शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

RSS on Same Sex Marriage: "लग्न हे फक्त स्त्री-पुरुषांमध्येच झालं पाहिजे"; RSSचे दत्तात्रेय होसबळे यांची रोखठोक भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2023 16:42 IST

"काहींनी हिंदुत्ववादी विचार विकृत करण्याचा प्रयत्न केलाय"

RSS on Same Sex Marriage: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नुकत्याच केलेल्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली. राहुल यांनी अधिक जबाबदारीने भाष्य केले पाहिजे, असे ते म्हणाले. तसेच, जगात भारत देशाची चांगली छबी निर्माण करणे अधिक गरजेचे असल्याचे ते म्हणाले. याच वेळी सध्या गाजत असलेल्या समलैंगिक विवाहाच्या मुद्द्यावरही त्यांनी भाष्य केले. 'काही लोकांनी हिंदुत्वाची कल्पना विकृत करण्याचा प्रयत्न केला आहे. खरं तर नव्या पिढीला योग्य इतिहास सांगण्याची गरज आहे,' असे म्हणत RSS तर्फे त्यांनी समलिंगी विवाहाबाबत आपली भूमिका स्पष्ट केली.

RSS ने केंद्र सरकारच्या भूमिकेचे समर्थन केले. "विवाह फक्त स्त्री-पुरुषांमध्येच झाला पाहिजे. ते म्हणाले की, देशाची छबी जागतिक पातळीवर बदलण्याची गरज आहे. काही लोकांनी हिंदुत्वाची कल्पना विकृत करण्याचा प्रयत्न केला आहे. देशाच्या इतिहासाचा विपर्यास करून काही लोकांनी सांगितले आहे. आज आपल्याला योग्य इतिहास सांगण्याची गरज आहे. भारताचा सांस्कृतिक वारसा योग्य पद्धतीने कसा मांडायचा हेही सांगणे तितकेच आवश्यक आहे," असे अतिशय स्पष्ट आणि रोखठोक मत होसबळे यांनी मांडले.

राहुल गांधींना RSSचे सडेतोड प्रत्युत्तर

राहुल गांधींच्या वक्तव्याचाही दत्तात्रय होसबळे यांनी समाचार घेतला. "मला वाटते यावर काहीही बोलणे योग्य नाही. त्यांच्या काँग्रेसच्या पूर्वजांनीही संघाबद्दल बराच अपप्रचार केला आहे. त्यामुळे मला त्याच्याबद्दल एवढेच म्हणायचे आहे की किमान राहुल यांनी तरी आता अधिक जबाबदारीने बोलावे आणि वास्तवाकडे पाहावे. राहुल गांधी म्हणतात लोकशाही धोक्यात आहे. तसे असल्यास, भारतात निवडणुका कशा होत आहेत? निवडणुकीत त्यांच्या पक्षाचे लोकही जिंकत आहेत. राहुल गांधींचा विचार केला तर ते ज्या लोकशाहीबद्दल बोलतात, त्याच लोकशाहीप्रधान भारतात त्यांच्या पक्षाने आणलेल्या आणीबाणीसाठी आजपर्यंत त्यांनी माफी का मागितली नाही?" असे सडेतोड प्रत्युत्तर त्यांनी राहुल गांधींना दिले.

विध्वंसक शक्तींपासून सावध रहा!

कोणाचेही नाव न घेता दत्तात्रय होसाबळे म्हणाले, “काही लोक देश तोडणाऱ्या शक्ती आहेत. त्यांचे ब्रीदवाक्यच ते आहे. अशा घोषणा आता विद्यापीठातूनही दिल्या जात आहेत. सरकार त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करेल आणि त्यासाठी सामंजस्याचे काम संघ करेल, तसेच चर्चाही घडवून आणेल. पण आपण साऱ्यांनी देश तोडणाऱ्या शक्तींपासून सावध राहण्याची गरज आहे."

टॅग्स :LGBTएलजीबीटीRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ