शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी निदर्शक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
2
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
3
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
4
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
5
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
6
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
7
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
8
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
9
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
10
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
11
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
12
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!
13
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
14
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
15
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान
16
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
17
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
18
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी
19
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
20
Women's Asia Cup 2025 Final : भारताची फायनलमध्ये धडक! चीनचा हिशोब चुकता करुन इतिहास रचण्याची संधी

RSS on Same Sex Marriage: "लग्न हे फक्त स्त्री-पुरुषांमध्येच झालं पाहिजे"; RSSचे दत्तात्रेय होसबळे यांची रोखठोक भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2023 16:42 IST

"काहींनी हिंदुत्ववादी विचार विकृत करण्याचा प्रयत्न केलाय"

RSS on Same Sex Marriage: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नुकत्याच केलेल्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली. राहुल यांनी अधिक जबाबदारीने भाष्य केले पाहिजे, असे ते म्हणाले. तसेच, जगात भारत देशाची चांगली छबी निर्माण करणे अधिक गरजेचे असल्याचे ते म्हणाले. याच वेळी सध्या गाजत असलेल्या समलैंगिक विवाहाच्या मुद्द्यावरही त्यांनी भाष्य केले. 'काही लोकांनी हिंदुत्वाची कल्पना विकृत करण्याचा प्रयत्न केला आहे. खरं तर नव्या पिढीला योग्य इतिहास सांगण्याची गरज आहे,' असे म्हणत RSS तर्फे त्यांनी समलिंगी विवाहाबाबत आपली भूमिका स्पष्ट केली.

RSS ने केंद्र सरकारच्या भूमिकेचे समर्थन केले. "विवाह फक्त स्त्री-पुरुषांमध्येच झाला पाहिजे. ते म्हणाले की, देशाची छबी जागतिक पातळीवर बदलण्याची गरज आहे. काही लोकांनी हिंदुत्वाची कल्पना विकृत करण्याचा प्रयत्न केला आहे. देशाच्या इतिहासाचा विपर्यास करून काही लोकांनी सांगितले आहे. आज आपल्याला योग्य इतिहास सांगण्याची गरज आहे. भारताचा सांस्कृतिक वारसा योग्य पद्धतीने कसा मांडायचा हेही सांगणे तितकेच आवश्यक आहे," असे अतिशय स्पष्ट आणि रोखठोक मत होसबळे यांनी मांडले.

राहुल गांधींना RSSचे सडेतोड प्रत्युत्तर

राहुल गांधींच्या वक्तव्याचाही दत्तात्रय होसबळे यांनी समाचार घेतला. "मला वाटते यावर काहीही बोलणे योग्य नाही. त्यांच्या काँग्रेसच्या पूर्वजांनीही संघाबद्दल बराच अपप्रचार केला आहे. त्यामुळे मला त्याच्याबद्दल एवढेच म्हणायचे आहे की किमान राहुल यांनी तरी आता अधिक जबाबदारीने बोलावे आणि वास्तवाकडे पाहावे. राहुल गांधी म्हणतात लोकशाही धोक्यात आहे. तसे असल्यास, भारतात निवडणुका कशा होत आहेत? निवडणुकीत त्यांच्या पक्षाचे लोकही जिंकत आहेत. राहुल गांधींचा विचार केला तर ते ज्या लोकशाहीबद्दल बोलतात, त्याच लोकशाहीप्रधान भारतात त्यांच्या पक्षाने आणलेल्या आणीबाणीसाठी आजपर्यंत त्यांनी माफी का मागितली नाही?" असे सडेतोड प्रत्युत्तर त्यांनी राहुल गांधींना दिले.

विध्वंसक शक्तींपासून सावध रहा!

कोणाचेही नाव न घेता दत्तात्रय होसाबळे म्हणाले, “काही लोक देश तोडणाऱ्या शक्ती आहेत. त्यांचे ब्रीदवाक्यच ते आहे. अशा घोषणा आता विद्यापीठातूनही दिल्या जात आहेत. सरकार त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करेल आणि त्यासाठी सामंजस्याचे काम संघ करेल, तसेच चर्चाही घडवून आणेल. पण आपण साऱ्यांनी देश तोडणाऱ्या शक्तींपासून सावध राहण्याची गरज आहे."

टॅग्स :LGBTएलजीबीटीRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ