शहरं
Join us  
Trending Stories
1
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
2
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
3
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
4
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
5
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
6
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
7
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
9
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
10
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
11
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
12
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
13
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
14
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
15
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
16
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
17
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
18
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
19
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...

एअरस्ट्राइकचा परिणाम! सीमेपलीकडून होणाऱ्या घुसखोरीत मोठी घट

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2019 21:21 IST

 पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाने बालाकोटवर एअर स्ट्राइक करून बदला घेतला होता.

नवी दिल्ली -  पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाने बालाकोटवर एअर स्ट्राइक करून बदला घेतला होता. दरम्यान, बालाकोट येथील एअर स्ट्राइकमुळे दहशतवादी कारवायांना चांगलाच आळा बसला असून, सीमेपलीकडून होणाऱ्या घुसखोरीत मोठी घट झाली असल्याचे केंद्र सरकारकडून आज लोकसभेत सांगण्यात आले. गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी जम्मू काश्मीरमधील परिस्थितीबाबत लोकसभेत माहिती दिली. जम्मू काश्मीरमधील परिस्थितीत बऱ्यापैकी सुधारणा झाली आहे. तसेच एअर स्ट्राइकनंतर घुसखोरीमध्ये 43 टक्क्यांनी घट झाली आहे,'' असे त्यांनी सांगितले. एका दिवसापूर्वीच भारताच्या कारवाईमुळे धास्तावलेल्या दहशतवाद्यांनी पाकिस्तानमधून अफगाणिस्तानच्या सीमेमध्ये कूच केल्याचे वृत्त आले होते. जम्मू काश्मीरमधील घुसखोरीबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नाला मंगळवारी लोकसभेत  उत्तर देताना नित्यानंद राय म्हणाले की, यावर्षी फेब्रुवारी महिन्यात पाकिस्तानमधील बालाकोट येथे भारतीय हवाई दलाने हल्ला करून दहशतवाद्यांचे अनेक तळ उद्ध्वस्त केले. तसेच संरक्षण दलांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे जम्मू काश्मीरमधील परिस्थितीमध्ये गेल्यावर्षीपेक्षा खूप मोठ्या प्रमाणावर सुधारणा झाली आहे. केंद्र सरकारने सीमेपलीकडून होणाऱ्या घुसखोरीबाबत झीरो टॉलरेन्सचे धोरण अवलंबलेले आहे. एवढेच नाही केंद्र सरकार राज्य सरकारसोबत मिळून घुसखोरी रोखण्यासाठी विविध स्तरावर प्रयत्न करण्यात येत आहेत.  

टॅग्स :Indian Air Strikeएअर सर्जिकल स्ट्राईकIndiaभारतHome Ministryगृह मंत्रालयPakistanपाकिस्तानTerrorismदहशतवाद