शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
3
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
4
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
5
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
6
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
7
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
8
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
9
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
10
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
11
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
12
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
13
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
14
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
15
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
16
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?
17
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
18
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
19
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
20
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...

 घटस्फोटाचे प्रमाण सुशिक्षित आणि संपन्न कुटुंबांमध्ये अधिक- मोहन भागवत

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2020 11:01 AM

सरसंघचालक मोहन भागवत यांनी वाढत्या घटस्फोटाच्या प्रकरणांवर मतप्रदर्शन केलं आहे.

अहमदाबाद : सरसंघचालक मोहन भागवत यांनी वाढत्या घटस्फोटाच्या प्रकरणांवर मतप्रदर्शन केलं आहे. घटस्फोटाचे प्रमाण सुशिक्षित आणि संपन्न कुटुंबांमध्ये अधिक असल्याचं भागवतांनी अधोरेखित केलं आहे. शिक्षण आणि संपन्नतेसोबत अहंकारही येतो. त्या कारणास्तव कुटुंबं विभक्त होतात, असं मोहन भागवत म्हणाले आहेत. सरसंघचालक मोहन भागवत रविवारी संघाच्या स्वयंसेवकांशी अहमदाबादमध्ये बोलत होते.घटस्फोटाची प्रकरणे आजकाल मोठ्या प्रमाणात वाढली आहेत. किरकोळ कारणांवरून जोडपी भांडतात. सुशिक्षित आणि संपन्न कुटुंबांमध्ये घटस्फोटाची प्रकरणे अधिक आढळतात. मी हिंदू आहे. सर्वधर्मीय श्रद्धांचा मी आदर करतो, मात्र माझ्या स्वत:च्या श्रद्धास्थानांबाबत मी आग्रही आहे. मला माझ्या कुटुंबाकडून संस्कार मिळाले आहेत आणि मातृशक्ती आम्हाला ते शिकवते, संघातील उपक्रमांबाबत स्वयंसेवकांनी आपल्या कुटुंबीयांनाही सांगावे, अशी आमची अपेक्षा आहे. कारण अनेकदा आपल्या कुटुंबातील महिलांना अधिक वेदनादायी कामं करावी लागतात. आपुलकीची भावना ही समाजाची ओळख आहे.2 हजार वर्षांपासून चालत आलेल्या परंपरेचं पालन करत असल्यानंच समाजात अशी परिस्थिती आहे. आपण महिलांना घरांपर्यंत मर्यादित ठेवलं आहे. अशी स्थिती 2 हजार वर्षांपूर्वी नव्हती. तो आपल्या समाजाचा सुवर्ण काळ आहे. हिंदू समाजानं सदगुणी आणि संघटित झालं पाहिजे. जेव्हा मी समाजासंदर्भात बोलतो तेव्हा फक्त ते पुरुषांसाठी नसतं. मी हिंदू आहे. मी सर्वच धर्मांच्या पवित्र स्थानांचा सन्मान करतो. परंतु मी आपल्या श्रद्धेच्या स्थानाप्रति कटिबद्ध आहे. मला हे संस्कार माझ्या कुटुंबीयांकडून मिळाले आहेत.मला मातृशक्तीनेच हे गुण शिकवले आहेत. कुटुंब आणि महिलेशिवाय समाज पूर्ण होत नाही. जी अर्ध्या समाजाचं नेतृत्व करते आणि त्याला शिक्षित करते. परंतु समाजाची आम्ही चिंता करत नाही. भारताकडे हिंदू समाजाशिवाय कोणताही पर्याय नाही. हिंदू समाजाकडेही परिवारासारखं व्यवहार करण्याशिवाय कोणताही पर्याय नसल्याचंही मोहन भागवतांनी स्पष्ट केलं आहे.  

टॅग्स :Mohan Bhagwatमोहन भागवत