शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
7
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
8
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
9
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
10
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
11
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
12
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
13
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
14
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
15
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
16
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
17
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
18
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
19
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
20
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!

शेतकरी आंदोलनामुळे पंजाब- हरियाणा सीमेवर 'तांदुळ कोंडी'; आवक थांबल्याने बासमतीचे दर वाढले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2021 13:23 IST

बासमती तांदळाला देशाबरोबर आंतराष्ट्रीय बाजारातूनही मोठ्या प्रमाणावर मागणी

ठळक मुद्देगेल्या एप्रिल महिन्यापासून नोव्हेंबर अखेरपर्यंत सुमारे ३१ लाख टन बासमती तांदळाची निर्यात

पुणे : केंद्र शासनाच्या नवीन कृषी कायद्यांच्या विरोधात गेल्या एक महिन्यांपासून  पंजाब हरियाणा सीमेवर शेतक-यांचे आंदोलन सुरू आहे. या किसान आंदोलनाचा फटका बासमती तांदळाला बसला आहे. सीमा बंद असल्याने या तांदळाच्या होणाऱ्या वाहतूकीला अडथळे निर्माण झाले आहेत. परिणामी मागणी इतका तांदूळ उपलब्ध होत नसल्याने बासमती तांदळाच्या दरात क्विंटला सरासरी १००० रुपयांनी वाढ झाली आहे. 

गेल्या काही वर्षांच्या तुलनेत यंदा बासमती तांदळाचे उत्पादन चांगले आहे.  उत्पादन चांगले असले तरी शेतकरी आंदोलनाचा फटका या तांदळाला बसला आहे. आंदोलन संपल्यानंतरच बासमती तांदूळ देशातील विविध बाजारपेठांत आवश्‍यक त्या प्रमाणात पोचू शकणार असल्याचे माहिती तांदळाचे व्यापारी राजेश शहा यांनी सांगितले. यंदाचा हंगाम १५ नोव्हेंबरला सुरु झाला. हंगाम सुरु झाल्यानंतर काहीच दिवसांनी सदर आंदोलन सुरु झाले. त्यामुळे उत्तरेकडील राज्यांमधून होणारी तांदळाची वाहतूक विस्कळीत झाली. राइस मिल धारकांनीही धोका पत्कारून तांदळाची वाहतूक करण्यास नकारघंटा दिल्याने पुरेशा प्रमाणात बासमती व त्याचे सर्व उपप्रकार मिळणे अशक्‍य बनले आहे.

बासमती तांदळाला देशाबरोबर आंतराष्ट्रीय बाजारातूनही मोठ्या प्रमाणावर मागणी असते. हल्ली गेल्या काही वर्षापासून पारंपारिक बासमती तांदूळ घेण्याचे प्रमाण घटत चालले आहे. त्या ऐवजी स्टीम बासमती तांदळाचे प्रकार जसे; ११२१, १५०९, १४०१, शेला बासमती आदि प्रकारांना मागणी वाढत चालली आहे. या तांदळाची लांबी पारंपारिकपेक्षा जास्त असल्यामुळे हॉटेल, केटरिंग सारखे व्यावसायिकही यांकडे आकर्षित झालेले आहेत. 

यंदाचा हंगाम गेल्या वर्षीपेक्षा कमी दराने सुरु झाला. १५ नोव्हेंबरला सिजनच्या सुरुवातीला ११२१ बासमती तांदळाचे दर जागेवर ६००० ते ६५०० रुपयांपर्यंत होता. आता त्यात १००० रुपये  प्रति क्विंटल इतकी वाढ होऊन सध्या ते ७००० ते ७५०० रुपये प्रति क्विंटल आहेत. तर पारंपरिक बासमती तांदळाचे दर सिजनच्या सुरुवातीला ९००० रुपये प्रति क्विंटल जागेवर निघाले होते आता त्यात प्रति क्विंटलला १००० रुपये वाढ होऊन ते १०००० रुपये प्रति क्विंटल असे आहेत. यामुळे स्थानिक बाजारातही पारंपरिक बासमती, ११२१ बासमती व इतर बासमती मध्ये सुद्धा ८०० ते १००० रुपये प्रति क्विंटल ने वाढ झाली आहे.  

बासमती तांदळाचा भारत हा प्रमुख निर्यातदार देश आहे. गेल्या एप्रिल महिन्यापासून नोव्हेंबर अखेरपर्यंत सुमारे ३१ लाख टन बासमती तांदळाची निर्यात झाली असून त्याचे मुल्य रुपयांमध्ये २० हजार कोटी इतके आहे. यंदा बासमतीची निर्यात चांगली म्हणजे ४५ लाख टन अथवा त्याहूनही जास्त होवू शकेल आणि त्याचे रुपयांमध्ये मुल्य ३० ते ३१ हजार कोटी रु. इतके असेल असेही त्यांनी सांगितले.यंदा बासमतीचे पिक चांगले आहे. पंजाब हरियाणा सीमेवर सुरु झालेल्या किसान आंदोलनामुळे खरेदी विक्री प्रक्रियेत अडथळे निर्माण होत आहेत. यामुळे दरात वाढ झाली आहे. यंदाच्या हंगामाचा आढावा घेतल्यास यंदा निर्यातही चांगली होइल. नॉन बासमतीप्रमाणे बासमती तांदळालाही चांगली मागणी असल्याचे शहा यांनी सांगितले.

टॅग्स :Puneपुणेcorona virusकोरोना वायरस बातम्याFarmerशेतकरीagitationआंदोलन