शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

Rabri Devi : "२ दिवसांत २२ हत्या, हे मंगलराज आहे का?"; बिहारमधील गुन्हेगारीवर राबडी देवींचा हल्लाबोल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2025 17:49 IST

Rabri Devi : कायदा आणि सुव्यवस्थेच्या परिस्थितीवरुन माजी मुख्यमंत्री राबडी देवी यांनी नितीश कुमार यांना घेरलं.

बिहारमधील कायदा आणि सुव्यवस्थेच्या परिस्थितीवरुन माजी मुख्यमंत्री राबडी देवी यांनी नितीश कुमार यांना घेरलं. राज्यातील वाढत्या गुन्हेगारी आणि पोलिसांवरील हल्ल्यांवरून जोरदार निशाणा साधला. "नितीश म्हणतात की, हे सुशासनाचं सरकार आहे. कुठे आहे सुशासन? बिहारमध्ये होळी दरम्यान दोन दिवसांत २२ हत्या झाल्या आहेत. इतके पोलीस यापूर्वी कधीही मारले गेले नव्हते."

"बहिणी आणि मुलींवर बलात्कार करून त्यांची हत्या केली जाते. इन्स्पेक्टर आणि कॉन्स्टेबल मारले जात आहेत. मग सामान्य लोकांचं काय होईल? सुरक्षा पुरवणाऱ्यांची हत्या केली जात आहे. हेच मंगलराज आहे का? जंगलराज म्हणतात, जंगलराजमध्ये इन्स्पेक्टर आणि कॉन्स्टेबल मरत नव्हते" असं म्हणत राबडी देवी यांनी टीका केली आहे.

आरजेडीचे आमदार आणि मुख्य सरचिटणीस रणविजय साहू यांनी बिहारमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली. तेजस्वी यांचं सरकार येताच एन्काउंटर पॉलिसी लागू केली जाईल. बिहारमध्ये कायदा आणि सुव्यवस्था ढासळली आहे. नितीश कुमार गृहखाते सांभाळू शकत नाहीत. पोलिसांचे खून होत आहेत. दगडफेक होत आहेत. सामान्य लोक घराबाहेर पडण्यास घाबरत आहेत असं म्हटलं आहे. 

बिहारमधील वाढत्या गुन्हेगारीवरून विरोधी पक्ष सरकारला सभागृहापासून रस्त्यांपर्यंत  प्रत्येक मुद्द्यावर कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत आहे. निवडणुकीमुळे विरोधी पक्ष हा मुद्दा सहजासहजी सोडत नाही. सत्तेत असलेले लोक जंगलराजची आठवण करून देण्याशिवाय दुसरं कोणतेही उत्तर देऊ शकत नाहीत. गेल्या एका आठवड्यात पोलिसांवरील सततचे हल्ले रोखणं ही सरकारसाठी एक मोठी जबाबदारी आहे. मात्र सरकारच्या काही मंत्र्यांनी म्हटलं आहे की, हे सरकारला बदनाम करण्यासाठी विरोधकांचं षड्यंत्र आहे. 

टॅग्स :BiharबिहारCrime Newsगुन्हेगारीNitish Kumarनितीश कुमारPoliticsराजकारणPoliceपोलिस