शहरं
Join us  
Trending Stories
1
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
2
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
3
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
4
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
5
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
6
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
7
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
8
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
9
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
10
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
11
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
12
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
13
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
14
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
15
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
16
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
17
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
18
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
19
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
20
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा

पूरग्रस्त केरळमध्ये नद्या, विहिरी कोरड्याठाक

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2018 4:25 AM

पूरग्रस्त केरळमध्ये ऊन तापत असून, नद्या आणि विहिरी अपवादात्मकरीत्या कोरड्या पडल्या असल्यामुळे राज्य सरकारने या घटनांचा शास्त्रीय अभ्यास करण्याचा निर्णय घेतला आहे.

तिरुअनंतपुरम : पूरग्रस्त केरळमध्ये ऊन तापत असून, नद्या आणि विहिरी अपवादात्मकरीत्या कोरड्या पडल्या असल्यामुळे राज्य सरकारने या घटनांचा शास्त्रीय अभ्यास करण्याचा निर्णय घेतला आहे.मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी राज्याच्या विज्ञान, तंत्रज्ञान आणि पर्यावरण परिषदेला हा अभ्यास करण्याचा आदेश दिला आहे. परिषदेने या प्रश्नावर उत्तरेही सुचवावीत, असेही विजयन यांनी सांगितले आहे. तापमान वाढत असून, नद्यांच्या पाण्याची पातळी खाली गेली असून, झपाट्याने विहिरी कोरड्या पडल्या आहेत व जमिनीतील पाण्याची पातळी खालावली आहे, तसेच गांडूळ मोठ्या प्रमाणात नष्ट झाले आहेत. या सगळ्या घटना केरळमध्ये गेल्या महिन्यात विध्वंसकारक ठरलेल्या पुराच्या परिस्थितीनंतर राज्याच्या वेगवेगळ्या भागांत काळजीच्या ठरल्या आहेत. पुराने वायनाड जिल्ह्याला मोठा फटका बसला. हा जिल्हा जैवविविधतेसाठी प्रसिद्ध आहे. या जिल्ह्यात गांडूळ फार मोठ्या संख्येत नष्ट झाले असल्यामुळे शेतकऱ्यांना मोठी काळजी वाटत आहे. जमीन वेगाने कोरडी पडल्यामुळे व जमिनीच्या रचनेत बदल झाल्याचा परिणाम गांडूळ नष्ट होण्यात झाल्याचे शेतकºयांचे म्हणणे आहे.>तज्ज्ञांनी केले दुष्काळाचे भाकीतपेरियार, भारतपुझ्झा, पॅम्पा आणि कबानीसह अनेक नद्या कोरड्या पडत आहेत. अनेक जिल्ह्यांत विहिरी कोरड्या पडून कोसळत आहेत. राज्यात पुराने अनेक भागांत त्यांच्या स्वाभाविक रचनेत बदल घडवला व इडुक्की आणि वायानंदच्या विशेषत: डोंगराळ भागात एकेक किलोमीटर लांबीच्या भेगा पडल्या आहेत. याच जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर दरडीही कोसळल्या आहेत. पुरानंतर राज्याच्या दक्षिण भागातील अनेक जिल्ह्यांत तज्ज्ञांनी दुष्काळी परिस्थितीचे भाकीत केले आहे.

टॅग्स :KeralaकेरळKerala Floodsकेरळ पूर