शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

पश्चिम बंगालमध्ये निकाल येऊ लागला! ग्राम पंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषदेत भाजपाला किती जागा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2023 19:00 IST

पश्चिम बंगालमध्ये अद्याप संपूर्ण निकाल लागलेले नाहीत. परंतू, ग्राम पंचायतचे बहुतांश निकाल हाती आले आहेत.

पश्चिम बंगालमध्ये नुकत्याच ग्राम पंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका झाल्या. यावेळी काही ठिकाणी हिंसाचार झाला होता. निवडणूक आयोगाने दुसऱ्या दिवशी त्या ठिकाणी मतदान घेतले होते. याचे आज निकाल जाहीर झाले आहेत. हिंसाचारानंतर राज्यपालांनी अमित शाहंची भेट घेतली होती. यावेळी शाहंनी त्यांना लवकरच चांगले दिवस येतील असे आश्वासन दिले होते. 

पश्चिम बंगालमध्ये अद्याप संपूर्ण निकाल लागलेले नाहीत. परंतू, ग्राम पंचायतचे बहुतांश निकाल हाती आले आहेत. या कलानुसार 63229 ग्राम पंचायतपैकी ममता बॅनर्जी यांच्या तृणमुल काँग्रेस पक्षाला 15637 ग्राम पंचायती जिंकता आल्या आहेत. तर 2915 मध्ये आघाडीवर आहे. भाजपाला 3367 ग्राम पंचायतींमध्ये यश मिळाले आहे. 728 मध्ये आघाडीवर आहे. सीपीएमला 1196 ग्राम पंचायतींमध्ये विजय मिळाला आहे. तर 491 ग्रा. पंचायतींमध्ये आघाडीवर आहे. काँग्रेसला 882 ग्रा. पंचायतींमध्ये विजय तर 255 मध्ये आघाडीवर आहे. इतरांना 1358 ग्राम पंचायती जिंकता आल्या आहेत. तर 300मध्ये आघाडीवर आहेत. 

पंचायत समित्यांच्या निवडणुकीचे निकाल अद्याप यायचे आहेत. 9730 पंचायत समित्यांपैकी १४९ पंचायत समित्यांचे निकाल आले आहेत. परंतू त्याचे गुणोत्तर पाहता टीएमसीच आघाडीवर दिसत आहे. टीएमसीने 58 पं. समित्यांवर विजय मिळविला आहे. तर ७६ ठिकाणी आघाडीवर आहे. भाजपा ८ ठिकाणी आघाडीवर आहे. सीपीएम सहा आणि इतर एका पंचायत समितीवर आघाडीवर आहेत. 

928 जिल्हा परिषदांपैकी टीएमसीने आतापर्यंत १० जिल्हा परिषदांमध्ये आघाडी मिळविली आहे. पंचायत समिती आणि जिल्हा परिषदांचे निकाल अद्याप यायचे आहेत. याचे सर्व चित्र उद्या पर्यंत स्पष्ट होणार आहे. 

 

टॅग्स :west bengalपश्चिम बंगालElectionनिवडणूकBJPभाजपाTrinamool Congressतृणमूल काँग्रेस