शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
2
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
3
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
4
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
5
‘मी स्नेहाची हत्या केलेली नाही…’, पँटवर लिहून प्रियकरानं संपवलं जीवन, पोलिसांवर गंभीर आरोप
6
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
7
क्रिश का गाना सुनेगा..? अचानक २० वर्षांनी रंगली तुफान चर्चा, 'ले बेटा' वाला Video Viral
8
श्रीमंत व्हायचंय? 'रिच डॅड पुअर डॅड'च्या लेखकाचा गुंतवणुकीचा नवा 'मंत्र', चांदी विषयी केलं मोठं भाकित
9
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
10
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
11
“महानगरपालिकांमध्ये ‘वंचित’बरोबर आघाडी करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न सुरू”: हर्षवर्धन सपकाळ
12
नवीन वर्षात करा नवीन भाषा शिकण्याचा संकल्प, मिळेल आयुष्याला कलाटणी; पाहा सोप्या टिप्स
13
३१ डिसेंबरला अयोध्येतील राम मंदिर खरोखरच बंद राहणार का? महत्त्वाची माहिती आली समोर
14
विधानसभेला संधी हुकली कृष्णराज महाडिक आता महापालिका निवडणूक लढवणार, प्रभागही ठरला!
15
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये मविआ-मनसेतील ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
16
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
17
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
18
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
19
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
20
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
Daily Top 2Weekly Top 5

त्या प्रवाशांचे पैसे परत करा, पृथ्वीराज चव्हाण यांचं केंद्रीयमंत्र्यांना पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2020 10:16 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अचानक २४ मार्चपासून देशात लॉकडाउन होणार असल्याची घोषणा केली अन् देशात सर्वत्र शट डाउन झाले.

मुंबई - कोरोना महामारीमुळे देशात तब्बल ५६ दिवसांचा कडेकोट लॉकडाउन पाळण्यात आला. त्यानंतर, अनलॉक करण्यास सुरुवात झाली असून हळू हळू सर्वच व्यवहार सुरळीत करण्यात येत आहेत. मात्र, अद्यापही कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहेत. देशात आत्तापर्यंत ३ लाखांपेक्षा जास्त रुग्ण आढळून आले आहेत. तर, महाराष्ट्रातही लाखांच्यावर रुग्णसंख्या पोहोचली आहे. त्यामुळे, जवळपास ८० दिवस उलटले तरीही,000 कोरोनाच संकट नागरिकांच्या डोक्यावर घोंघावत आहे. कोरोना लॉकडाउन काळात विमान प्रवासाचं बुकिंग केलेल्या प्रवाशांच्या तिकीटाचं रिफंड करण्याची मागणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. यासंदर्भात चव्हाण यांनी उड्डाणमंत्री हरदीप पुरी यांनी पत्र लिहिलं आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अचानक २४ मार्चपासून देशात लॉकडाउन होणार असल्याची घोषणा केली अन् देशात सर्वत्र शट डाउन झाले. चहाच्या कँटीनपासून ते देश आणि विदेशातील विमानप्रवासापर्यंत सर्वकाही २१ दिवसांसाठी बंद करण्यात आले. त्यानंतर, अद्यापही हा लॉकडाउन सुरुच असून आता हळू हळू सर्वच व्यवहार सुरु होत आहेत. देशातील नागरिकांनी रेल्वे आणि विमानाचे तिकीट बुकींग केले होते. मात्र, अचानक लॉकडाउन घोषित केल्यामुळे या प्रवाशांचा प्रवास पूर्णत्वास गेला नाही. देशात आणि विदेशात प्रवास करण्यासाठी लाखो प्रवाशांनी विमानाचे बुकिंग केले होते. मात्र, त्यांनाही आपला प्रवास रद्द करावा लागला आहे. त्यामुळे, या रद्द झालेल्या प्रवासाच्या तिकीटांचे रिफंड लवकरात लवकर करण्याची मागणी माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. चव्हाण यांनी नागरी उड्डाणमंत्री हरदीप पुरी यांना पत्र लिहून विमानकंपन्यांकडून प्रवाशांच्या तिकीटाचे पैसे परत करण्याची मागणी केली आहे. ठराविक कालावधीत हे पैसे परत मिळणे आवश्यक आहे, प्रवाशांना तो ग्राहकाधिकार असल्याचेही चव्हाण यांनी म्हटले आहे.    

 

टॅग्स :Prithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाणAir Indiaएअर इंडियाcorona virusकोरोना वायरस बातम्याTwitterट्विटर