शहरं
Join us  
Trending Stories
1
धुमसते नेपाळ : संसद पेटविली; सर्वोच्च न्यायालय आणि अॅटर्नी जनरल कार्यालयात तोडफोड
2
आजचे राशीभविष्य - ९ सप्टेंबर २०२५: जिभेवर ताबा ठेवावा लागेल, वरिष्ठांशी वाद होण्याची शक्यता
3
अग्रलेख: भडकलेली 'जेन-झी'! भारताला अधिक सजग राहावे लागणार
4
मालेगाव २००८ बॉम्बस्फोट: प्रज्ञा ठाकूर, पुरोहितसह ६ जणांच्या मुक्ततेला उच्च न्यायालयात आव्हान
5
भारताच्या 'आयटी'वर नवे संकट! 'या' कंपन्यांवर २५ टक्के कर लावण्याचा अमेरिकी खासदाराचा प्रस्ताव
6
Apple Awe Dropping Event : Apple नं लाँच केला सर्वात स्लीम iPhone 17 Air! जाणून घ्या, किंमत अन् संपूर्ण स्पेसिफिकेशंस
7
Asia Cup 2025: कधी अन् कुठं पाहता येईल IND vs UAE मॅच? कसा आहे दोन्ही संघांमधील हेड-टू-हेड रेकॉर्ड?
8
iPhone 17, iPhone 17 Air, Pro आणि Pro Max ची किंमत किती? जाणून घ्या सविस्तर
9
अफगाणिस्तानची विजयी सलामी; हाँगकाँगची पाटी पुन्हा कोरीच! Asia Cup स्पर्धेतील सलग १२ वा पराभव
10
Apple Event 2025 : iPhone 17 Pro आणि 17 Pro Max लाँच, नवीन डिझाइन, अपग्रेड कॅमेरा अन्...; जाणून घ्या किंमत
11
Apple Event 2025 : iPhone 17 सीरीज लाँच, Pro Motion डिस्प्ले, 20 मिनिटांत चार्ज, आणखी काय-काय आहे खास? जाणून घ्या
12
ठाण्यात सत्ता आणायची असेल तर रावणाच्या...; गणेश नाईकांनी फुंकलं ठाणे महापालिका निवडणुकीचं रणशिंग
13
Apple Awe Dropping Event : Apple Watch 11 लाँच, '5G'सह मिळणार 'हे' ढासू फीचर्स; आतापर्यंतची 'बेस्ट स्मार्ट वॉच', कंपनीचा दावा
14
Apple चे नवे AirPods Pro 3 लाँच; किंमत मोठी, पण फीचर्स खुश करणारे!
15
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...
16
ज्या DSP नं गोळीबाराचा आदेश दिला, त्याला Gen-Z आंदोलनकांनी बेदम मारहाण करत संपवलं! आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू
17
Asia Cup T20 Fastest Fifty : वादळी खेळीसह ओमरझाईचं विक्रमी अर्धशतक; सूर्यकुमार यादवचा विक्रम मोडला
18
Breaking: महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती! निकाल जाहीर, एनडीएला जादा मते मिळाली
19
इस्रायलनं संपूर्ण मध्यपूर्वेलाच बनवलं युद्धभूमी, आता 'या' देशावर केली बॉम्बिंग...! कारण काय?
20
मद्य धुंद ट्रकचालकाने मेंढ्यांसह मोटरसायकल चालकाला चिरडले, एक ठार, एक जखमी; आष्टा-इस्लामपूर मार्गावरील घटना

वयाच्या १३ व्या वर्षी डुग्गू घेणार दीक्षा; आयुष्यातील सर्व सुखसोयीचा करणार त्याग

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2025 17:25 IST

दुर्गमध्ये श्री आदित्यनाथ जैन श्वेतांबर मंदिर ट्रेस्टद्वारे दीक्षा समारंभ आयोजित करण्यात आला आहे.

दुर्ग - आई वडिलांचे प्रेम, लहानपणीच्या खोड्या, मस्ती, बिनधास्त जीवन आणि प्रत्येक क्षण आनंदाने जगणं म्हणजे बालपण..आईच्या कुशीत शिरणे, तिच्या मांडीवर डोके ठेवून झोपणे म्हणजे बालपण... राजस्थानच्या जोधपूर इथं १ जून २०१२ साली जन्मलेला चिमुकला रुहान मेहता याला सर्वजण लाडाने डुग्गू म्हणतात. याच डुग्गूने आयुष्यातील मोह माया त्याग करण्याचा निर्णय घेतला आहे. सुंदर आयुष्यातील क्षणांचा त्याग करून १३ वर्षीय डुग्गू वैराग्याचं आयुष्य जगणार आहे.

दुर्ग येथे आयोजित दीक्षा समारोहात रुहान मेहता उर्फ डुग्गू दीक्षा ग्रहण करणार आहे. आयुष्यातील सर्व सुखांचा त्याग करून वैराग्याच्या मार्गे जाण्याचा कठीण निर्णय त्याने घेतला आहे. डुग्गू आजतागायात शालेय शिक्षणापासून दूर आहे. त्याने कधीही नर्सरी, केजी वर्गाचे शिक्षणही घेतले नाही. लहानपणापासून त्याला धार्मिकतेची ओढ लागली. त्यानंतर आता तो स्वत: वैराग्याच्या मार्गावर चालणार आहे. इतक्या छोट्या वयात डुग्गूला जैन धर्माच्या ४५ आगमपैकी २२ आगम पाठ आहेत. चार कर्मग्रंथातील २ हजार सूत्र पाठ केले आहेत. प्रतिक्रमण, संस्कृत आणि अनेक प्राचीन भजन डुग्गूला तोंडपाठ आहेत. डुग्गूला दुर्ग येथे विनय कुशल मुनी दीक्षा देतील. दुर्गमध्ये श्री आदित्यनाथ जैन श्वेतांबर मंदिर ट्रेस्टद्वारे दीक्षा समारंभ आयोजित करण्यात आला आहे.  

दीक्षा घेतल्यानंतर कसं असेल डुग्गूचे जीवन?

दीक्षा घेतल्यानंतर डुग्गू पूर्णपणे सन्यासी जीवन जगणार आहे. जैन साधू, साध्वी यांचे जीवन संतुलित आणि शिस्तीचे असते. सूर्यास्तानंतर जैन साधू पाण्याचा एक थेंब आणि अन्नाचा एक कणही घेत नाहीत. सूर्योदय झाल्यानंतरही जवळपास ४८ मिनिटे वाट पाहतात. त्यानंतर पाणी पितात. जैन साधू कधीही स्वत:साठी भोजन बनवत नाहीत. ना त्यांच्या आश्रमात भोजन बनते. हे लोक घरोघरी जात भोजनासाठी भीक्षा मागतात. या प्रथेला गोचरी म्हटलं जाते. जैनमुनी कुठल्याही प्रवासासाठी वाहनाचा वापर करत नाहीत. जितके होत असेल तितके पायपीट करतात. एका स्थानावर अधिक काळ राहत नाहीत. पावसाळ्याचे ४ महिने वगळता इतर दिवशी सतत प्रवास सुरू असतो. 

दीक्षा घेतल्यानंतर ५ वचन पाळावे लागतात

कुठल्याही जीवित प्राण्याला तन, मन अथवा वचन याने हानी न पोहचवणेनेहमी खरे बोलणे आणि सत्याला साथ देणेइतरांच्या सामानावर वाईट नजर न टाकणे, लालसेपासून दूर राहणेशरीराच्या सर्व इंद्रियांवर नियंत्रण ठेवणे, कुणासोबतही संबंध बनवू नयेजितकी गरज तितकेच स्वत:जवळ ठेवावे, आवश्यकतेपेक्षा अधिक ठेवू नये