अफगान क्वाडमध्ये सहभागाबद्दल अधिकृतपणे काही निवेदन आले नाही. परंतु तज्ज्ञांनी यावर आपली मते मांडली आहेत.

नवी दिल्ली - रशिया मागील काही काळापासून भारतानं अफगान क्वाडमध्ये सहभागी व्हावं अशी अपेक्षा व्यक्त करत आहे. आतापर्यंत या क्वाडमध्ये रशिया, चीन, पाकिस्तान आणि इराण यांचा समावेश आहे. त्यामुळे भारतानेही त्याचा भाग व्हावं असं रशियाला वाटते. परंतु या क्वाडमध्ये भारताच्या समावेशाला मोठी आव्हाने आहेत असं तज्ज्ञांनी सांगितले. अफगान क्वाडमध्ये याआधीच पाकिस्तानचा सहभाग आहे त्यामुळे भारताचा यापासून दूर राहण्याचा इरादा आहे.

रशियाच्या प्रभावाखाली या चार देशांनी क्वाडची स्थापना करत अफगाणिस्तानात स्थिरता आणि प्रादेशिक हितांचे लक्ष साधण्याचा हेतू ठेवला आहे. अलीकडेच रशियाचे परराष्ट्र मंत्रई सर्गेई लावरोव्ह यांनी याबाबत निवेदन दिले होते. त्यात ते म्हणाले होते की, भारताने या क्वाडचा हिस्सा बनू शकते. अफगाणिस्तानात त्यांच्या भूमिका वाढवण्यासाठी भारताचं असं करणे योग्य पाऊल ठरेल असं त्यांनी म्हटलं. 

भारतासाठी पाकिस्तान बनला रेड सिग्नल

भारताकडून अफगान क्वाडमध्ये सहभागाबद्दल अधिकृतपणे काही निवेदन आले नाही. परंतु तज्ज्ञांनी यावर आपली मते मांडली आहेत. या क्वाडमध्ये पाकिस्तानचं आधीच असणं भारतासाठी रेड सिग्नल आहे. पाकिस्तानने नेहमी अफगाणिस्तानात तालिबानीचं समर्थन केले जे एकप्रकारे भारत आणि अमेरिकेच्या हिताविरोधात आहे. जर या ४ देशांना भारताला या क्वाडमध्ये सहभागी करून घ्यायचे असेल तर सर्वात आधी पाकिस्तानला स्वत:त बदल करावे लागतील. अफगाणिस्तानची स्थिरता रशिया आणि भारताच्या प्रादेशिक हिताची आहे. जर पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील संबंध खराब राहिले तर रशियाच्या या क्वाडमध्ये सहभागी होण्याच्या ऑफरवर भारत सकारात्मक विचार करू शकतो. 

रशियाकडून भारताला क्वाडमध्ये सहभागी होण्याची ऑफर अशावेळी आलीय जेव्हा काही दिवसांपूर्वीच भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्रींनी दुबईत तालिबानच्या परराष्ट्र मंत्र्‍याची भेट घेतली होती. याआधी तालिबान, पाकिस्तान यांच्यातील संबंध चांगले असले तरी सध्या अफगाणिस्तान सरकारचं पाकिस्तानशी जुळत नाही. या दोन्ही देशात वाद वाढतोय. त्यातच भारताने या क्वाडमध्ये सहभागी होण्याचा सकारात्मक विचार केला तर भारत केवळ अफगाणिस्तानचा मानवतावादी मित्र बनणार नाही तर प्रादेशिक शक्ती म्हणून भारताची विश्वासार्हता देखील मजबूत होईल असं तज्ज्ञ सांगतात. 

टॅग्स :IndiaभारतrussiaरशियाPakistanपाकिस्तानchinaचीनAfghanistanअफगाणिस्तान