शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

मायदेशात परतले! ४७१ भारतीयांना घेऊन इस्रायलहून पहाटेच तिसरे आणि चौथे विमान भारतात पोहोचले

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2023 07:53 IST

इस्रायलमधून बाहेर काढण्यात आलेल्या भारतीय नागरिकांचे दिल्लीतील विमानतळावर केंद्रीय मंत्री कौशल किशोर यांनी स्वागत केले.

इस्रायल-हमास संघर्षात इस्रायल सोडू इच्छिणाऱ्या १९७ भारतीय नागरिकांची तिसरे विमान शनिवारी एका विशेष विमानाने मायदेशी पोहोचली. तर चौथे विमान २७४ भारतीयांना घेऊन पोहोचले. इस्रायलमधून बाहेर काढण्यात आलेल्या भारतीय नागरिकांचे दिल्लीतील विमानतळावर केंद्रीय मंत्री कौशल किशोर यांनी स्वागत केले. भारतीय नागरिकांचा हा गट भारतीय वेळेनुसार रात्री ८.१० वाजता इस्रायलहून निघाला. हे प्रवासी रात्री दोन वाजण्याच्या सुमारास दिल्लीला पोहोचला. या दोन्ही विमानातून एकून ४७१ भारतीय प्रवासी दिल्लीत पोहोचले. 

गाझाचे पाणी संपले! २० लाख लाेक संकटात; इस्रायलच्या रणगाड्यांची सीमेवर जमवाजमव

इस्रायलच्या शहरांवर हमासच्या दहशतवाद्यांनी केलेल्या भीषण हल्ल्यानंतर निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेऊन गाझामधून मायदेशी परतू इच्छिणाऱ्या भारतीय नागरिकांना १२ ऑक्टोबर रोजी 'ऑपरेशन अजय' अंतर्गत विशेष उड्डाणे सुरू करण्यात आली होती. या हल्ल्यांमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

यापूर्वी, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी 'एक्स' वर पोस्ट केले होते की, "ऑपरेशन अजय प्रगतीपथावर आहे. आणखी १९७ प्रवासी भारतात परतत आहेत. शनिवारी बेन गुरियन विमानतळावरून दोन विशेष उड्डाणे सुरू होतील, असे भारतीय दूतावासाने सांगितले होते. पहिले विमान स्थानिक वेळेनुसार संध्याकाळी ५:४० वाजता निघाले. दुसरे फ्लाइट स्थानिक वेळेनुसार रात्री ११:०० वाजता नियोजित आहे आणि ३३० प्रवाशांना घेऊन जाऊ शकते.

दरम्यान, इस्रायलमधील भारतीय दूतावासाने 'एक्स' वर एख पोस्ट केली यात लिहिले, "जे भारतीय नागरिक अजूनही इस्रायलमध्ये आहेत आणि 'ऑपरेशन अजय'चा भाग म्हणून भारतात जाऊ इच्छितात त्यांनी त्वरीत फॉर्म भरावा."  भारतीय दूतावासाने मार्गदर्शक तत्त्वे देखील जारी केली, त्यात म्हटले आहे की, "प्रवाशांची 'प्रथम येणाऱ्यास प्राधान्य' या तत्त्वावर 'ऑपरेशन अजय' मध्ये जागेसाठी निवड केली जाईल." मात्र, सीट निश्चित झाल्यानंतर तुम्ही प्रवासास नकार दिल्यास, तुमचे नाव यादीच्या शेवटी टाकले जाईल.

टॅग्स :Israel-Hamas warइस्रायल - हमास युद्धIndiaभारत