शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती निवडणुकीपूर्वी एनडीए खासदारांची डिनर पार्टी रद्द; पंतप्रधानांच्या निवासस्थानी कार्यक्रम होणार होता; कारण आले समोर
2
एकाच पत्नीचे १५ पती! इंग्लंडला पाठवण्यासाठी लढवली शक्कल, ऐकून पोलिसही थक्क झाले
3
Punjab Flood : आभाळ फाटलं, पुराचा वेढा! पंतप्रधान मोदी करणार पंजाबचा दौरा; २००० गावं पाण्याखाली, ४६ मृत्यू
4
अरेरे! लायब्ररी, जमीन विकून बायकोला शिकवलं; पोलिसात नोकरी मिळताच 'तिने' नवऱ्याला सोडलं
5
"घरच्यांनी लग्नासाठी नकार दिला असता तर आम्ही...", प्रिया आणि उमेशने केला मोठा खुलासा
6
आरोग्य आणि जीवन विमा आता जीएसटी-मुक्त! पण प्रत्यक्षात किती प्रीमियम स्वस्त होईल?
7
साप्ताहिक राशीभविष्य: पितृपक्ष सुरुवात ७ राशींना तापदायी-संमिश्र; ५ राशींना लाभ-पैसा येईल!
8
जीएसटी कपातीनंतरही किंमत कमी केली नसेल तर मला सांगा, मी तिथे येईन; निर्मला सीतारामन यांचे विधान
9
गणेश विसर्जनावेळी वीजेचा शॉक लागून दुर्घटना; एकाचा मृत्यू, चौघे जखमी, मुंबईतील घटना
10
पंतप्रधानांच्या मणिपूर दौऱ्यासाठी जय्यत तयारी; १५००० लोकांची बैठक व्यवस्था, स्टेज उभारणीचे काम सुरू
11
३० वर्षीय विवाहितेचे १७ वर्षांच्या तरुणाशी संबंध, मुलीने आक्षेपार्ह स्थितीत पाहिल्यावर...
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्या सकारात्मक भूमिकेचे मोदींकडून स्वागत; म्हणाले, "भारत आणि अमेरिकेमध्ये..."
13
२२ तास चाललेल्या मिरवणुकीनंतर लालबागचा राजा विसर्जनासाठी गिरगाव चौपाटीवर दाखल
14
खलिस्तानी अतिरेक्यांना कॅनडामधून मदत; कनडा सरकारचा अहवाल : दोन संघटनांची केली नोंद
15
Thane: गणपती विसर्जन करताना पाच जण नदीत बुडाले, एकाचा मृतदेह मिळाला; दोघांचा शोध सुरूच
16
Ganpati Visarjan: भर पावसात, जल्लोषात गणरायाला निरोप; मुंबईत ढोल-ताशांसह गुलालाची उधळण
17
ट्रम्प यांचा यु-टर्न! टॅरिफ पद्धतीत केले बदल; महत्त्वाची खनिजे व औषधी उत्पादनांसह काही वस्तूंना सूट
18
आजचे राशीभविष्य - ७ सप्टेंबर २०२५, नवीन कामाची सुरूवात करण्यास अनुकूल दिवस
19
Aryna Sabalenka : बेलारूसच्या सुंदरीनं घरात घुसून घेतला बदला! सलग दुसऱ्यांदा जिंकली US ओपन स्पर्धा
20
पाकिस्तानात क्रिकेट सामन्यादरम्यानच मैदानात बॉम्बस्फोट; एकाचा मृत्यू, अनेक जखमी

पानसरे कुटुंबीयांच्या याचिकेवर महाराष्ट्र सरकारकडून उत्तर मागितले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2025 14:11 IST

तपासात प्रभावी प्रगती नाही

नवी दिल्ली : विचारवंत गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या तपासावर अधिक देखरेख ठेवणे आवश्यक नसल्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाविरुद्ध दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारकडून उत्तर मागितले आहे.न्या. एम. एम. सुंदरेश आणि एन. कोटेश्वर सिंह यांच्या खंडपीठाने १ सप्टेंबर रोजी झालेल्या सुनावणीदरम्यान राज्य सरकारकडून उत्तर मागितले. उच्च न्यायालयाच्या २ जानेवारीच्या आदेशाविरुद्ध पानसरे यांची कन्या आणि सुनेकडून ही याचिका दाखल करण्यात आली. खंडपीठाने आपल्या आदेशात म्हटले आहे की, नोटीस जारी करावी.भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते, लेखक गोविंद पानसरे आणि त्यांच्या पत्नी उमा यांच्यावर १६ फेब्रुवारी २०१५ रोजी कोल्हापूर शहरात मॉर्निंग वॉकच्यावेळी गोळीबार करण्यात आला. जखमी गोविंद पानसरे यांचा घटनेच्या चार दिवसांनी २० फेब्रुवारी २०१५ रोजी मृत्यू झाला. त्यांच्या पत्नी बचावल्या.या हत्येचा तपास सुरुवातीला पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाच्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) केला होता. परंतु, नंतर २०२२ मध्ये तो महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाकडे (एटीएस) सोपवण्यात आला. उच्च न्यायालय २०१६ पासून तपासावर देखरेख करत होते. तपास यंत्रणा नियमितपणे तथ्यात्मक स्थिती अहवाल सादर करत होत्या.सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत म्हटले आहे की, उच्च न्यायालयाने ३ ऑगस्ट २०२२ रोजी मोठ्या कटाचा उलगडा करण्यासाठी आणि फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी तपास एसआयटीकडून एटीएसकडे हस्तांतरित केला होता, हे खंडपीठाने विचारात घेतले नाही.हत्या ही मोठ्या कटाचा भागया याचिकेत म्हटले आहे की, प्रकरण हस्तांतरित झाल्यानंतर एटीएसने तपासात कोणतीही महत्त्वपूर्ण प्रगती केली नसली तरी, तपासाचे निरीक्षण करणे आवश्यक नाही, कारण एटीएसचा मुख्य उद्देश फक्त फरार आरोपींचा शोध घेणे आहे, असे म्हणत उच्च न्यायालयाने याचिका फेटाळून लावली. एटीएसचा तपास पूर्ण होईपर्यंत तपासाचे निरीक्षण सुरू ठेवावे, ही त्यांची विनंती उच्च न्यायालयाने फेटाळून लावली. एसआयटीने सादर केलेले तथ्य आणि आरोपपत्र हे स्पष्ट करते की ही केवळ हत्या नव्हती, तर ती एका मोठ्या कटाचा भाग होती.तपासात प्रभावी प्रगती नाहीयाचिकाकर्त्यांनी दावा केला की, डॉ. नरेंद्र दाभोलकर, पानसरे, कन्नड विद्वान एमएम कलबुर्गी आणि पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्या एकमेकांशी जोडल्या गेल्या होत्या. परंतु, आतापर्यंत हल्लेखोर किंवा कट रचणारे सापडलेले नाहीत. त्यामुळे न्यायालयाकडून तपासाचे निरीक्षण करणे आवश्यक आहे. एसआयटीकडून एटीएसकडे तपासाची जबाबदारी सोपवूनही, कोणतीही प्रभावी प्रगती झालेली नाही. दोन जानेवारी रोजीच्या आपल्या आदेशात, उच्च न्यायालयाने ट्रायल कोर्टाला खटला जलदगतीने चालवण्यास आणि दररोज सुनावणी सुनिश्चित करण्यास सांगितले होते.