शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

धक्कादायक! पीएम किसान योजनेतून २० लाख अपात्र लाभार्थ्यांना १,३६४ कोटींचे वाटप

By देवेश फडके | Updated: January 11, 2021 11:43 IST

पंतप्रधान किसान सन्मान योजनेत २०.४८ लाख अपात्र लाभार्थ्यांना तब्बल १ हजार ३६४ कोटी रुपये देण्यात आले, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते व्यंकटेश नायक यांनी यासंदर्भात केंद्र सरकारकडून माहिती मागविली होती.

ठळक मुद्देपंतप्रधान किसान सन्मान योजनेत २०.४८ लाख अपात्र लाभार्थ्यांना लाभमाहिती अधिकार कार्यकर्ते व्यंकटेश नायक यांनी मागवलेल्या माहितीत उघडचुकीच्या पद्धतीने लाभ मिळणाऱ्यांमध्ये पंजाबमधील शेतकऱ्यांची संख्या सर्वाधिक

नवी दिल्ली : पंतप्रधान किसान सन्मान योजनेत २०.४८ लाख अपात्र लाभार्थ्यांना तब्बल १ हजार ३६४ कोटी रुपये देण्यात आले, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. एका माहिती अधिकारात विचारण्यात आलेल्या प्रश्नावर उत्तर देताना केंद्रीय कृषी मंत्रालयाने ही माहिती दिली आहे. चुकीच्या पद्धतीने लाभ मिळणाऱ्यांमध्ये पंजाबमधील शेतकऱ्यांची संख्या सर्वाधिक असल्याचे सांगितले जात आहे. 

माहिती अधिकार कार्यकर्ते व्यंकटेश नायक यांनी यासंदर्भात केंद्र सरकारकडून माहिती मागविली होती. सन २०१९ मध्ये केंद्र सरकारकडून पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेची सुरुवात करण्यात आली होती. या योजनेत शेतकऱ्यांना तीन टप्प्यात सहा हजार रुपये देण्याचे ठरवण्यात आले होते. लघु व मध्यम शेतकऱ्यांना किंवा ज्यांची जमीन दोन हेक्टरपेक्षा कमी आहे अशा शेतकऱ्यांसाठी ही योजना लागू करण्यात आली होती. या योजनेसंदर्भात माहिती अधिकाराअंतर्गत माहिती मागवण्यात आली होती. 

अपात्र लाभार्थ्यांची दोन गटांमध्ये विभागणी करण्यात आली आहे. एक गट अपात्र शेतकरी व आणि दुसरा गट प्राप्तिकर भरणाऱ्या शेतकऱ्यांचा तयार करण्यात आला आहे, अशी माहिती केंद्रीय कृषी मंत्रालयाकडून देण्यात आली. अपात्र लाभार्थ्यांपैकी ५५.५८ टक्के प्राप्तिकर भरणारे शेतकरी आहेत. उर्वरित ४४.४१ टक्के शेतकरी हे अपात्र शेतकरी गटात मोडणारे आहेत. या अपात्र शेतकऱ्यात पंजाब, आसाम, महाराष्ट्र, गुजरात, उत्तर प्रदेशच्या शेतकऱ्यांचा समावेश आहे, असेही यात सांगितले गेले आहे. 

पंजाबमधील ४.७४ लाख, आसाम ३.४५ लाख, महाराष्ट्र २.८६ लाख, गुजरात १.६४ लाख, तर उत्तर प्रदेशमधील १.६४ लाख शेतकरी अपात्र लाभार्थी ठरले आहेत. सिक्कीममध्ये एका शेतकऱ्यास चुकीचा लाभ मिळाला. दोन हजार रुपयांप्रमाणे ६८.२० लाख हप्ते देण्यात आले होते त्यातून १,३६४.१३ कोटी रुपये अपात्र लाभार्थ्यांना मिळाले. ४९.२५ लाख हप्ते प्राप्तिकर भरणाऱ्यांना तर १८.९५ लाख हप्ते अपात्र लाभार्थ्यांना मिळाले.

टॅग्स :PM Kisan Schemeप्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनाFarmerशेतकरीPunjabपंजाबMaharashtraमहाराष्ट्रUttar Pradeshउत्तर प्रदेश