शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

"...तर आरएसएस कधीच सत्तेत आली नसती"; ९० च्या दशकातील चुकांवर बोट, राहुल गांधींचा काँग्रेसला डोस

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2025 09:50 IST

Rahul Gandhi Latest Speech: विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी १९९० च्या दशकात झालेल्या चुकांवर बोट ठेवत काँग्रेसला डोस दिले. राहुल गांधींनी भाजप, आरएसएसला सत्तेतून बाहेर करायचे असेल, तर काय करावं लागेल याबद्दलही भाष्य केले. 

Rahul Gandhi Latest News: इंदिरा गांधी यांच्या कार्यकाळाचा उल्लेख करत राहुल गांधी यांनी काँग्रेसकडून झालेल्या चुकांवर आणि उणिवांवर बोट ठेवले. काँग्रेसच्या धोरणात चूक झाल्यामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सत्तेत आला. जर पुन्हा मूळ जनाधार काँग्रेससोबत आला तर भाजप आणि आरएसएसला जावं लागेल आणि असे लवकरच होईल, असे भाष्य विरोधी पक्षनेते तथा काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी केले. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

३० जानेवारी रोजी दलित इन्फ्लुअन्सरच्या वतीने एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात बोलताना विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी दलित, अल्पसंख्याक आणि मुख्य प्रवाहापासून दूर असलेल्या समूहांच्या विकासाबद्दल भाष्य केले. या समुदायांना केवळ राजकीय प्रतिनिधित्व मिळाल्याने समस्या संपणार नाहीत, तर जोपर्यंत त्यांना संस्था आणि संपत्तीमध्ये भागीदारी मिळत नाही, समस्या संपणार नाहीत, असे ते म्हणाले. 

काही चुका झाल्या, काँग्रेसला स्वीकाराव्या लागतील -राहुल गांधी

माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या कार्यकाळाचे स्मरण करत राहुल गांधी म्हणाले, तेव्हा काँग्रेसला दलित, अल्पसंख्याक आणि भटक्या विमुक्तांचा पूर्ण पाठिंबा होता. पण, १९९० च्या दशकात काही चुका, उणीवा राहिल्या आणि हे सत्य पक्षापासून लपलेले नाही.

"मागील १०-१५ वर्षात काँग्रेस पक्षाने ते केले नाही, जे त्याने करायला पाहिजे होते (दलित, अल्पसंख्याक, भटक्या विमुक्तांसाठी). जर मी असे बोललो नाही, तर मग माझं बोलणं खोटं असेल. जर काँग्रेसने दलित, भटक्या विमुक्तांना साथ दिली असती, त्यांचा विश्वास टिकवून ठेवला असता, तर आरएसएस कधीच सत्तेत आली नसती", असे राहुल गांधी म्हणाले. 

"इंदिरा गांधी यांच्या काळात दलित, अल्पसंख्याक, भटक्या विमुक्तांचा काँग्रेसवर पूर्ण विश्वास होता. पण, १९९० नंतर त्यात उणीवा निर्माण झाल्या. हे सत्य काँग्रेसला स्वीकारावंच लागेल", असेही राहुल गांधी यांनी सांगितले. 

"...तर भाजप आणि आरएसएस सत्तेतून पायउतार होईल"

याच कार्यक्रमात बोलताना राहुल गांधी म्हणाले, "ज्या दिवशी आपली एकजूट होईल, ते (भाजप-आरएसएस) सत्ता सोडून जातील. ज्यादिवशी काँग्रेसचा मूळ जनाधार एकत्र येईल, त्या दिवशी भाजप-आरएसएस पळून जाईल. आपल्याला आपल्या एकजुटीवर काम करावं लागेल. आपल्याला दलित, अति मागास, अल्पसंख्याकांचे म्हणणे ऐकून घ्यावे लागेल आणि त्यांना पुढे घेऊन जावे लागेल. असे करण्यासाठी काही वर्षे लागतील", असे राहुल गांधी म्हणाले. 

"तुम्ही गेल्या काही महिन्यांपासून बघत असाल. भाजप काँग्रेसला काहीही करू शकत नाही. ते देश चालवू शकत नाही. ते धोकेबाज आहेत", अशी टीका राहुल गांधींनी भाजपवर केली. 

"जोपर्यंत दलित, मागास, भटक्या विमुक्तांना सत्तेत त्यांचा हिस्सा मिळत नाही, तोपर्यंत समस्या सुटणार नाहीत. शिक्षण व्यवस्थेत त्यांना भागीदारी मिळाली, पण नियंत्रण मिळालं नाही. सध्या शून्य आहे", अशी भूमिका त्यांनी मांडली. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसBJPभाजपाRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघIndira Gandhiइंदिरा गांधी