शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

अखंड भारत पाकिस्तानसाठीदेखील चांगला, पण...; मोहन भागवत यांनी केले स्पष्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2021 19:08 IST

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक मोहन भागवत यांनी अखंड भारताच्या आवश्यकेतविषयी पुन्हा एकदा भाष्य केले आहे. एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमावेळी अखंड भारताविषयी मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी आपले विचार व्यक्त केले. भारतापासून वेगळा झालेला पाकिस्तान आताच्या घडीला संकटात आहे. त्यामुळे अखंड भारत पाकिस्तानसाठीही चांगला ठरू शकतो, असा दावा मोहन भागवत यांनी यावेळी बोलताना केला.

ठळक मुद्देअखंड भारताचा मोहन भागवत यांचा पुनरुच्चारअखंड भारत पाकिस्तानसाठी चांगला असल्याचा दावावसुधैव कुटुंबकमच्या माध्यमातून आनंद आणि शांतता शक्य

नवी दिल्ली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक मोहन भागवत यांनी अखंड भारताच्या आवश्यकेतविषयी पुन्हा एकदा भाष्य केले आहे. एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमावेळी अखंड भारताविषयीमोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी आपले विचार व्यक्त केले. भारतापासून वेगळा झालेला पाकिस्तान आताच्या घडीला संकटात आहे. त्यामुळे अखंड भारत पाकिस्तानसाठीही चांगला ठरू शकतो, असा दावा मोहन भागवत यांनी यावेळी बोलताना केला. (rss chief mohan bhagwat speaks on need of akhand bharat again)

अखंड भारत हा जबरदस्तीने किंवा बळाचा वापर करून नाही, तर हिंदू धर्माच्या माध्यमातून करणे अधिक संयुक्तिक ठरेल, असे मोहन भागवत यांनी सांगितले. जगत्कल्याणासाठी गौरवशाली अखंड भारताची आवश्यकता आहे. यासाठी देशभक्ती मोठ्या प्रमाणात जागृत करणे गरजेचे आहे. फाळणी झालेला भारत पुन्हा एकदा अखंड करणे काळाची गरज आहे. जे भारताला आता स्वतःचा भाग मानत नाही, त्यांना तर अधिक गरज आहे, असे मोहन भागवत म्हणाले.

देशभरातून नरेंद्र मोदीची हवा संपली, आता काँग्रेसला अनुकुल वातावरण: नाना पटोले

अखंड भारत आजही शक्य

भारताची फाळणी झाली, त्याच्या सहा महिन्यांपूर्वी असे कधी घडेल, याचा विचार कोणी स्वप्नातही केला नव्हता. फाळणी हे मुर्खांचे स्वप्न आहे, अशी प्रतिक्रिया जवाहरलाल नेहरून यांनी त्यावेळी दिली होती. मात्र, तरीही फाळणी झाली. तेव्हा फाळणी झाली असली, तरी आताच्या घडीला अखंड भारत शक्य आहे, असा दावा मोहन भागवत यांनी यावेळी बोलताना केला. 

वसुधैव कुटुंबकम

गंधार अफगाणिस्तान झाले. त्या क्षेत्रात शांतता नांदत आहे का, असा प्रश्न विचारत भारताची फाळणी करून पाकिस्तानची निर्मिती करण्यात आली. तेथेही शांतता नांदत नाही. भारत अनेक आव्हानांना सामोरा जाण्यास सक्षम आहे. वसुधैव कुटुंबकमच्या माध्यमातून जगात आनंद आणि शांतता प्रस्थापित केली जाऊ शकते, असा विश्वास मोहन भागवत यांनी व्यक्त केला.

टॅग्स :Mohan Bhagwatमोहन भागवतIndiaभारतPakistanपाकिस्तानRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ