शहरं
Join us  
Trending Stories
1
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
2
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
3
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
4
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
5
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
6
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
7
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं
8
IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
9
कोस्टल रोडवर पुन्हा अपघात; कारच्या धडकेत दोघे जखमी
10
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
11
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
12
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
13
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न
14
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
15
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
16
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
17
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
18
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
19
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
20
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट

गोपनीयतेचा हक्क बहाल! नवा मूलभूत अधिकार, सुप्रीम कोर्टाकडून ऐतिहासिक देणगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2017 04:10 IST

सर्वोच्च न्यायालयाने १३४ कोटी भारतीय नागरिकांना गोपनीयतेचा मूलभूत हक्क बहाल करून राज्यघटनेतील व्यक्तिगत स्वातंत्र्याच्या ग्वाहीची व्याप्ती गुरुवारी आणखी वाढविली.

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने १३४ कोटी भारतीय नागरिकांना गोपनीयतेचा मूलभूत हक्क बहाल करून राज्यघटनेतील व्यक्तिगत स्वातंत्र्याच्या ग्वाहीची व्याप्ती गुरुवारी आणखी वाढविली. सरकार आणि विरोधक यांच्यातील आरोप-प्रत्यारोप बाजूला ठेवले तर देशाच्या सर्व थरांतून या ऐतिहासिक निकालाचे स्वागत केले गेले.जगण्याचा आणि व्यक्तिस्वातंत्र्याचा अधिकार भारतीय राज्यघटनेने नव्याने तयार केलेला नाही. राज्यघटनेने मानवी जीवनाच्या या अंगभूत व अविभाज्य स्थायी मूल्यांना हक्कांच्या स्वरूपात मान्यता दिलेली आहे. गोपनीयता हा राज्यघटनेस अभिप्रेत असलेल्या मानवी प्रतिष्ठेचा गाभा असल्याने तोदेखील नागरिकांचा घटनादत्त अधिकार ठरतो, असे न्यायालयाने नि:संदिग्धपणे जाहीर केले. सरन्यायाधीश न्या. जगदीश सिंग खेहर यांच्या नेतृत्वाखालील नऊ न्यायाधीशांच्या विशेष घटनापीठाने हा एकमताचा निकाल दिला.व्यक्तिगत जीवनातील गोपनीयतेचा नागरिकांचा हा हक्क अन्य मूलभूत हक्कांप्रमाणेच अनिर्बंध नाही. सरकार या अधिकाराचा संकोच करणारा कायदा जरूर करू शकेल. मात्र अशा कायद्याला रास्त गरज, वाजवीपणा आणि निकड व उपायांचा अन्योन्य संबंध या तिहेरी कसोटीवर उतरावे लागेल, असे न्यायालयाने नमूद केले.न्यायालयाने म्हटले की, व्यक्ती समाजात वावरताना तिची गोपनीयता हरवून बसते असे नाही. सार्वजनिक जीवनातही व्यक्तीशी तिची गोपनीयता निगडित राहते, कारण ती मानवी प्रतिष्ठेचा अविभाज्य भाग आहे. राज्यघटना ज्या काळात तयार केली गेली, त्या काळातील दृष्टीकोनापुरतीच ती गोठवून ठेवता येणार नाही. सात दशकांपूर्वी राज्यघटना तयार होताना जाणवल्या नव्हत्या, अशा अनेक गोष्टी आज झपाट्याने बदलणाºया तंत्रज्ञानामुळे समाजात जाणवत आहेत. त्यामुळे बदलत्या काळाची गरज लक्षात घेऊन राज्यघटनेतील आधारभूत मूल्यांचा अर्थ लावणे गरजेचे आहे. कर्नाटक उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश न्या. के. एस. पुट्टास्वामी, बालहक्क आयोगाच्या पहिल्या अध्यक्षा व मेगॅसेसे पुरस्कार विजेत्या शांता सिन्हा, स्त्रीवादी समाजशास्त्रज्ञ कल्याणी सेन मेनन यांच्यासह इतरांनी ‘आधार’ सक्तीला आव्हान देण्यासाठी केलेल्या याचिकांवरील सुनावणीतून आजचा हा निकाल झाला.गोपनीयता हा मुलभूत हक्क नाही. आठ व सहा न्यायाधीशांच्या न्यायपीठांनी तसे निकाल दिलेले आहेत, त्यामुळे ‘आधार’ला त्या आधारे आव्हान दिले जाऊ शकत नाही, अशी भूमिका सरकारने घेतली. गोपनीयता हा मुलभूत हक्क आहे की नाही, एवढ्याच मुद्द्याच्या निर्णायक निकालासाठी नऊ न्यायाधीशांचे विशेष घटनापीठ नेमले गेले.‘आधार’ला मिळेल आधारहा निकाल ‘आधार’शी थेट संबंधित नसला तरी आता ‘आधार’ सक्तीच्या वैधतेचा निकाल या निर्णयाच्या आधारे होईल.लोकांना विविध सरकारी योजनांच्या लाभांसाठी किंवा अन्य कामांसाठी त्यांच्या बोटांचे ठसे किंवा डोळ्यांच्या बाहुल्यांचे स्कॅन देण्याची सक्ती करणे हा त्यांच्या गोपनीयतेच्या मूलभूत हक्कांवर घाला नाही, हे पटवून देता आले तरच ‘आधार’ची सक्ती न्यायालयातटिकेल.निकालाचे महत्त्वआजच्या इंटरनेट आणि डिजिटल युगात व्यक्तीचे खासगी आयुष्यही सर्वार्थाने खासगी राहिले नसल्याने हा निकाल प्रत्येक नागरिकाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे.माझे खासगी आयुष्य मला हवे तसे जगू द्या, असे सरकारला आणि इतरांनाही ठणकावून सांगण्याचा हक्क त्यामुळे नागरिकांना मिळेल.तसेच यात कोणी अवास्तव ढवळाढवळ केल्यास त्याविरुद्ध न्यायालयात त्यास दादही मागता येईल.आधीचे दोन निकाल रद्द : या ताज्या निकालाने न्यायालयाने खडक सिंग वि. उ. प्र. सरकार (डिसेंबर १९६२) व एम. पी. शर्मा वि. सतीश चंद्र (मार्च १९५४) हे अनुक्रमे सहा व आठ न्यायाधीशांनी दिलेले निकाल चुकीचे ठरविले.त्यानंतर गोविंद वि. मध्य प्रदेश सरकार (सन १९७५), आर. राजगोपाल वि. तमिळनाडू सरकार (१९९४) आणि पीपल्स युनियन फॉर सिव्हिल लिबर्टिज् वि. भारत सरकार (१९९७) हे कमी संख्येच्या न्यायाधीशांनी दिलेले निकाल योग्य ठरले.५४७ पानी निकालपत्र : न्यायालयाचा हा निकाल एकमताचा असला तरी त्यासाठी एकूण ५४७ पानांची सहा निकालपत्रे दिली गेली. सर्वात सविस्तर व २६६ पानी मूळ निकालपत्र सरन्यायाधीश न्या. खेहर, न्या. आर. के. अगरवाल, न्या. डॉ. धनंजय चंद्रचूड व न्या. एस. अब्दुल नझीर यांनी दिले. न्या. जस्ती चेलमेश्वर (४४ पानी), न्या. अभय मनोहर सप्रे (२४),न्या. रोहिंग्टन नरिमन (१२२ ), न्या. शरद बोबडे (४०) व न्या. संजय कृष्ण कौल (४७) या पाच न्यायाधीशांनी स्वतंत्र पण सहमतीची निकालपत्रे लिहिली.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय