शहरं
Join us  
Trending Stories
1
झेलेन्स्की यांना बोलावले, पुतिन यांच्याशीही पुन्हा चर्चा करणार; अलास्का बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची नवी तयारी
2
Trump Putin: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना दिलं पत्नी मेलानिया यांचं पत्र; 'त्या' पत्रात काय लिहिलंय?
3
५ हजारांपासून ४० हजार कोटींपर्यंतचा प्रवास: 'बिग बुल' राकेश झुनझुनवालांना उगाचचं नाही म्हणत दलाल स्ट्रीटचे जादूगार
4
आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ लावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकून वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!
5
'विरोधकांची विकास विरोधी हंडी जनतेने फोडली'; उपमुख्यमंत्री शिंदेंचा महाविकास आघाडीवर हल्ला
6
‘बंगाल फाइल्स’चा ट्रेलर लॉन्च होताच कोलकात्यात वाद, बोलवावे लागले पोलीस, विवेक अग्निहोत्री म्हणाले...  
7
Shravan Somvar 2025: इच्छित मनोकामनापूर्तीसाठी शेवटच्या श्रावणी सोमवारी चुकवू नका 'हा' उपाय!
8
'वाळवा तालुका स्वाभिमानी, सहजासहजी वाकत नाही, लढाई शेवटपर्यंत...', जयंत पाटलांचा अजितदादांसमोर टोला
9
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
10
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; कॅश पासून फ्री चेकबुकपर्यंतचे नियम बदलले, जाणून घ्या
11
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
12
गणेशोत्सव २०२५: यंदा श्रीगणेश चतुर्थीचा शुभ मुहूर्त कधी? पाहा, महत्त्व अन् काही मान्यता
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
14
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
15
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!
16
प्रेमात पडले, लग्न केलं, पण आता गायब झाली पत्नी, प्रेमविवाह ठरला रहस्य, नेमका प्रकार काय?  
17
५० टक्के ट्रम्प टॅरिफवर RSS नेते थेट बोलले; म्हणाले, “राष्ट्रहित समोर ठेवून भारताचे निर्णय”
18
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
19
Asia Cup 2025 : संजू अन् रिंकू आउट! आशिया कपसाठी भज्जीनं दिली केएल राहुलसह रियानला पसंती
20
Gopal Kala 2025: देवकीने जन्म दिला, तरी मातृसौख्य यशोदेला; कोणत्या हिशोबाची कृष्णाने केली परतफेड?

(सुधारित) खासगी कंपन्यांमुळे बालचित्रवाणीला फास

By admin | Updated: August 12, 2015 00:35 IST

(बायलाईन दिली आहे)

(बायलाईन दिली आहे)
----------------------

सरकारचे दुर्लक्ष : आधुनिक उपकरणे पडली धूळ खात

राजू इनामदार
पुुणे : उत्तमोत्तम दृकश्राव्य कार्यक्रमांमुळे एकेकाळी शालेय विद्यार्थ्यांच्या भावजीवनाचा अविभाज्य भाग झालेली बालचित्रवाणी संस्था सरकारच्या दुर्लक्षामुळे अखेरच्या घटका मोजत आहे. खासगी कंपन्या, आधुनिक शैक्षणिक साहित्य तयार करून त्याद्वारे लाखो रुपयांचा नफा कमवत असताना बालचित्रवाणी मात्र आर्थिक मदतीअभावी मरणपंथाला लागली आहे.
रंग उडालेली इमारत, धूळ खात पडलेली यंत्रसामग्री, कळा गेलेली कार्यालये व गेल्या कित्येक महिन्यांत उघडला न गेलेला स्टुडिओ अशी बालचित्रवाणीची सध्याची अवस्था आहे. कुसमाग्रज, शांता शेळके, वसंत बापट, राम शेवाळकर यांच्यासह अनेक साहित्यिकांनी विद्यार्थ्यांसमोर जेथे आपली जडणघडण उलगडली. विद्यार्थी अभ्यासत असलेल्या त्यांच्या कथा, कविता त्यांना कशा सुचल्या, कशा लिहिल्या याबाबत सहहृदयतेने भावना मांडल्या, त्या स्टुडिओला आता कोणीही वाली उरलेला नाही. परिस्थिती अशीच राहिली तर काही महिन्यांतच बालचित्रवाणी शेवटचा श्वास घेईल की काय, अशी भीती व्यक्त होत आहे.
केंद्र सरकारच्या कल्पनेतून १९८४ मध्ये बालचित्रवाणीची स्थापना झाली. उपग्रह व अन्य आधुनिक साधनांच्या साहाय्याने शालेय विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या अभ्यासक्रमावर आधारीत दृकश्राव्य कार्यक्रम तयार करणे, शिक्षकांचे आधुनिक साधनांच्या साहाय्याने प्रशिक्षण घ्यायचे व त्यातून मुलांना विषय समजणे सोपे जाईल, त्यांच्या गुणवत्तेत वाढ होईल, असा उद्देश संस्था स्थापनेमागे होता. राज्य सरकारने संस्थेसाठी पुण्यात बालभारतीच्या समोरची ५ एकर जागा दिली. लेखन, दिग्दर्शन, चित्रिकरण, कॅमेरा, ध्वनीमुद्रण असे तांत्रिक ज्ञान असणार्‍या कर्मचार्‍यांसह तब्बल १२० पदांची निर्मिती केली.
शैक्षणिक साहित्याच्या बाजारपेठेत अनेक खासगी कंपन्यांही येत होत्या. त्यांना बाजारपेठेत मिळत असताना बालचित्रवाणीच्या साहित्याचा त्यांच्या व्यवसायात मोठाच अडथळा येत होता, असे बोलले जाते. संबंधित कंपन्यांचा सरकारवर असलेल्या प्रभावातूनच बालचित्रवाणीला नख लावण्याचे कारस्थान सुरू झाल्याचे शैक्षणिक क्षेत्रात बोलले जाते. त्याचीच परिणती म्हणून राज्य सरकारने केंद्र सरकारबरोबर झालेल्या करारातील कलमे धुडकावण्यास सुरूवात केल्याचे शिक्षण तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
करारानुसार केंद्र सरकार सुरुवातीची फक्त ५ वर्षे बालचित्रवाणीाची जबाबदारी स्वीकारणार होते, नंतर ती राज्य सरकारने घ्यायची होती. त्याप्रमाणे ५ वर्षे पूर्ण झाल्यानंतर केंद्राने राज्याला तसे सुचवले. मात्र राज्य सरकारने आर्थिक स्थिती चांगली नसल्यामुळे जबाबदारी स्वीकारणे शक्य नसल्याचे कळवले. केंद्राने ते मान्य केले व सन २००२ पर्यंत कर्मचार्‍यांच्या वेतनासह सर्व जबाबदारी घेतली. त्यानंतर सर्वच स्तरावर संस्थेची गळचेपी पुन्हा सुरू झाली.
-------------