शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

अखंड भारत पाकिस्तानसाठीदेखील चांगला, पण...; मोहन भागवत यांनी केले स्पष्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2021 19:08 IST

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक मोहन भागवत यांनी अखंड भारताच्या आवश्यकेतविषयी पुन्हा एकदा भाष्य केले आहे. एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमावेळी अखंड भारताविषयी मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी आपले विचार व्यक्त केले. भारतापासून वेगळा झालेला पाकिस्तान आताच्या घडीला संकटात आहे. त्यामुळे अखंड भारत पाकिस्तानसाठीही चांगला ठरू शकतो, असा दावा मोहन भागवत यांनी यावेळी बोलताना केला.

ठळक मुद्देअखंड भारताचा मोहन भागवत यांचा पुनरुच्चारअखंड भारत पाकिस्तानसाठी चांगला असल्याचा दावावसुधैव कुटुंबकमच्या माध्यमातून आनंद आणि शांतता शक्य

नवी दिल्ली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक मोहन भागवत यांनी अखंड भारताच्या आवश्यकेतविषयी पुन्हा एकदा भाष्य केले आहे. एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमावेळी अखंड भारताविषयीमोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी आपले विचार व्यक्त केले. भारतापासून वेगळा झालेला पाकिस्तान आताच्या घडीला संकटात आहे. त्यामुळे अखंड भारत पाकिस्तानसाठीही चांगला ठरू शकतो, असा दावा मोहन भागवत यांनी यावेळी बोलताना केला. (rss chief mohan bhagwat speaks on need of akhand bharat again)

अखंड भारत हा जबरदस्तीने किंवा बळाचा वापर करून नाही, तर हिंदू धर्माच्या माध्यमातून करणे अधिक संयुक्तिक ठरेल, असे मोहन भागवत यांनी सांगितले. जगत्कल्याणासाठी गौरवशाली अखंड भारताची आवश्यकता आहे. यासाठी देशभक्ती मोठ्या प्रमाणात जागृत करणे गरजेचे आहे. फाळणी झालेला भारत पुन्हा एकदा अखंड करणे काळाची गरज आहे. जे भारताला आता स्वतःचा भाग मानत नाही, त्यांना तर अधिक गरज आहे, असे मोहन भागवत म्हणाले.

देशभरातून नरेंद्र मोदीची हवा संपली, आता काँग्रेसला अनुकुल वातावरण: नाना पटोले

अखंड भारत आजही शक्य

भारताची फाळणी झाली, त्याच्या सहा महिन्यांपूर्वी असे कधी घडेल, याचा विचार कोणी स्वप्नातही केला नव्हता. फाळणी हे मुर्खांचे स्वप्न आहे, अशी प्रतिक्रिया जवाहरलाल नेहरून यांनी त्यावेळी दिली होती. मात्र, तरीही फाळणी झाली. तेव्हा फाळणी झाली असली, तरी आताच्या घडीला अखंड भारत शक्य आहे, असा दावा मोहन भागवत यांनी यावेळी बोलताना केला. 

वसुधैव कुटुंबकम

गंधार अफगाणिस्तान झाले. त्या क्षेत्रात शांतता नांदत आहे का, असा प्रश्न विचारत भारताची फाळणी करून पाकिस्तानची निर्मिती करण्यात आली. तेथेही शांतता नांदत नाही. भारत अनेक आव्हानांना सामोरा जाण्यास सक्षम आहे. वसुधैव कुटुंबकमच्या माध्यमातून जगात आनंद आणि शांतता प्रस्थापित केली जाऊ शकते, असा विश्वास मोहन भागवत यांनी व्यक्त केला.

टॅग्स :Mohan Bhagwatमोहन भागवतIndiaभारतPakistanपाकिस्तानRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ