शहरं
Join us  
Trending Stories
1
दीड वर्षांचं प्लॅनिंग... 117 ड्रोनचा वापर! युक्रेनने रशियाची 41 लढाऊ विमानं, 5 एअरबेस केले उद्ध्वस्त; कसा ठरला प्लॅन? झेलेन्स्की यांनी सांगितलं
2
नवी मुंबई विमानतळाचे काउंटडाउन सुरू; नामकरणाचे काय? कृती समिती मुख्यमंत्र्यांना भेटणार
3
पतीने पकडले पाय, दिराने हात अन् जीव जाईपर्यंत गळा दाबत राहिला बाप! ऐकून होईल काळजाचं पाणी
4
नेपाळच्या जोडप्याचं बंगळुरूत कांड! सराफाच्या घरावर दरोडा घातला, २ किलो सोनं आणि रोकड घेऊन लंपास
5
तुर्कस्तानला झटक्यावर झटका.., पाकिस्तानची साथ पडतेय भारी; आता Air India नं घेतला मोठा निर्णय 
6
राहाच्या जन्मानंतर आलिया भट पुन्हा गरोदर? रणबीर म्हणतो- "दुसरीही मुलगीच हवी"
7
'हाउसफुल्ल ५'च्या इव्हेंटमध्ये प्रचंड गर्दीत महिलांचा रडण्याचा आवाज, अक्षय कुमारचा संताप अनावर, व्हिडीओ व्हायरल
8
ट्रेनमध्ये चढताना प्लॅटफॉर्मवरून घसरला, RPF कॉन्स्टेबलने वाचवले रेल्वे प्रवाशाचे प्राण
9
Stock Market Today: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी घसरण; सेन्सेक्स २३७ अंकांनी आपटला, आयटी-मेटल स्टॉक्समध्ये विक्री
10
ठाण्यात हिऱ्याच्या नावे बनावट खडे; १० काेटी ५० लाखांचा गंडा, एक हजार गुंतवणूकदारांची फसवणूक
11
मुक्काम पोस्ट, महामुंबई: नालेसफाईची पोलखोल! आता अधिकाऱ्यांचा पगारही ठेकेदारांनी द्यायचा का?
12
एकदा पैसे गुंतवा, आयुष्यभरासाठी ₹१,४२,५०० चं पेन्शन पक्कं; LIC ची ही स्कीम बहुतेकांना माहितच नाही
13
मुंबई-अहमदाबाद महामार्गावर टँकर-बस यांचा भीषण अपघात; वाहनांचे नुकसान, एक ठार
14
नागपूर-मुंबई प्रवासाची 'समृद्धी' ५ जूनपासून; शेवटच्या टप्प्याचा लोकार्पणासाठी मुहूर्त ठरला!
15
युक्रेनची मोठी कारवाई, रशियावर केला एअर स्ट्राईक; उद्ध्वस्त केली ४१ लढाऊ विमाने
16
एका वर्षापूर्वी दुबईतून चोरी झालेले एअरपॉड्स थेट पोहोचले पाकिस्तानात! ट्रॅक करणारा तरुण म्हणाला... 
17
भारतासोबत पुन्हा तणाव वाढवण्याचा प्रयत्न करतोय पाकिस्तान; दुसऱ्या देशात जाऊन काश्मीर प्रश्न उपस्थित केला अन्... 
18
"महिला बसल्या आहेत, लघवी करु नका"; तरुणाच्या विनंतीनंतर तिघांनी झाडल्या गोळ्या, जामखेडमधील प्रकार
19
आजचे राशीभविष्य : ०२ जून २०२५; कष्टाच्या मानाने प्राप्ती कमी, प्रगतीच्या संधी येतील
20
VIDEO: बुद्धिबळ स्पर्धेत डी गुकेशने घेतला पराभवाचा बदला; मॅग्नस कार्लसनने असा व्यक्त केला राग

वयाच्या १३ व्या वर्षी डुग्गू घेणार दीक्षा; आयुष्यातील सर्व सुखसोयीचा करणार त्याग

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2025 17:25 IST

दुर्गमध्ये श्री आदित्यनाथ जैन श्वेतांबर मंदिर ट्रेस्टद्वारे दीक्षा समारंभ आयोजित करण्यात आला आहे.

दुर्ग - आई वडिलांचे प्रेम, लहानपणीच्या खोड्या, मस्ती, बिनधास्त जीवन आणि प्रत्येक क्षण आनंदाने जगणं म्हणजे बालपण..आईच्या कुशीत शिरणे, तिच्या मांडीवर डोके ठेवून झोपणे म्हणजे बालपण... राजस्थानच्या जोधपूर इथं १ जून २०१२ साली जन्मलेला चिमुकला रुहान मेहता याला सर्वजण लाडाने डुग्गू म्हणतात. याच डुग्गूने आयुष्यातील मोह माया त्याग करण्याचा निर्णय घेतला आहे. सुंदर आयुष्यातील क्षणांचा त्याग करून १३ वर्षीय डुग्गू वैराग्याचं आयुष्य जगणार आहे.

दुर्ग येथे आयोजित दीक्षा समारोहात रुहान मेहता उर्फ डुग्गू दीक्षा ग्रहण करणार आहे. आयुष्यातील सर्व सुखांचा त्याग करून वैराग्याच्या मार्गे जाण्याचा कठीण निर्णय त्याने घेतला आहे. डुग्गू आजतागायात शालेय शिक्षणापासून दूर आहे. त्याने कधीही नर्सरी, केजी वर्गाचे शिक्षणही घेतले नाही. लहानपणापासून त्याला धार्मिकतेची ओढ लागली. त्यानंतर आता तो स्वत: वैराग्याच्या मार्गावर चालणार आहे. इतक्या छोट्या वयात डुग्गूला जैन धर्माच्या ४५ आगमपैकी २२ आगम पाठ आहेत. चार कर्मग्रंथातील २ हजार सूत्र पाठ केले आहेत. प्रतिक्रमण, संस्कृत आणि अनेक प्राचीन भजन डुग्गूला तोंडपाठ आहेत. डुग्गूला दुर्ग येथे विनय कुशल मुनी दीक्षा देतील. दुर्गमध्ये श्री आदित्यनाथ जैन श्वेतांबर मंदिर ट्रेस्टद्वारे दीक्षा समारंभ आयोजित करण्यात आला आहे.  

दीक्षा घेतल्यानंतर कसं असेल डुग्गूचे जीवन?

दीक्षा घेतल्यानंतर डुग्गू पूर्णपणे सन्यासी जीवन जगणार आहे. जैन साधू, साध्वी यांचे जीवन संतुलित आणि शिस्तीचे असते. सूर्यास्तानंतर जैन साधू पाण्याचा एक थेंब आणि अन्नाचा एक कणही घेत नाहीत. सूर्योदय झाल्यानंतरही जवळपास ४८ मिनिटे वाट पाहतात. त्यानंतर पाणी पितात. जैन साधू कधीही स्वत:साठी भोजन बनवत नाहीत. ना त्यांच्या आश्रमात भोजन बनते. हे लोक घरोघरी जात भोजनासाठी भीक्षा मागतात. या प्रथेला गोचरी म्हटलं जाते. जैनमुनी कुठल्याही प्रवासासाठी वाहनाचा वापर करत नाहीत. जितके होत असेल तितके पायपीट करतात. एका स्थानावर अधिक काळ राहत नाहीत. पावसाळ्याचे ४ महिने वगळता इतर दिवशी सतत प्रवास सुरू असतो. 

दीक्षा घेतल्यानंतर ५ वचन पाळावे लागतात

कुठल्याही जीवित प्राण्याला तन, मन अथवा वचन याने हानी न पोहचवणेनेहमी खरे बोलणे आणि सत्याला साथ देणेइतरांच्या सामानावर वाईट नजर न टाकणे, लालसेपासून दूर राहणेशरीराच्या सर्व इंद्रियांवर नियंत्रण ठेवणे, कुणासोबतही संबंध बनवू नयेजितकी गरज तितकेच स्वत:जवळ ठेवावे, आवश्यकतेपेक्षा अधिक ठेवू नये