शहरं
Join us  
Trending Stories
1
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
2
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
3
रेपो रेट कपातीनंतरही FD वर बंपर रिटर्न! SBI मध्ये २ लाख जमा करून मिळेल ८३,६५२ रुपये निश्चित व्याज
4
टेक इंडस्ट्री हादरली! AI मुळे २०२५ मध्ये १.२० लाख नोकऱ्या संपुष्टात; कर्मचारी कपातीत कोणती कंपनी पुढे?
5
डाव्यांच्या गडाला हादरे! माजी आयपीएस आर. श्रीलेखा तिरुवनंतपुरमच्या महापौर होण्याची शक्यता, केरळमध्ये भाजपला मोठे यश  
6
इंडिगोचे संकट वाढले! ८२९ प्रवासी सामुहिक खटला दाखल करणार, एअरलाईन्सवर नामुष्की...
7
मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे यांचे संघस्थानी नमन, अजित पवार गटासह काही आमदार-मंत्र्यांची मात्र दांडी
8
हवा बिघडली अन् वारे फिरले; धुराने कोंडला मुंबईकरांचा श्वास! धूळ, धुके, धुराच्या संयुक्त मिश्रणाने प्रदूषणात वाढ
9
'१९ डिसेंबरला देशात सर्वात मोठा राजकीय भूकंप होणार, भारताचा पंतप्रधान मराठी माणूस बनणार', पृथ्वीराज चव्हाणांचे भाकीत!
10
जॉन सीनाने शेवटचा सामना 'मुद्दाम' गमावला? गुंथरकडून पराभव, रिंगला किस करून घेतला WWE चा निरोप...
11
काँग्रेसचं पुनरागमन, भाजपाचा चंचुप्रवेश आणि डाव्यांना धक्का, केरळमधील राजकीय हवा बदलतेय?
12
'या' छोट्या देशाचा चीन-भारतासारख्या बलाढ्या देशांना धोबीपछाड! फंड उभारण्यात आशियात १ नंबरला
13
सुदानमध्ये संयुक्त राष्ट्राच्या तळावर क्रूर ड्रोन हल्ला; ६ बांगलादेशी पीसकीपर्स ठार, ८ गंभीर जखमी; युनो महासचिवकडून तीव्र निषेध
14
जॅकपॉट अन् खजिना...! महाराष्ट्राच्या शेजारील राज्यात सापडले सोने, लिथिअम आयनचे साठे; खोऱ्याने पैसा ओढणार...
15
तारीख ठरली, वेळ बदलली? 'या' दिवशी सुरु होणार 'बिग बॉस मराठी ६'; पाहा प्रोमो
16
चोरी केल्यानंतर ते शिर्डी गाठायचे, साईबाबांच्या चरणी 'दान' ठेवायचे! काळाचौकी पोलिसांची २४ तासांत कारवाई; दोन तरुण चोर जेरबंद
17
खोकला, घशात खवखव; मुंबईकरांचे आरोग्य बिघडले; वातावरणातील बदलामुळे रुग्ण संख्येत मोठी वाढ
18
गायत्री दातारच्या आयुष्यात हिरोची एन्ट्री! अभिनेत्रीने गुपचूप केला साखरपुडा, फोटो समोर
19
वर्सोवा-भाईंदर कोस्टल प्रकल्पासाठी ४५ हजार खारफुटी तोडणार; हायकोर्टाचा हिरवा झेंडा
20
अमेरिकेतील ब्राउन युनिव्हर्सिटीत अंतिम परीक्षांदरम्यान गोळीबार; २ मृत, ८ गंभीर जखमी, हल्लेखोर पसार
Daily Top 2Weekly Top 5

Rabri Devi : "२ दिवसांत २२ हत्या, हे मंगलराज आहे का?"; बिहारमधील गुन्हेगारीवर राबडी देवींचा हल्लाबोल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2025 17:49 IST

Rabri Devi : कायदा आणि सुव्यवस्थेच्या परिस्थितीवरुन माजी मुख्यमंत्री राबडी देवी यांनी नितीश कुमार यांना घेरलं.

बिहारमधील कायदा आणि सुव्यवस्थेच्या परिस्थितीवरुन माजी मुख्यमंत्री राबडी देवी यांनी नितीश कुमार यांना घेरलं. राज्यातील वाढत्या गुन्हेगारी आणि पोलिसांवरील हल्ल्यांवरून जोरदार निशाणा साधला. "नितीश म्हणतात की, हे सुशासनाचं सरकार आहे. कुठे आहे सुशासन? बिहारमध्ये होळी दरम्यान दोन दिवसांत २२ हत्या झाल्या आहेत. इतके पोलीस यापूर्वी कधीही मारले गेले नव्हते."

"बहिणी आणि मुलींवर बलात्कार करून त्यांची हत्या केली जाते. इन्स्पेक्टर आणि कॉन्स्टेबल मारले जात आहेत. मग सामान्य लोकांचं काय होईल? सुरक्षा पुरवणाऱ्यांची हत्या केली जात आहे. हेच मंगलराज आहे का? जंगलराज म्हणतात, जंगलराजमध्ये इन्स्पेक्टर आणि कॉन्स्टेबल मरत नव्हते" असं म्हणत राबडी देवी यांनी टीका केली आहे.

आरजेडीचे आमदार आणि मुख्य सरचिटणीस रणविजय साहू यांनी बिहारमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली. तेजस्वी यांचं सरकार येताच एन्काउंटर पॉलिसी लागू केली जाईल. बिहारमध्ये कायदा आणि सुव्यवस्था ढासळली आहे. नितीश कुमार गृहखाते सांभाळू शकत नाहीत. पोलिसांचे खून होत आहेत. दगडफेक होत आहेत. सामान्य लोक घराबाहेर पडण्यास घाबरत आहेत असं म्हटलं आहे. 

बिहारमधील वाढत्या गुन्हेगारीवरून विरोधी पक्ष सरकारला सभागृहापासून रस्त्यांपर्यंत  प्रत्येक मुद्द्यावर कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत आहे. निवडणुकीमुळे विरोधी पक्ष हा मुद्दा सहजासहजी सोडत नाही. सत्तेत असलेले लोक जंगलराजची आठवण करून देण्याशिवाय दुसरं कोणतेही उत्तर देऊ शकत नाहीत. गेल्या एका आठवड्यात पोलिसांवरील सततचे हल्ले रोखणं ही सरकारसाठी एक मोठी जबाबदारी आहे. मात्र सरकारच्या काही मंत्र्यांनी म्हटलं आहे की, हे सरकारला बदनाम करण्यासाठी विरोधकांचं षड्यंत्र आहे. 

टॅग्स :BiharबिहारCrime Newsगुन्हेगारीNitish Kumarनितीश कुमारPoliticsराजकारणPoliceपोलिस