शहरं
Join us  
Trending Stories
1
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
2
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
3
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
4
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळालयला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
5
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
6
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
7
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
8
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...
9
भारताला वेगळा न्याय? तेल खरेदीवरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!
10
निवृत्त झालेल्या आजोबांना मिळाले ३ कोटी, आनंदात पत्नीला सोडून राहू लागले वेगळे! पण पुढे काय झालं वाचाच...
11
'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला पद..; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान
12
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान
13
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
14
ट्रम्प यांना नक्की हवे तरी काय? व्यापारविषयक टीमचा भारत दौरा लांबला; टॅरिफवरील चर्चा रखडणार!
15
१ वर्षांसाठीच FD करायची आहे? जाणून घ्या कोणत्या बँकेत मिळतोय सर्वाधिक व्याजदर!
16
किश्तवाडनंतर कठुआमध्ये ढगफुटीने प्रचंड नुकसान, ४ जणांचा मृत्यू; रेल्वे ट्रॅक आणि महामार्गाचेही नुकसान
17
ज्योती चांदेकर यांची 'ती' भूमिका अन् बाळासाहेब ठाकरेंनी घेतलेली दखल, कोणता होता तो सिनेमा?
18
“मुंबई महापालिका कुणी लुटली, हे मुंबईच्या जनतेला माहिती आहे”; संजय राऊतांचा पलटवार
19
सोन्याच्या किमतीत मोठी घसरण, खरेदी करण्याची सुवर्णसंधी! २४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमचा नवीन दर काय?
20
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस

Rabri Devi : "२ दिवसांत २२ हत्या, हे मंगलराज आहे का?"; बिहारमधील गुन्हेगारीवर राबडी देवींचा हल्लाबोल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2025 17:49 IST

Rabri Devi : कायदा आणि सुव्यवस्थेच्या परिस्थितीवरुन माजी मुख्यमंत्री राबडी देवी यांनी नितीश कुमार यांना घेरलं.

बिहारमधील कायदा आणि सुव्यवस्थेच्या परिस्थितीवरुन माजी मुख्यमंत्री राबडी देवी यांनी नितीश कुमार यांना घेरलं. राज्यातील वाढत्या गुन्हेगारी आणि पोलिसांवरील हल्ल्यांवरून जोरदार निशाणा साधला. "नितीश म्हणतात की, हे सुशासनाचं सरकार आहे. कुठे आहे सुशासन? बिहारमध्ये होळी दरम्यान दोन दिवसांत २२ हत्या झाल्या आहेत. इतके पोलीस यापूर्वी कधीही मारले गेले नव्हते."

"बहिणी आणि मुलींवर बलात्कार करून त्यांची हत्या केली जाते. इन्स्पेक्टर आणि कॉन्स्टेबल मारले जात आहेत. मग सामान्य लोकांचं काय होईल? सुरक्षा पुरवणाऱ्यांची हत्या केली जात आहे. हेच मंगलराज आहे का? जंगलराज म्हणतात, जंगलराजमध्ये इन्स्पेक्टर आणि कॉन्स्टेबल मरत नव्हते" असं म्हणत राबडी देवी यांनी टीका केली आहे.

आरजेडीचे आमदार आणि मुख्य सरचिटणीस रणविजय साहू यांनी बिहारमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली. तेजस्वी यांचं सरकार येताच एन्काउंटर पॉलिसी लागू केली जाईल. बिहारमध्ये कायदा आणि सुव्यवस्था ढासळली आहे. नितीश कुमार गृहखाते सांभाळू शकत नाहीत. पोलिसांचे खून होत आहेत. दगडफेक होत आहेत. सामान्य लोक घराबाहेर पडण्यास घाबरत आहेत असं म्हटलं आहे. 

बिहारमधील वाढत्या गुन्हेगारीवरून विरोधी पक्ष सरकारला सभागृहापासून रस्त्यांपर्यंत  प्रत्येक मुद्द्यावर कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत आहे. निवडणुकीमुळे विरोधी पक्ष हा मुद्दा सहजासहजी सोडत नाही. सत्तेत असलेले लोक जंगलराजची आठवण करून देण्याशिवाय दुसरं कोणतेही उत्तर देऊ शकत नाहीत. गेल्या एका आठवड्यात पोलिसांवरील सततचे हल्ले रोखणं ही सरकारसाठी एक मोठी जबाबदारी आहे. मात्र सरकारच्या काही मंत्र्यांनी म्हटलं आहे की, हे सरकारला बदनाम करण्यासाठी विरोधकांचं षड्यंत्र आहे. 

टॅग्स :BiharबिहारCrime Newsगुन्हेगारीNitish Kumarनितीश कुमारPoliticsराजकारणPoliceपोलिस